शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
3
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
4
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
5
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
6
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
7
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
8
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
9
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
10
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
11
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
12
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
13
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
14
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
15
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
16
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
17
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
18
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
19
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
20
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान

कुणी मोबाईल देता का मोबाईल? ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणाची दयनीय अवस्था; ४० टक्के ग्रामीण विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोनच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:18 IST

राजेश बारसागडे सावरगाव : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे शिक्षणाचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. मागीलवर्षी शाळा-महाविद्यालयातील शिक्षण ऑनलाईन सुरू होते; मात्र ...

राजेश बारसागडे

सावरगाव : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे शिक्षणाचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. मागीलवर्षी शाळा-महाविद्यालयातील शिक्षण ऑनलाईन सुरू होते; मात्र यातील केवळ ६० टक्के विद्यार्थ्यांपर्यंतच ऑनलाईन शिक्षण पोहोचले. उर्वरित ४० टक्के विद्यार्थ्यांच्या पालकांकडे स्मार्ट फोन नसल्याची माहिती पुढे आली आहे.

नागभीड तालुक्यातील बऱ्याच ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांकडे हलाखीची परिस्थिती असल्यामुळे पालकांकडे स्मार्टफोनच नाही. ज्यांच्या घरी एक मोबाईल आहे, त्याठिकाणी दोन मुले शिक्षण घेत आहेत. त्यांनाही अडचणी निर्माण झाल्या आहेत. एकंदरीत मागच्या वर्षीचे शिक्षण कसेबसे पूर्ण केले. यंदा पुन्हा ऑनलाईन शिक्षणाने शिक्षकांसह पालकांसमोरही मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी ‘कुणी मोबाईल देता काय मोबाईल’, असे म्हणण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे.

कोरोना संसर्गामुळे शाळा सुरू नसल्या तरी ऑनलाईन शिक्षण सर्वत्र सुरू आहे; परंतु निम्म्या विद्यार्थ्यांपर्यंतच ऑनर्म्इन शिक्षण पोहोचत आहे. त्यातही ग्रामीण भागात मोबाईल शेतात आणि विद्यार्थी घरी, अशी परिस्थिती आहे. परिसरातील नामांकित खासगी शाळा तसेच जिल्हा परिषद शाळेतून गृहपाठ, तसेच सेतू अभ्यासक्रम शाळेच्या व्हॉट्स-ॲप ग्रुपवर पाठवून शिक्षण पूर्ण केले जात आहे. मात्र इतर विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नाही. अशा विद्यार्थ्यांना अध्ययन करण्यासाठी अडचणी येत आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांकडे मोबाईल नसल्याने विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईन शिक्षण पोहोचत नाही.

बॉक्स

ऑनलाईन शिक्षणातील अशा आहेत अडचणी

१) ग्रामीण भागातील पालकांकडे मोबाईल आहेत, तर त्या भागात मोबाईलचे नेटवर्क नाही.

२) पालकांना दीक्षा ॲप व इतर माध्यमाची माहितीच नाही. ‘शाळा बंद, शिक्षण सुरू’ अशा अभ्यासमालेची माहिती नाही.

३) ग्रामीण भागात इंटरनेट सेवा वारंवार विस्कळीत होते.

४) ग्रामीण भागात बऱ्याचदा विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने मोबाईलची बॅटरी पुरत नाही.

कोट

ग्रामीण भागातील बऱ्याच पालकांकडे स्मार्ट फोन नाहीत. तसेच ज्या पालकांकडे स्मार्टफोन आहे, अशा ठिकाणी इंटरनेट सेवा पोहोचत नाही. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण घेण्याकरिता विद्यार्थ्यांना अनेक अडचणी निर्माण होत आहेत.

- संतोष नन्नावार, उपक्रमशील शिक्षक,

लोक विद्यालय तळोधी (बा).

कोट

वीज पुरवठा वारंवार विस्कळीत होत असतो. तसेच आमच्या ग्रामीण परिसरात मोबाईलचे इंटरनेट नेटवर्क नेहमीच कमी असते. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण घेण्यास प्रचंड अडचणी येत आहेत.

- विनोद शेंडे,

पालक, जनकापूर, ता. नागभीड.