शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

तळोधी परिसरात धानाची डबल फसल

By admin | Updated: February 11, 2016 01:24 IST

धानाचे भाव दिवसेंदिवस घसरत आहेत, शेती करणे परवडत नाही. तरीही नागभीड तालुक्यातील सावरगाव, गिरगाव या परिसरात धानाची दुसरी फसल मोठ्या प्रमाणावर घेतली जात आहे.

परिस्थितीवर शेतकऱ्यांची मात : विहिरींमुळे झाली सिंचनाची सोयघनश्याम नवघडे नागभीडधानाचे भाव दिवसेंदिवस घसरत आहेत, शेती करणे परवडत नाही. तरीही नागभीड तालुक्यातील सावरगाव, गिरगाव या परिसरात धानाची दुसरी फसल मोठ्या प्रमाणावर घेतली जात आहे. खरोखरच या शेतकऱ्यांच्या जिद्दीला सलाम करण्याजोगी ही बाब आहे. प्रादेशिकतेच्या दृष्टीने नागभीड तालुक्याचे दोन भाग केले जातात. एक नागभीड आणि दुसरा तळोधी. घोडाझरी तालावाच्या रुपाने तळोधी भागाला सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्याने हा भाग तसा सुपीकच म्हणूनच संबोधल्या जाते. या भागात धानाचे उत्पादन नागभीड भागापेक्षा मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते. पण प्रत्येक गोष्टीच्या वाढलेल्या किंमती वातावरणामुळे धानाला सतावणारे विविध रोग आणि दिवसेंदिवस धानाचे घटत चाललेले भाव या विविध कारणांमुळे तळोधी भागातीलही शेतकरी त्रस्त झाले आहेत.असे असले तरी या सर्व संकटांवर मात करुन तळोधी भागातील सावरगाव, गिरगाव आणि वाढोणा या परिसरात शेतकऱ्यांनी धानाची दुसरी फसल घेतली आहे. या दुसऱ्या फसलसाठी मागील महिन्यातच पऱ्ह्याची पेरणी केली. आता हे पऱ्हे रोवणी योग्य झाल्याने बहुतेक शेतकऱ्यांनी रोवणीला सुरुवातही केली आहे. सदर प्रतिनिधीने या भागास भेट दिली असता, सावरगाव, गिरगाव आणि वाढोणा परिसरात अनेक शेतात रोवणी सुरु असल्याचे दिसून आले. त्यातल्या त्यात सावरगाव येथे तर दुसऱ्या फसलचे प्रमाण अधिक असल्याचे एका शेतकऱ्यांने सांगितले. धान पिकास पाण्याची मोठ्या प्रमाणावर गरज असल्याने या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात विहीरी आणि विधन विहिरींची सोय उलब्ध केली आहे. या विहिरी अािण विंधन विहिरीच्या भरवश्यावरच हे शेतकरी धानाचे दुसरे पकी घेत आहेत. धानाला भाव जरी कमी असले तरी या दुसऱ्या हंगामाने त्यांच्या आर्थिक थैर्याला मदत होत आहे. ३५० ते ४०० एकरवर डब्बल फसलतळोधी भागातील सावरगाव, गिरगाव आणि वाढोणा परिसरात जवळपास ३५० ते ४०० एकरामध्ये धानाचे दुसरे पीक घेतले जात आहे. या दुसऱ्या पिकामुळे त्या परिसरातील मजुरांना रोवणी आणि कापणीच्या रुपाने रोजगारही उपलब्ध झाला आहे.आमच्या कुटुंबात लहान मोठे ४० सदस्य आहेत. आमचे एकत्र कुटुंब असून शेती हाच आमचा मुख्य व्यवसाय आहे. आम्ही जवळपास ३५ एकरामध्ये धानाचे दुसरे पीक घेत आहोत. रिकामे बसण्यापेक्षा आम्हीशेतीत गुंतून राहतो. शेती सुद्धा चांगली राहते. आर्थिक फायदाही होतो. कुटुंबातील व्यक्तीही कामात व्यस्त राहतात.- गणपत ठिकरे, शेतकरी,सावरगावजिथे जिथे सिंचनाची सोय उपलब्ध आहे, तिथे तिथे हे उन्हाळी पीक घेतले जाते. सावरगाव, गिरगाव आणि वाढोणा परिसरा व्यतिरिक्त तालुक्यातील इतर गावातही उन्हाळी लागवड केली जाते. धानासोबतच इतर पीकही शेतकऱ्यांनी घ्यावे.- आर. एन. पठाण, तालुका कृषी अधिकारी, नागभीड