शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे

By admin | Updated: September 21, 2015 00:55 IST

शिक्षण क्षेत्रात प्रचंड उलथापालथ होत असताना आरटीई कायद्याची अंमलबजावणी शिक्षण विभागाकडे असल्यामुळे त्या कायद्याचा सोयीचा अर्थ लावून शासनाने संभ्रम निर्माण केल्याचे दिसून येत आहे.

मागण्या पूर्ण करा : मुख्याध्यापक संघटनेचे आंदोलनचंद्रपूर: शिक्षण क्षेत्रात प्रचंड उलथापालथ होत असताना आरटीई कायद्याची अंमलबजावणी शिक्षण विभागाकडे असल्यामुळे त्या कायद्याचा सोयीचा अर्थ लावून शासनाने संभ्रम निर्माण केल्याचे दिसून येत आहे. २८ आॅगस्ट रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार असाच प्रत्यय आला असून शिक्षणक्षेत्रात असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांच्या समस्या वाढत असून त्या सोडविण्याच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी शनिवारी चंद्रपूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघातर्फे जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.शासनाने २८ आॅगस्ट रोजीचा अध्यादेश निर्गमित करताना ग्रामीण व शहरी विभागातील अडचणी व समस्यांचा कोणताही विचार केला नाही. त्यामुळे या अध्यादेशाविरोधात शिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष खदखत आहे. यामुळे हा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करावा आणि शाळा संहितेनुसार संच मान्यता देण्यात यावी, सरसकट सर्व खासगी माध्यमिक शाळांना मुख्याध्यापक पद मान्य असावे, सहाव्या वेतन आयोगानुसार राज्यातील माध्यमिक शाळा मुख्याध्यापकांना समकक्ष केंद्र शासनाच्या माध्यमिक शाळा उपमुख्याध्यापकांप्रमाणे वेतनश्रेणी मंजूर करावी, शिक्षणमंत्र्यांनी विधिमंडळात मुख्याध्यापकांना अपमानित केल्याबाबतची चित्रफीत सर्वत्र प्रसारीत केली आहे. हे अपमानजक वक्तव्य विधिमंडळाच्या कामकाजातून कमी करण्यात यावे, शैक्षणिक धोरण निश्चितेमुळे मुख्याध्यापक संघाच्या प्रतिनिधींना प्रतिनिधीत्व देण्यात यावे, संच मान्यता २०१२-१३ नुसारच रिक्त पदे भरण्याची परवानगी संस्थेला देण्यात यावी, इयत्ता सहावी ते आठवीला शिकविणाऱ्या पदवीधर शिक्षकांना आरटीईनुसार वेतनश्रेणी देण्यात यावी, यासह इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या. शासनाच्या अन्यायकारक अध्यादेशामुळे ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहून शाळाबाह्य होण्याची भीतीही व्यक्त करीत या अध्यादेशामुळे मराठी शाळांची संख्या कमी होणार असून शिक्षण व्यवस्था कोलमडणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या समस्यांवर सकारात्मक उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सदर मागण्यांचे निवेदन शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री शिक्षण सचिवांना देण्यात आले. या आंदोलनात मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्रीधर फटाले, सचिव राजू साखरकर, पी.एस. उराडे आदी सहभागी झाले. (शहर प्रतिनिधी)