शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
3
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
4
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
5
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
6
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
7
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
8
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
9
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
10
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
11
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
12
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
13
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
14
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
15
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
16
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
17
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
18
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
19
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
20
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 

निकाल लागेपर्यंत लीज देऊ नका

By admin | Updated: April 14, 2017 00:50 IST

भाडेपट्टयाने दिलेल्या जमिनीवर शेतमालकाला कोणतीही माहिती न देता परस्पर उत्खनन करून शेतीचे नुकसान केले जात आहे.

प्रकरण अवैध उत्खननाचे : मुदत संपल्यावरही सुरू होते कामचंद्रपूर : भाडेपट्टयाने दिलेल्या जमिनीवर शेतमालकाला कोणतीही माहिती न देता परस्पर उत्खनन करून शेतीचे नुकसान केले जात आहे. जमीन विकलेली नसतानाही जमिनीचा ताबा देण्यास भाडेकरू नकार देत असल्याने हे प्रकरण न्यायलयात सुरु आहे. त्यामुळे प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत उत्खननासाठी लीज देऊ नये, अशी मागणी नंदोरी (बु.) येथील शेतकरी व्यंकटेश एकरे, मुलगा धनंजय एकरे व अंकुश काळे यांनी केली आहे.भद्रावती तालुक्यातील नंदोरी (खुर्द) येथील सर्व्हे नं. ७८ (जुना ७१) येथील शेतजमीन व्यंकटेश एकरे यांनी चंद्रकांत वासाडे यांना १९८१ ते १९९६ मध्ये भाडेपट्टयाने दिली होती. १९९७ पर्यंत भाडेपट्ट्याचे नुतनीकरण झाले. मात्र त्यानंतर नूतनीकरण न होताही वासाडे यांनी तत्कालीन खनिकर्म अधिकारी रामटेके यांच्याशी संगनमत करून बनावट कागदपत्रांच्या आधारे एप्रिल २००६ पर्यंत लीज काढून उत्खनन सुरू केले होते. हा प्रकार लक्षात आल्यावर शेतमालकाने खनिकर्म विभागाला पत्र देवून उत्खनन थांबविण्याची विनंती केली. चंद्रपूर न्यायालयात दिवाणी दावाही दाखल केला. हस्ताक्षरतज्ज्ञांकडून ही बाब तपासल्यावर खरा प्रकार लक्षात आला. या प्रकरणी वरोरा पोलिसात २३ जानेवारी २००२ ला शेतमालकाने तक्रार दिली. त्यावर काहीच दखल न घेतल्याने पुन्हा २७ जुलै २००२ ला दुसरी तक्रार केल्यावर पोलिसांनी दखल घेतली व वासाडे यांच्यावर गुन्हे नोंदविले. या प्रकरणाचा फौजदारी खटला सध्या सुरू आहे. अशा परिस्थितीतही चंद्रकांत वासाडे यांच्याकडून लीज मिळविण्यचा प्रयत्न केला जात आहे. उत्खनण करताना धुरा आणि डिमार्केशन करणे आवश्यक असते. मात्र उत्खननात शेताचा धुरा आणि अ‍ॅप्रोच रस्ताही आता अस्तित्वात नाही. कसलेही डिमार्केशन नसल्याने नेमके किती उत्खनन झाले याचा अंदाज येणे कठीण आहे. यामुळे त्यांना पुन्हा लीज दिल्यास नियमाचे उल्लंघन होऊन शासनाची लूट होण्याची शक्यता अधिक आहे. आपण स्वत: शेतगालक असून नियमित शेतसाराही भरत आहोत. २०१४ ला दिवाणी न्यायालयाने जमिनीचा ताबा शेतमालकांना देण्याचा निर्णय होऊनही दिला जात नसल्याने न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आहे. प्रशासनाने आपल्याला पुढील १५ दिवसांत न्याय न दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा व्यंकटेश एकरे व मुलगा धनंजय एकरे यांनी दिला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)