शहरं
Join us  
Trending Stories
1
"कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
3
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
4
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
5
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
6
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
7
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
8
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
9
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
10
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
11
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
12
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
13
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
14
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
15
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
16
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
17
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
18
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
19
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
20
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   

हाॅटेल उघडले म्हणून जिभेचे लाड नको, आला पावसाळा, पोट सांभाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:22 IST

चंद्रपूर : कोरोना संसर्गामुळे मागील काही दिवस हाॅटेल बंद होते. आता हाॅटेल उघडण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे बहुतांश जण ...

चंद्रपूर : कोरोना संसर्गामुळे मागील काही दिवस हाॅटेल बंद होते. आता हाॅटेल उघडण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे बहुतांश जण हाॅटेलमधील पदार्थ खाण्याकडे लक्ष देत आहे. मात्र पावसाळा असल्यामुळे साथरोग पसरण्याची भीती आहे. उघड्यावर असलेले अन्नपदार्थ सेवन केले, तर डायरिया, गॅस्ट्रोसारखे साथीचे आजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिभेचे लाड पुरवताना, जसा सांभाळून, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

ऋतू बदलले की आरोग्यावरही परिणाम पडतो. यामध्ये पावसाच्या दिवसांमध्ये अनेक आजार तोंड वर काढतात. त्यामुळे या काळामध्ये गरम आणि स्निग्ध आहार घेतला पाहिजे. पालेभाज्या खरेदी करताना त्या पाहून घेतल्या पाहिजेत. याशिवाय तेलकट, मसालेदार पदार्थ या दिवसात कटाक्षाने टाळले पाहिजेत.

कोरोना संकटानंतर आता प्रशासनाने हाॅटेल सुरू करण्याची परवानगी दिली आहे. दुपारी ४ वाजेनंतर पार्सल सुविधा आहे. मात्र सध्या हाॅटेलमध्ये गर्दी बघायला मिळत आहे. याचवेळी अस्वच्छतेच्या वातावरणातही अनेकजण अन्नपदार्थ घेत असल्याने त्यांना आरोग्याच्या समस्या उद्भभवण्याची शक्यता आहे. या दिवसांमध्ये चटपटीत खाणे टाळले, तर आरोग्य उत्तम राहील, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

बाॅक्स

पावसाळ्यात हे खायला हवे...

पावसाळ्यामध्ये हलके अन्न सेवन केले पाहिजे

ताजे अन्न रोजच्या आहारामध्ये असले पाहिजे

स्निग्ध आहार घेतला पाहिजे, यामध्ये ताक सेवनात असावे

जलजन्य आजार टाळण्यासाठी पाणी उकळून प्यावे.

रात्रीच्या जेवनात हलक्या आहाराचा समावेश करावा

बाजारात उपलब्ध फळे खावीत

बाॅक्स

पावसाळ्यात हे खाणे टाळावे...

जड पदार्थ खाणे टाळले पाहिजे

शिळे अन्न, शिळा भात खाऊ नये

उघड्यावरील चटपटीत पदार्थ खाऊ नयेत

तेलकट पदार्थ आणि मसालेदार पदार्थ टाळावेत

अस्वच्छ पाणी पिणे टाळावे

बाॅक्स

रस्त्यावरचे अन्न नकोच

पावसाळ्याच्या दिवसात माशा तसेच डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. घाणीवरील माशा उघड्यावरील अन्न पदार्थांवर बसल्याने पोटाचा त्रास उद्भवू शकतो. तसेच जुलाब, उलटीची समस्या जाणवू लागते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात रस्त्यावरील उघड्यावर असलेले अन्नपदार्थ खाणे टाळावे. बाहेरील अस्वच्छ पाणी पिणेही पोटाच्या आजाराला आमंत्रण देऊ शकते.

कोट

डाॅक्टर म्हणतात...

पावसाच्या दिवसांमध्ये जलजन्य आजाराचा अधिक धोका असतो. त्यामुळे स्वच्छ पाणी पिणे गरजेचे आहे. बाजारातून आणलेल्या भाज्या तसेच फळे स्वच्छ धुवावेत. जंकफूड टाळले पाहिजे. स्वच्छतेवर अधिक भर असायला पाहिजे. ताजे अन्न खायला हवे.

- डाॅ. गोपाल मुंधडा, चंद्रपूर

कोट

पावसाच्या दिवसांमध्ये हलके, सहज पचणारे आणि गरम अन्न सेवन केले पाहिजे. या काळामध्ये तेलकट पदार्थ, शिळे अन्न खाण्याचे टाळले पाहिजे. पालेभाज्या स्वच्छ धुऊन घेतल्या पाहिजेत. विशेषत: उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नयेत.

- डाॅ. सौरभ राजूरकर, चंद्रपूर

-