शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

कोणी कोविड प्रतिबंधाची लस देता का लस?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:11 IST

जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असून, मृतकांची संख्याही भयानक आहे. त्यामुळ नागरिक आता कोविड-१९ प्रतिबंधक लसीकडे संजीवनी म्हणून केंद्रांकडे धाव ...

जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असून, मृतकांची संख्याही भयानक आहे. त्यामुळ नागरिक आता कोविड-१९ प्रतिबंधक लसीकडे संजीवनी म्हणून केंद्रांकडे धाव घेऊ लागले. जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात कुणी लस घ्यायला तयार नव्हते. केंंद्रातील कर्मचाऱ्यांना सायंकाळी ५ वाजतापर्यंत वाट पाहावी लागत होती. ग्रामीण भागात लसीबाबत अनेक अफवाही पसरविण्यात आल्या. त्यामुळे आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाइन वर्करच लस घेताना पहिल्या टप्प्यात दिसून आले. मार्च महिन्यात मात्र चित्र बदलले. शहरासोबतच ग्रामीण भागातही कोरोनाचा संसर्ग वाढला. परिणामी, नागरिकांमध्ये दहशत पसरली. ज्यांनी लस घेतली. त्यांना कोरोना होऊनही आरोग्यात गुंतागुंतीची समस्या निर्माण झाली नाही, असा निष्कर्ष जिल्हा आरोग्य यंत्रणा व वैद्यकीय तज्ज्ञांनी जाहीर केला. माध्यमांमधून ही माहिती ग्रामीण भागात पसरताच लस घेण्यासाठी केंद्रासमोर प्रचंड गर्दी होऊ लागली. चंद्रपूर शहरात तर सुरुवातीला नोकरदार, व्यावसायिक मध्यवर्गीय नागरिकच लस घेताना दिसून आले. पण सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबांमध्येही कोरोनाची लागण झाल्याने हा समुदाय लसीकरणासाठी केंद्रात रांगा लावू लागली. परंतु, केंद्र सरकारकडून राज्याला पुरेसे डोस मिळत नसल्याने जिल्ह्यातील अनेक केंद्र बंद ठेवावे लागत आहे. ४५ व ६० वर्षांवरील नागरिकांसाठी या आठवड्यात चंद्रपूर शहरात दोन स्वतंत्र केंद्र सुरू केले. पण, प्रत्येक केंद्राला १०० ते ८० डोस देण्यात आल्याने अनेकांना घरी परत जावे लागले.

कोणी काय करायचे?

६० वर्षांवरील नागरिकांना लस घेण्यासाठी उपलब्ध डोसनुसार चंद्रपूर मनपा क्षेत्रात तीन व जिल्ह्यात चार केंद्र तयार तयार केले जात आहेत. केंद्र निश्चित झाल्यानंतर मनपा प्रशासन लसीकरणाचे वेळापत्रक नगरसेवकांमार्फत जनतेकडे पोहोचते. त्यामुळे नागरिकांनी नगरसेवकांशी संपर्क साधावा. ग्रामीण भागात अशी व्यवस्था नाही.

४५ वर्षांवरील नागरिकांसाठीदेखील मनपा हीच पद्धत वापरत आहे. सध्या चंद्रपूर शहर व जिल्ह्यात दोन दिवस लसीकरण होऊ शकेल, एवढाच साठा आहे. डोस जादा मिळालेच तर आरोग्य प्रशासनाकडून नागरिकांपर्यंत माहिती पोहोचली जाते. नागरिकांनीच जागरूक राहून जि. प. लसीकरण अधिकाऱ्यांशी संवाद साधावा.

१८ वर्षांवरील तरुणाईचा हिरमोड

डोस नसल्याने जिल्ह्यात मंगळवारपासून लसीकरण बंद होऊ शकते. १ मे पासून १८ वर्षांवरील तरुणाईसाठी मोहीम सुरू झाली. पण, डोस नाहीत. त्यामुळे चंद्रपुरातील मनपा प्रशासन व ग्रामीण भागातील तरुणाईने ग्रामीण रुग्णालयात संपर्क साधावा.

कोणाला पहिला मिळेना, तर कोणाला दुसरा !

मी दोन दिवसांपासून केंद्रात चकरा मारत आहे. बाबूपेठ येथील केंद्रात १५० लस होत्या. रांगेत लागलो, पण कुपन संपल्याने मला परत यावे लागले. मला पहिला डोसही घेता आला नाही.

-शंकर तिमांडे, बाबूपेठ, चंद्रपूर

अंचलेश्वर वॉर्डातील राजेंद्र प्रसाद प्राथमिक शाळेत लस घेण्यासाठी गेली होती. २०० लोकांची रांग दिसली. मी महिलांच्या रांगेत लागले. माझा नंबर येईपर्यंत लस संपली. लस आल्यानंतर या असे सांगण्यात आले.

-निर्मला चौधरी, अंचलेश्वर वॉर्ड, चंद्रपूर

रामनगर येथील रामचंद्र प्राथमिक शाळेत दुसरा डोस घेण्यासाठी चार दिवसांपासून जात आहे. पण, मला लस मिळाली नाही. डोस कमी येतात आणि घेणारे जास्त असतात. सरकारने ज्येष्ठांची अशी निराशा करू नये.

-प्रभाकर हिवसे, रामनगर, चंद्रपूर

कोट

नागरिकांची अडचण होऊ नये, यासाठी जिल्ह्यात केंद्रांची संख्या वाढविण्यात आली. लस उपलब्ध झाल्यानंतर केंद्रनिहाय वितरण केले जाते. त्यानंतर कोणत्या केंद्रावर लस मिळते, याची माहिती प्रसारित केले जाते. सध्या पुरेसा साठा नाही. पण, बुस्टर डोस घेणाऱ्यांसाठी काही ठिकाणी स्वतंत्र केंद्र सुरू आहेत. डोस उपलब्ध झाल्यानंतर सर्वच केंद्रांवर लसीकरण केल्या जाते.

-डॉ. संदीप गेडाम, जिल्हा लसीकरण अधिकारी, चंद्रपूर