शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

जिल्हा चूल आणि धूरमुक्त करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 22:20 IST

जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला शंभर टक्के गॅस कनेक्शन देऊन जिल्ह्याला धूरमुक्त व चूलमुक्त करण्याच्या आपला संकल्प आहे. जंगलावरील अवलंबित्व कमी करून जंगलाशेजारील, ग्रामीण भागातीत प्रत्येक नागरिकांना डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन, वन योजनेअंतर्गत गॅस वितरण करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे वित्त, नियोजन व वन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : विचोडा येथे गॅस, सोलर कुंपण, गमबूट व टॉर्चचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला शंभर टक्के गॅस कनेक्शन देऊन जिल्ह्याला धूरमुक्त व चूलमुक्त करण्याच्या आपला संकल्प आहे. जंगलावरील अवलंबित्व कमी करून जंगलाशेजारील, ग्रामीण भागातीत प्रत्येक नागरिकांना डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन, वन योजनेअंतर्गत गॅस वितरण करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे वित्त, नियोजन व वन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.गॅस वितरण तसेच सोलर कुंपण, गमबूट व टॉर्च वितरणाचा कार्यक्रम विचोडा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार नाना शामकुळे, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे आदींची उपस्थिती होती.पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात शंभर टक्के गॅस कनेक्शन प्रकल्प गतीने सुरू असून त्याअंतर्गत विविध योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक घराला चूलमुक्त, धूरमुक्त करण्यासाठी, लाकूडतोडी पासून जिल्ह्यातील वनसंपत्तीला वाचवण्यासाठी तसेच त्यादरम्यान होणाऱ्या मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या दृष्टिकोनातून गॅस वितरण सुरू आहे.चंद्रपूर तालुक्यातील विचोडा, छोटा नागपूर, पडोली, अंभोरा, ताडाळी, चारगाव व मोरवा या गावांना डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेत समाविष्ट करून घेण्यात आले. या योजनेअंतर्गत गावात विविध सुविधा निर्माण करण्यात येत असून या सात गावातील लाभार्थ्यांना गॅस, सोलर कुंपण, गमबूट व टॉर्च इत्यादी साहित्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते विचोडा येथे वितरण करण्यात आले. यामध्ये २३१ लाभार्थ्यांना एलपीजी गॅस कनेक्शन, ४८१ लाभार्थ्यांना सोलर कुंपण, प्रत्येकी २०० लाभार्थ्यांना गमबूट व टॉर्चचे वाटप करण्यात आले. या माध्यमातून गावांतील महिला धुरापासून सुरक्षित झालेल्या असून गमबूट तसेच टॉर्च वाटप करून शेतकऱ्यांनाही स्वत:चे वन्यप्राण्यांपासून संरक्षण करता येणार आहे.सोलर कुंपणामुळे शेतीचे नुसकान करणाºया वन्यप्राण्यांना आळा घालता येणार आहे. ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले, जिल्ह्याच्या विकासासाठी शक्तीने काम करत असून दिलेला शब्द पूर्ण करण्याचा हट्ट कायम ठेवलेला आहे. वाघ व वन्यप्राणी गावातील शेतीचे खूप नुकसान करतात, अशी माहिती मिळताच सहाही गावे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेत जाणीवपूर्वक समाविष्ट करून घेतली. त्यामुळे या गावांना याचा फायदा होणार आहे.दारूबंदीबद्दल बोलताना त्यांनी सामाजिक सुरक्षिततेकरिता दारूबंदीचे फायदे उपस्थितांना सांगितले. तसेच दारूबंदी ही सामाजिक परिवर्तनासाठी राबवलेली चळवळ असून दारूबंदी जिल्ह्याचे स्वप्न फक्त माझेच नाही, ही तर इथल्या प्रत्येक नागरिकांचे आहे. त्यासाठी गावकºयांनी पुढाकार घेऊन दारूबंदी यशस्वी करण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेचा आदर्श घेऊन चळवळ स्वरूपात राबवावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. शेती विकासासाठी १०० तरुणांची फौज निर्माण करण्यात येत असून त्यांच्या माध्यमातून शेतकºयांना सुदृढ करण्यासाठी प्रशिक्षित करण्यात येणार आहे.अधिकाºयांवर होणार कारवाईमुलगी लग्न होऊन सासरी गेल्यावर आणि घरची मुलं कामासाठी गावाबाहेर गेल्यानंतर घरातील ज्येष्ठ मंडळी एकाकी पडतात. त्यांच्याही मदतीसाठी सरकार योजना आखत आहे. सोबतच वन्यप्राण्यांमुळे शेतीचे नुकसान झाल्यास मिळणारी नुकसान भरपाई पंधरा दिवसात मिळेल, असा शासन निर्णय सरकार लवकरच पारित करेल. जे अधिकारी पंधरा दिवसात शेतकºयाला नुकसान भरपाई प्रदान करणार नाही, अशा अधिकाºयांवर कारवाई करण्यात येईल,अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. सार्वजनिक स्वयंपाकासाठी 10 हजार रुपये किमतीचे भांडे उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी अधिका?्यांना दिल्या.अर्थसंकल्पाबाबत विचार व्यक्त करताना राज्यातील निराधार, विधवा आणि घटस्फोटित महिलांना मिळणारी मदत अत्यल्प असल्यामुळे त्यात वाढ करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.