शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

कंपन्यांचे दुकान भरण्यासाठी पीकविमा काढायचा का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:29 IST

चंद्रपूर : नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यानंतर प्रधानमंत्री पीकविमा योजना अंतर्गत विमा कंपन्यांकडून प्रीमियमच्या तुलनेत तुटपुंजा मोबदला मिळत ...

चंद्रपूर : नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यानंतर प्रधानमंत्री पीकविमा योजना अंतर्गत विमा कंपन्यांकडून प्रीमियमच्या तुलनेत तुटपुंजा मोबदला मिळत असल्याने खंदा खरीप हंगामात शेतकऱ्यांनीच विमा काढला आहे. कंपन्यांचे दुकान भरण्यासाठी आम्ही पीक विमा काढायचा का, असाही शेतकऱ्यांचा सवाल आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात खरीप हंगामात कापूस, सोयाबीन व भात उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. विशेषत: राजुरा, भद्रावती, वरोरा, बल्लारपूर, जिवती, कोरपना व गोंडपिपरी तालुक्यात मागील चार वर्षांपासून सोयाबीन व कपाशीचे क्षेत्र वाढत आहे. परिणामी, या तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांचा कल पीकविमा काढण्याकडे असतो. यंदाच्या खरीपातही कापूस, सोयाबीन, भात तसेच कडधान्य लागवडीचे क्षेत्र वाढले. परंतु, विमा कंपन्यांच्या मनमानी कारभारामुळे अल्प मिळत असल्याने शेतकऱ्यांनी विमा काढण्याकडे दुर्लक्ष केल्याचे वास्तव पुढे आले.

बॉक्स

गतवर्षीचा अनुभव वाईट

चंद्रपूर जिल्ह्यात खरीप २०२०-२१ मध्ये ९७ हजार ३४७ शेतकऱ्यांनी २९६ कोटी ५३ लाख ४२ हजार १९३ हजारांची रक्कम विमा कंपनीकडे जमा केली होती. पीक नुकसानीच्या मोबदल्यात ४६ हजार १९७ शेतकऱ्यांना केवळ २६ कोटी २५ लाख ८३ हजार ९२२ हजारांचाच मोबदला देण्यात आला.

बॉक्स

५१ हजार १५० शेतकऱ्यांचा हिरमोड

प्रत्यक्षात प्रीमियम रक्कम आणि मोबदल्याच्या रकमेत प्रचंड तफावत लक्षात आल्याने यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पीकविमा काढण्याकडे दुर्लक्ष केले. कर्जदार शेतकऱ्यांचा विमा हप्ता बँकेतूनच कापण्यात आला, तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांना यंदा मंजुरीपत्र भरून देण्याची अट घालण्यात आली होती. गतवर्षी खरिपातील ६८ हजार ९५९ हेक्टर पीकविमा कक्षेत होते. मात्र, ५१ हजार १५० शेतकरी विम्यातून बाद झाले.

बॉक्स

विमा कंपनीचे स्वतंत्र कार्यालयच नाही

यंदाच्या खरीप हंगामासाठी चंद्रपूर जिल्ह्यात भारती अक्सा जनरल इन्शुरन्स कंपनीची राज्य सरकारने नियुक्ती केली. करारानुसार, हेल्पलाइन सुरू झाले. शेतकऱ्यांच्या संपर्कासाठी कंपनीला स्वतंत्र कार्यालय सुरू करणे बंधनकारक आहे. परंतु, कंपनीचे प्रतिनिधी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयातूनच गाडा हाकत आहेत. प्रतिनिधीशी संपर्क साधला, पण होऊ शकला नाही.