शहरं
Join us  
Trending Stories
1
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
2
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
3
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
4
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
5
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
6
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
7
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
8
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
9
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
10
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
11
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
12
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
13
‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय
14
अग्रलेख: हिंदीचे ओझे कशाला? राजकारण करण्याच्या सवयीने घात झाला
15
प्रियकर खर्चापोटी एक लाख रुपये देणार; अखेर २५ आठवड्यांच्या गर्भपातास हायकोर्टाने दिली परवानगी 
16
Axiom Mission 4: भारताचा शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात
17
Operation Sindhu: इराण, इस्रायलमधून आणखी १,१०० भारतीय मायदेशात, विमान कंपन्यांची मध्य-पूर्वेतील उड्डाणे थांबली
18
आरोग्यसेवेचे मोल शून्य; राज्यातील ३२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा २ महिन्यांचा पगार थकला
19
एसीबीच्या अहवालामुळे  सिडको प्रशासन हादरले, कार्मिक विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
20
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी

जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे

By admin | Updated: September 21, 2015 00:55 IST

शिक्षण क्षेत्रात प्रचंड उलथापालथ होत असताना आरटीई कायद्याची अंमलबजावणी शिक्षण विभागाकडे असल्यामुळे त्या कायद्याचा सोयीचा अर्थ लावून शासनाने संभ्रम निर्माण केल्याचे दिसून येत आहे.

मागण्या पूर्ण करा : मुख्याध्यापक संघटनेचे आंदोलनचंद्रपूर: शिक्षण क्षेत्रात प्रचंड उलथापालथ होत असताना आरटीई कायद्याची अंमलबजावणी शिक्षण विभागाकडे असल्यामुळे त्या कायद्याचा सोयीचा अर्थ लावून शासनाने संभ्रम निर्माण केल्याचे दिसून येत आहे. २८ आॅगस्ट रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार असाच प्रत्यय आला असून शिक्षणक्षेत्रात असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांच्या समस्या वाढत असून त्या सोडविण्याच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी शनिवारी चंद्रपूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघातर्फे जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.शासनाने २८ आॅगस्ट रोजीचा अध्यादेश निर्गमित करताना ग्रामीण व शहरी विभागातील अडचणी व समस्यांचा कोणताही विचार केला नाही. त्यामुळे या अध्यादेशाविरोधात शिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष खदखत आहे. यामुळे हा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करावा आणि शाळा संहितेनुसार संच मान्यता देण्यात यावी, सरसकट सर्व खासगी माध्यमिक शाळांना मुख्याध्यापक पद मान्य असावे, सहाव्या वेतन आयोगानुसार राज्यातील माध्यमिक शाळा मुख्याध्यापकांना समकक्ष केंद्र शासनाच्या माध्यमिक शाळा उपमुख्याध्यापकांप्रमाणे वेतनश्रेणी मंजूर करावी, शिक्षणमंत्र्यांनी विधिमंडळात मुख्याध्यापकांना अपमानित केल्याबाबतची चित्रफीत सर्वत्र प्रसारीत केली आहे. हे अपमानजक वक्तव्य विधिमंडळाच्या कामकाजातून कमी करण्यात यावे, शैक्षणिक धोरण निश्चितेमुळे मुख्याध्यापक संघाच्या प्रतिनिधींना प्रतिनिधीत्व देण्यात यावे, संच मान्यता २०१२-१३ नुसारच रिक्त पदे भरण्याची परवानगी संस्थेला देण्यात यावी, इयत्ता सहावी ते आठवीला शिकविणाऱ्या पदवीधर शिक्षकांना आरटीईनुसार वेतनश्रेणी देण्यात यावी, यासह इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या. शासनाच्या अन्यायकारक अध्यादेशामुळे ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहून शाळाबाह्य होण्याची भीतीही व्यक्त करीत या अध्यादेशामुळे मराठी शाळांची संख्या कमी होणार असून शिक्षण व्यवस्था कोलमडणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या समस्यांवर सकारात्मक उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सदर मागण्यांचे निवेदन शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री शिक्षण सचिवांना देण्यात आले. या आंदोलनात मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्रीधर फटाले, सचिव राजू साखरकर, पी.एस. उराडे आदी सहभागी झाले. (शहर प्रतिनिधी)