शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

पंचवार्षिक निवडणुकीपर्यंत स्थायी सभापतिपदी राहण्याचे स्वप्न भंगले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:33 IST

सोमवारी स्थायी समितीचे सभापती रवी आसवानी यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन सभा झाली. या समितीमध्ये भाजपचे बहुमत असल्याने विषय पत्रिकेवरील सर्व ...

सोमवारी स्थायी समितीचे सभापती रवी आसवानी यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन सभा झाली.

या समितीमध्ये भाजपचे बहुमत असल्याने विषय पत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर झाले. स्थायी समितीमधील १६ सदस्यांपैकी आठ सदस्य निवृत्त झाले. यामध्ये भाजपचे विद्यमान स्थायी समिती सभापती आसवानी, नगरसेवक संजय कंचर्लावार, सुभाष कासनगोट्टुवार, काँग्रेसचे नीलेश खोब्रागडे, सकिना अन्सारी, विना खनके, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंगला आखरे आणि बसपचे प्रदीप डे यांचा समावेश आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात मनपाची आमसभा आयोजित करण्यात येणार आहे. या सभेत स्थायी समितीच्या नवीन भाजप, काँग्रेस, बसप व नगर विकास आघाडीतील आठ नगरसेवकांची नावे द्यावी लागणार आहे. मनपाची पंचवार्षिक निवडणूक व्हायला सुमारे एक वर्षाचा कालावधी शिल्लक आहे. विद्यमान सभापती आसवानी यांना पंचवार्षिक निवडणुका लागेपर्यंत सभापती पदावर कायम राहायचे होते, अशी चर्चा आहे. शिवाय, महापौर पती संजय कंचर्लावार यांनाही सभापती पदाची स्वप्ने पडत होती. परंतु, स्थायी समितीमधून सोमवारी निवृत्त झाल्याने हे स्वप्न भंगल्याची मनपा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

भाजप गटप्रमुख कुणाची नावे पाठविणार ?

भाजपचे गट नेते वसंता देशमुख यांना भाजपच्या स्थायी समितीमधील तीन सदस्यांची नावे पाठविण्याचा अधिकार आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी देशमुख यांना डावलून रवी आसवानी यांच्याकडे सभापतिपद दिल्याने पक्षात मोठा वाद उफाळून आला होता. देशमुख यांना सभापती पदापासून दूर ठेवण्यासाठी पक्षांतर्गत राजकीय डावपेच आखण्यात आले होते. परिणामी, पुन्हा सभापतिपदी वर्णी लावण्यासाठी आसवानी आणि नगरसेवक संजय कंचर्लावार यांच्या नावांना गटनेता वसंता देशमुख हे पसंती देणार काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.