शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

पुरानंतर गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 05:00 IST

गावांमध्ये नळ योजनेबरोबरच हातपंप असले तरी या हातपंपांना दूषित पाणी येत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. वैनगंगा नदीचे पाणी गावात शिरल्याने पंपगृह, विहिरी, हातपंप गढूळ पाण्याने तुडुंब भरल्या आहेत. त्यामुळे पाणी दूषित झाले आहे. तसेच गावातील खासगी विहिरींनासुद्धा दूषित पाण्याचा फटका बसला आहे. अशावेळी गावात असणारे हातपंप गावकऱ्यांसाठी संजीवनी ठरू शकतात.

ठळक मुद्देअनेक गावात नळ योजना बंद : हातपंपातूनही येतेय दूषित पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कब्रम्हपुरी : तालुक्यातील वैनगंगेच्या काठावरील गावांमध्ये पुराचे पाणी ओसरताच नागरिकांना पिण्याच्या पाण्याचे संकट उभे ठाकले आहे. तालुक्यातील जवळपास ५१ गावे महापुराने प्रभावित झाली होती तर २१ गावांना जबरदस्त तडाखा बसला होता. वैनगंगेच्या काठावरील गावात नळ योजनेतून तसेच हातपंपाच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. या गावांमध्ये नळ योजना असली तरी जलशुद्धीकरणाची सोय नाही. त्यामुळे पूर ओसरल्यानंतर आता दूषित पाण्यामुळे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य कायम आहे.गावांमध्ये नळ योजनेबरोबरच हातपंप असले तरी या हातपंपांना दूषित पाणी येत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. वैनगंगा नदीचे पाणी गावात शिरल्याने पंपगृह, विहिरी, हातपंप गढूळ पाण्याने तुडुंब भरल्या आहेत. त्यामुळे पाणी दूषित झाले आहे. तसेच गावातील खासगी विहिरींनासुद्धा दूषित पाण्याचा फटका बसला आहे. अशावेळी गावात असणारे हातपंप गावकऱ्यांसाठी संजीवनी ठरू शकतात. मात्र गावात नळ योजना आल्यानंतर हातपंपाच्या दुरुस्तीकडे, देखभालीकडे दुर्लक्ष केल्याने पिण्याच्या पाण्यासाठी पूरग्रस्त नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दूषित पाण्याने अनेक आजारांना निमंत्रण मिळत आहे. गावात पुरामुळे साचलेला गाळ, शिवारातून येत असलेली दुर्गंधी, त्याचबरोबर नळांना, विहिरींना, हातपंपांना येणारे गढूळ पाणी, यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. धानाचे पीक पूर्णत: नष्ट झाले असून गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने विटा, मातीची घरे कोसळली आहेत. यामुळे नागरिकांची संकटे वाढली आहेत. शासनस्तरावर पूरग्रस्त गावांमध्ये मोठया प्रमाणावर टँकरने पाणी पुरवठा केला जात असला तरी गावगाड्यातील जनावरांची संख्या लक्षात घेता व घरातील गाळाने माखलेल्या साहित्यांच्या साफसफाईसाठी मोठया प्रमाणात पाणी लागत आहे.दूषित पाणी पिऊ नका, पाणी उपलब्ध करू - क्रांती डोंबेपूरग्रस्त गावांमध्ये असलेली एकंदरीत परिस्थिती लक्षात घेत ब्रम्हपुरीच्या उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी पूर ओसरताच सर्वात आधी पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देऊन पूरग्रस्त गावांमध्ये शक्य तेवढया लवकर पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्य दिले आहे. टँकरने गावोगावी पिण्याचे पाणी कसे उपलब्ध करून दिले जातील, याकडे त्या जातीने लक्ष ठेवून आहेत. पूरग्रस्त गावांमध्ये जाऊन नागरिकांना विहिरी, नळ, हातपंपांचे पाणी शुद्ध झाल्याशिवाय पिऊ नका, अशी विनंती करीत आहेत.नाल्यांमध्ये नळयोजनेचे पाईपकिन्ही गावातील नळ योजनेचे पाईप गावातील अंतर्गत नाल्यांमधून टाकले असल्याने आणि पुरामुळे नाल्या तुडुंब भरल्या असल्याने नळाचे पाणी कसे घ्यावे, असा प्रश्न किन्ही गावातील नागरिकांना पडला आहे. येथील हातपंपसुद्धा बंद अवस्थेत असल्याने येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठया प्रमाणात संघर्ष करावा लागत आहे

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण