शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायती १.९५ कोटींपासून वंचित

By admin | Updated: June 16, 2014 23:25 IST

पर्यावरण ग्राम समृद्धी योजनेत जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायती पात्र ठरूनही त्यांच्यासाठी आलेला निधी मात्र गावांपर्यंत पोहचलाच नाही. पर्यायाने या गावांवर या योजनेपासून वंचित राहण्याची पाळी आली आहे.

चंद्रपूर : पर्यावरण ग्राम समृद्धी योजनेत जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायती पात्र ठरूनही त्यांच्यासाठी आलेला निधी मात्र गावांपर्यंत पोहचलाच नाही. पर्यायाने या गावांवर या योजनेपासून वंचित राहण्याची पाळी आली आहे.दरम्यान, या प्रकाराला उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) विवेक बोंद्रे हे जबाबदार असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य विनोद अहीरकर यांनी केला आहे.ग्राम विकास कार्यक्रमांतर्गत पर्यावरण ग्राम समृद्धी योजनेच्या अंमलबजावणीसाठी चंद्रपूर जिल्हा परिषदेला निधी देण्यात आला होता. तिसऱ्या वर्षातील पात्र ग्रामपंचायतींसाठी हा एक कोटी ९५ लाख रूपयांचा निधी आला होता. या निधीच्या वितरणाचे आदेश तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ३ फेब्रुवारीला दिले होते. त्यानुसार विवेक बोंदे्र यांनी शासनाच्या बीडीएस प्रणालीतून ही रक्कम काढली. मात्र मात्र त्याचे देयक सादर करून चंद्रपूर कोषागारातून ती रक्कमच काढली नाही. परिणामत: जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामपंचायतींना या रकमेचे वाटप करता आले नसल्याची बाब उघडकीस आली आहे.हा प्रकार लक्षात आल्यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बोंद्रे यांच्यावर १६ जूनला कारणे दाखवा नोटीस बजावला असून तीन दिवसात उत्तर मागितले आहे. त्यात, ही रक्कम अर्थसंकल्पिय प्रणालीमध्ये प्रलंबित दिसत असल्याचे म्हटले आहे. शासनाकडून या अखर्चित निधीबद्दल विचारणा झाली असून या निधीचा उपयोग जिल्हा परिषदेला करता न आल्याचा ठपका शासनाकडून ठेवण्यात आला आहे. या नोटीसला विवेक बोंद्रे काय उत्तर देतात, हे महत्वाचे आहे. (जिल्हा प्रतिनिधी)