शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

खामोना-अहेरी मार्गावर वाहनचालकांना करावा लागतो त्रासदायक प्रवास

By admin | Updated: August 14, 2016 00:40 IST

रस्ते हे विकासाचे प्रतिक आहे. रस्त्यावरून त्या-त्या भागाचा कसा विकास झाला,...

रस्त्यावर खड्डेच खड्डे : सुस्तावलेला बांधकाम विभाग लक्ष देईनागोवरी : रस्ते हे विकासाचे प्रतिक आहे. रस्त्यावरून त्या-त्या भागाचा कसा विकास झाला, याचा अंदाज बांधता येतो. पावसाळ्याच्या दिवसात रस्ते चांगले असणे आवश्यक असते. मात्र खामोना-अहेरी मार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने या भागातील नागरिकांना जीव धोक्यात घालून नरकयातनांचा प्रवास करावा लागत आहे. परंतु सुस्तावलेला बांधकाम विभाग लक्ष देत नसल्याने रस्त्याअभावी नागरिकांचे हाल होत आहेत.राजुरा तालुक्यातील खामोना-अहेरी मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची दुरूस्ती केलेली नाही. पावसाळ्यापूर्वी रस्त्याची डागडुगी करणे आवश्यक असते. परंतु बांधकाम विभागाने लक्ष दिले नाही. पावसाळ्याच्या दिवसात रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने खड्डा किती खोल आहे, याचा नेमका अंदाज वाहनधारकांना येत नसतो. त्यामुळे अनेकदा या रस्त्यावर जीवघेणे अपघात घडले आहेत. शालेय विद्यार्थी शिक्षणासाठी अहेरी, खामोना येथे जात असल्याने चांगल्या रस्त्याअभावी त्यांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागातील रस्त्यावरून त्या त्या परिसरातील विकासाची दिशा ठरत असते. मात्र ग्रामीण भागातील रस्त्यांना आज मोठ्या प्रमाणात अवकळा आल्याने रस्त्यांचा विकास गेला कुठे, हा प्रश्न पडल्याखेरीज राहत नाही. खामोना-अहेरी मार्गाची गेल्या अनेक दिवसापासून दुरवस्था झाल्याने या रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली. मात्र सुस्तावलेल्या बांधकाम विभागाला अजूनही जाग आली नाही. त्यामुळे या मार्गाची तातडीने दुरूस्ती करावी, अशी मागणी खामोना येथील पोलीस पाटील विजय पादे, उपसरपंच रेखा पिंपळशेंडे, बंडू जेऊरकर, लघुत्तम सातपुते, आकाश कातकर, घनश्याम उरकुडे, दौलत लोणारे, राजू कामटे, सूरज पादे, श्याम कातकर, कवडू सातपुते, प्रकाश मोरे, विलास सातपुते, चेतन लोणारे, राजेंद्र पिंपळकर व परिसरातील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)रस्त्यात खड्डा का खडड्यात रस्ता कळेनाराजुरा तालुक्यातील खामोना - अहेरी मार्गाची एवढी बिकट अवस्था झाली आहे की, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना रस्त्यात खड्डा आहे की खड्डयात रस्ता आहे, हे क्षणभर चुकल्यासारखे वाटते. रस्त्यावरील खड्डे वाहनधारकाच्या जीवावर उठले आहे. या रस्त्याचे पूर्णत: बारा वाजल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष का देत नाही, हा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून अनुउत्तरीतच आहे.