शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
3
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
4
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
7
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
8
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
9
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
10
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
11
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
12
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
13
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
14
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
15
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
16
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
17
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
18
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
19
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
20
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे

By admin | Updated: September 21, 2015 00:55 IST

शिक्षण क्षेत्रात प्रचंड उलथापालथ होत असताना आरटीई कायद्याची अंमलबजावणी शिक्षण विभागाकडे असल्यामुळे त्या कायद्याचा सोयीचा अर्थ लावून शासनाने संभ्रम निर्माण केल्याचे दिसून येत आहे.

मागण्या पूर्ण करा : मुख्याध्यापक संघटनेचे आंदोलनचंद्रपूर: शिक्षण क्षेत्रात प्रचंड उलथापालथ होत असताना आरटीई कायद्याची अंमलबजावणी शिक्षण विभागाकडे असल्यामुळे त्या कायद्याचा सोयीचा अर्थ लावून शासनाने संभ्रम निर्माण केल्याचे दिसून येत आहे. २८ आॅगस्ट रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार असाच प्रत्यय आला असून शिक्षणक्षेत्रात असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांच्या समस्या वाढत असून त्या सोडविण्याच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी शनिवारी चंद्रपूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघातर्फे जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.शासनाने २८ आॅगस्ट रोजीचा अध्यादेश निर्गमित करताना ग्रामीण व शहरी विभागातील अडचणी व समस्यांचा कोणताही विचार केला नाही. त्यामुळे या अध्यादेशाविरोधात शिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष खदखत आहे. यामुळे हा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करावा आणि शाळा संहितेनुसार संच मान्यता देण्यात यावी, सरसकट सर्व खासगी माध्यमिक शाळांना मुख्याध्यापक पद मान्य असावे, सहाव्या वेतन आयोगानुसार राज्यातील माध्यमिक शाळा मुख्याध्यापकांना समकक्ष केंद्र शासनाच्या माध्यमिक शाळा उपमुख्याध्यापकांप्रमाणे वेतनश्रेणी मंजूर करावी, शिक्षणमंत्र्यांनी विधिमंडळात मुख्याध्यापकांना अपमानित केल्याबाबतची चित्रफीत सर्वत्र प्रसारीत केली आहे. हे अपमानजक वक्तव्य विधिमंडळाच्या कामकाजातून कमी करण्यात यावे, शैक्षणिक धोरण निश्चितेमुळे मुख्याध्यापक संघाच्या प्रतिनिधींना प्रतिनिधीत्व देण्यात यावे, संच मान्यता २०१२-१३ नुसारच रिक्त पदे भरण्याची परवानगी संस्थेला देण्यात यावी, इयत्ता सहावी ते आठवीला शिकविणाऱ्या पदवीधर शिक्षकांना आरटीईनुसार वेतनश्रेणी देण्यात यावी, यासह इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या. शासनाच्या अन्यायकारक अध्यादेशामुळे ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहून शाळाबाह्य होण्याची भीतीही व्यक्त करीत या अध्यादेशामुळे मराठी शाळांची संख्या कमी होणार असून शिक्षण व्यवस्था कोलमडणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या समस्यांवर सकारात्मक उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सदर मागण्यांचे निवेदन शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री शिक्षण सचिवांना देण्यात आले. या आंदोलनात मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्रीधर फटाले, सचिव राजू साखरकर, पी.एस. उराडे आदी सहभागी झाले. (शहर प्रतिनिधी)