शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा चूल आणि धूरमुक्त करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 22:20 IST

जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला शंभर टक्के गॅस कनेक्शन देऊन जिल्ह्याला धूरमुक्त व चूलमुक्त करण्याच्या आपला संकल्प आहे. जंगलावरील अवलंबित्व कमी करून जंगलाशेजारील, ग्रामीण भागातीत प्रत्येक नागरिकांना डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन, वन योजनेअंतर्गत गॅस वितरण करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे वित्त, नियोजन व वन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : विचोडा येथे गॅस, सोलर कुंपण, गमबूट व टॉर्चचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला शंभर टक्के गॅस कनेक्शन देऊन जिल्ह्याला धूरमुक्त व चूलमुक्त करण्याच्या आपला संकल्प आहे. जंगलावरील अवलंबित्व कमी करून जंगलाशेजारील, ग्रामीण भागातीत प्रत्येक नागरिकांना डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन, वन योजनेअंतर्गत गॅस वितरण करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे वित्त, नियोजन व वन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.गॅस वितरण तसेच सोलर कुंपण, गमबूट व टॉर्च वितरणाचा कार्यक्रम विचोडा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार नाना शामकुळे, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे आदींची उपस्थिती होती.पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात शंभर टक्के गॅस कनेक्शन प्रकल्प गतीने सुरू असून त्याअंतर्गत विविध योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक घराला चूलमुक्त, धूरमुक्त करण्यासाठी, लाकूडतोडी पासून जिल्ह्यातील वनसंपत्तीला वाचवण्यासाठी तसेच त्यादरम्यान होणाऱ्या मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या दृष्टिकोनातून गॅस वितरण सुरू आहे.चंद्रपूर तालुक्यातील विचोडा, छोटा नागपूर, पडोली, अंभोरा, ताडाळी, चारगाव व मोरवा या गावांना डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेत समाविष्ट करून घेण्यात आले. या योजनेअंतर्गत गावात विविध सुविधा निर्माण करण्यात येत असून या सात गावातील लाभार्थ्यांना गॅस, सोलर कुंपण, गमबूट व टॉर्च इत्यादी साहित्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते विचोडा येथे वितरण करण्यात आले. यामध्ये २३१ लाभार्थ्यांना एलपीजी गॅस कनेक्शन, ४८१ लाभार्थ्यांना सोलर कुंपण, प्रत्येकी २०० लाभार्थ्यांना गमबूट व टॉर्चचे वाटप करण्यात आले. या माध्यमातून गावांतील महिला धुरापासून सुरक्षित झालेल्या असून गमबूट तसेच टॉर्च वाटप करून शेतकऱ्यांनाही स्वत:चे वन्यप्राण्यांपासून संरक्षण करता येणार आहे.सोलर कुंपणामुळे शेतीचे नुसकान करणाºया वन्यप्राण्यांना आळा घालता येणार आहे. ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले, जिल्ह्याच्या विकासासाठी शक्तीने काम करत असून दिलेला शब्द पूर्ण करण्याचा हट्ट कायम ठेवलेला आहे. वाघ व वन्यप्राणी गावातील शेतीचे खूप नुकसान करतात, अशी माहिती मिळताच सहाही गावे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेत जाणीवपूर्वक समाविष्ट करून घेतली. त्यामुळे या गावांना याचा फायदा होणार आहे.दारूबंदीबद्दल बोलताना त्यांनी सामाजिक सुरक्षिततेकरिता दारूबंदीचे फायदे उपस्थितांना सांगितले. तसेच दारूबंदी ही सामाजिक परिवर्तनासाठी राबवलेली चळवळ असून दारूबंदी जिल्ह्याचे स्वप्न फक्त माझेच नाही, ही तर इथल्या प्रत्येक नागरिकांचे आहे. त्यासाठी गावकºयांनी पुढाकार घेऊन दारूबंदी यशस्वी करण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेचा आदर्श घेऊन चळवळ स्वरूपात राबवावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. शेती विकासासाठी १०० तरुणांची फौज निर्माण करण्यात येत असून त्यांच्या माध्यमातून शेतकºयांना सुदृढ करण्यासाठी प्रशिक्षित करण्यात येणार आहे.अधिकाºयांवर होणार कारवाईमुलगी लग्न होऊन सासरी गेल्यावर आणि घरची मुलं कामासाठी गावाबाहेर गेल्यानंतर घरातील ज्येष्ठ मंडळी एकाकी पडतात. त्यांच्याही मदतीसाठी सरकार योजना आखत आहे. सोबतच वन्यप्राण्यांमुळे शेतीचे नुकसान झाल्यास मिळणारी नुकसान भरपाई पंधरा दिवसात मिळेल, असा शासन निर्णय सरकार लवकरच पारित करेल. जे अधिकारी पंधरा दिवसात शेतकºयाला नुकसान भरपाई प्रदान करणार नाही, अशा अधिकाºयांवर कारवाई करण्यात येईल,अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. सार्वजनिक स्वयंपाकासाठी 10 हजार रुपये किमतीचे भांडे उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी अधिका?्यांना दिल्या.अर्थसंकल्पाबाबत विचार व्यक्त करताना राज्यातील निराधार, विधवा आणि घटस्फोटित महिलांना मिळणारी मदत अत्यल्प असल्यामुळे त्यात वाढ करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.