शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

हाॅटेल उघडले म्हणून जिभेचे लाड नको, आला पावसाळा, पोट सांभाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:22 IST

चंद्रपूर : कोरोना संसर्गामुळे मागील काही दिवस हाॅटेल बंद होते. आता हाॅटेल उघडण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे बहुतांश जण ...

चंद्रपूर : कोरोना संसर्गामुळे मागील काही दिवस हाॅटेल बंद होते. आता हाॅटेल उघडण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे बहुतांश जण हाॅटेलमधील पदार्थ खाण्याकडे लक्ष देत आहे. मात्र पावसाळा असल्यामुळे साथरोग पसरण्याची भीती आहे. उघड्यावर असलेले अन्नपदार्थ सेवन केले, तर डायरिया, गॅस्ट्रोसारखे साथीचे आजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिभेचे लाड पुरवताना, जसा सांभाळून, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

ऋतू बदलले की आरोग्यावरही परिणाम पडतो. यामध्ये पावसाच्या दिवसांमध्ये अनेक आजार तोंड वर काढतात. त्यामुळे या काळामध्ये गरम आणि स्निग्ध आहार घेतला पाहिजे. पालेभाज्या खरेदी करताना त्या पाहून घेतल्या पाहिजेत. याशिवाय तेलकट, मसालेदार पदार्थ या दिवसात कटाक्षाने टाळले पाहिजेत.

कोरोना संकटानंतर आता प्रशासनाने हाॅटेल सुरू करण्याची परवानगी दिली आहे. दुपारी ४ वाजेनंतर पार्सल सुविधा आहे. मात्र सध्या हाॅटेलमध्ये गर्दी बघायला मिळत आहे. याचवेळी अस्वच्छतेच्या वातावरणातही अनेकजण अन्नपदार्थ घेत असल्याने त्यांना आरोग्याच्या समस्या उद्भभवण्याची शक्यता आहे. या दिवसांमध्ये चटपटीत खाणे टाळले, तर आरोग्य उत्तम राहील, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

बाॅक्स

पावसाळ्यात हे खायला हवे...

पावसाळ्यामध्ये हलके अन्न सेवन केले पाहिजे

ताजे अन्न रोजच्या आहारामध्ये असले पाहिजे

स्निग्ध आहार घेतला पाहिजे, यामध्ये ताक सेवनात असावे

जलजन्य आजार टाळण्यासाठी पाणी उकळून प्यावे.

रात्रीच्या जेवनात हलक्या आहाराचा समावेश करावा

बाजारात उपलब्ध फळे खावीत

बाॅक्स

पावसाळ्यात हे खाणे टाळावे...

जड पदार्थ खाणे टाळले पाहिजे

शिळे अन्न, शिळा भात खाऊ नये

उघड्यावरील चटपटीत पदार्थ खाऊ नयेत

तेलकट पदार्थ आणि मसालेदार पदार्थ टाळावेत

अस्वच्छ पाणी पिणे टाळावे

बाॅक्स

रस्त्यावरचे अन्न नकोच

पावसाळ्याच्या दिवसात माशा तसेच डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. घाणीवरील माशा उघड्यावरील अन्न पदार्थांवर बसल्याने पोटाचा त्रास उद्भवू शकतो. तसेच जुलाब, उलटीची समस्या जाणवू लागते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात रस्त्यावरील उघड्यावर असलेले अन्नपदार्थ खाणे टाळावे. बाहेरील अस्वच्छ पाणी पिणेही पोटाच्या आजाराला आमंत्रण देऊ शकते.

कोट

डाॅक्टर म्हणतात...

पावसाच्या दिवसांमध्ये जलजन्य आजाराचा अधिक धोका असतो. त्यामुळे स्वच्छ पाणी पिणे गरजेचे आहे. बाजारातून आणलेल्या भाज्या तसेच फळे स्वच्छ धुवावेत. जंकफूड टाळले पाहिजे. स्वच्छतेवर अधिक भर असायला पाहिजे. ताजे अन्न खायला हवे.

- डाॅ. गोपाल मुंधडा, चंद्रपूर

कोट

पावसाच्या दिवसांमध्ये हलके, सहज पचणारे आणि गरम अन्न सेवन केले पाहिजे. या काळामध्ये तेलकट पदार्थ, शिळे अन्न खाण्याचे टाळले पाहिजे. पालेभाज्या स्वच्छ धुऊन घेतल्या पाहिजेत. विशेषत: उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नयेत.

- डाॅ. सौरभ राजूरकर, चंद्रपूर

-