शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

सामूहिक वनहक्क दाव्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल

By admin | Updated: September 7, 2015 01:11 IST

भद्रावती तालुक्यातील अनेक गावांनी वनहक्क कायद्यानुसार कायदेशिर प्रक्रिया करुन सामूहिक वनहक्क दावे दोन वर्षापूर्वी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात सादर केले.

अडचणी होणार दूर : खुटवंडा, सितारामपेठ, घोसरी, कोढेगाव येथील दावेवडाळा (तु.) : भद्रावती तालुक्यातील अनेक गावांनी वनहक्क कायद्यानुसार कायदेशिर प्रक्रिया करुन सामूहिक वनहक्क दावे दोन वर्षापूर्वी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात सादर केले. आजमितीस सदर दावे कार्यालयातूनच गहाळ असल्याने ही गंभीर बाब आमदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन उघडकीस आणली. या पत्राची जिल्हाधिकारी यांनी दखल घेतली असून कार्यवाही सुरू केल्याचे पत्र आमदार धानोरकर यांना पाठविले आहे.अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्क मान्य करणे) अधिनियम २००६ व नियम २००८ आणि सुधारणा अधिनियम २०१२ नुसार संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन भद्रावती तालुक्यातील चिचोली, वडाळा (तु.), घोसरी, सितारामपेठ, कोंढेगाव व खुटवंडा या गावातील सामूहिक वनहक्क दावे क्रमाकमाने दोन वर्षांपूर्वी उपविभागस्तरीय वनहक्क समिती वरोरा यांच्या कार्यालयात सादर केले. यातील चिचोली येथील सामूहिक वनहक्क दावा उपविभागीय स्तरीय वनहक्क समितीच्या सभेत मान्य करण्यात आला. त्याच सभेत उपस्थित असलेल्या वनविभागातील अधिकाऱ्यांच्या प्रभावाखाली बेकायदेशीर, निरर्थक, निराधारपणाने दावा अमान्य करण्यात आला. त्या निर्णयाच्या विरोधात कायद्यातील तरतुदीनुसार ग्रामसभेने जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हास्तरीय वनहक्क समिती चंद्रपूर यांच्याकडे पुराव्यासह अपिल सादर केले. घोसरी, सितारामपेठ, कोंढेगाव, खुटवंडा येथील दाव्यावर अजूनपर्यंत उपविभागस्तरीय वनहक्क समितीकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. सहारी गावातील ग्रामस्थांनी वेळोवेळी संबंधित उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला. परंतु त्याचाही उपयोग झाला नाही. त्यामुळे सहाही गावातील ग्रामस्थांनी आमदार बाळू धानोरकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली. आमदार धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उपविभागीय अधिकारी यांच्या सोबत बैठक घेतली. सहाही सामूहिक वनहक्क दाव्यांच्या उपविभागीय कार्यालयात पत्ताच लागत नसल्याने सदर दावे गहाळ झाल्याचे सांगण्यात आले. ही बाब अत्यंत गंभीर असल्याने आमदार धानोरकर यांनी त्वरित जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना सदर प्रकरणाची चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करावी आणि वनहक्क दावे प्राप्त करण्यासाठी मदत करण्याचे लेखी पत्र दिले. आमदारांच्या पत्राची जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरीत दखल घेऊन प्रकरणाची कारवाई सुरू केली. मौजा वडाळा (तु.) येथील वनहक्क दावा प्रकरणात उपविभागस्तरीय समिती वरोरा यांनी दावा नामंजूर केला असल्यामुळे जिल्हास्तरावर अपिल प्राप्त झाली आहे. (वार्ताहर) प्रलंबित दाव्यांवर कार्यवाही सुरूखुटवंडा, घोसरी, कोंढेगाव व सितारामपेठ येथील दावे तहसीलदार भद्रावती यांनी ३ फेब्रुवारी २०१५ ला वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे कारवाई करण्याकरिता पाठविण्यात आले आहे. चिचोली व इतर चार प्रकरणे एसडीओ वरोरा यांच्याकडे निर्णयाकरिता पाठविल्याचे पत्रात म्हटले आहे.