शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
4
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
5
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
6
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
7
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
8
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
9
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
10
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
11
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
12
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
13
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
14
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
15
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
16
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
17
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
18
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
19
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
20
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?

जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायती १.९५ कोटींपासून वंचित

By admin | Updated: June 16, 2014 23:25 IST

पर्यावरण ग्राम समृद्धी योजनेत जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायती पात्र ठरूनही त्यांच्यासाठी आलेला निधी मात्र गावांपर्यंत पोहचलाच नाही. पर्यायाने या गावांवर या योजनेपासून वंचित राहण्याची पाळी आली आहे.

चंद्रपूर : पर्यावरण ग्राम समृद्धी योजनेत जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायती पात्र ठरूनही त्यांच्यासाठी आलेला निधी मात्र गावांपर्यंत पोहचलाच नाही. पर्यायाने या गावांवर या योजनेपासून वंचित राहण्याची पाळी आली आहे.दरम्यान, या प्रकाराला उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) विवेक बोंद्रे हे जबाबदार असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य विनोद अहीरकर यांनी केला आहे.ग्राम विकास कार्यक्रमांतर्गत पर्यावरण ग्राम समृद्धी योजनेच्या अंमलबजावणीसाठी चंद्रपूर जिल्हा परिषदेला निधी देण्यात आला होता. तिसऱ्या वर्षातील पात्र ग्रामपंचायतींसाठी हा एक कोटी ९५ लाख रूपयांचा निधी आला होता. या निधीच्या वितरणाचे आदेश तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ३ फेब्रुवारीला दिले होते. त्यानुसार विवेक बोंदे्र यांनी शासनाच्या बीडीएस प्रणालीतून ही रक्कम काढली. मात्र मात्र त्याचे देयक सादर करून चंद्रपूर कोषागारातून ती रक्कमच काढली नाही. परिणामत: जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामपंचायतींना या रकमेचे वाटप करता आले नसल्याची बाब उघडकीस आली आहे.हा प्रकार लक्षात आल्यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बोंद्रे यांच्यावर १६ जूनला कारणे दाखवा नोटीस बजावला असून तीन दिवसात उत्तर मागितले आहे. त्यात, ही रक्कम अर्थसंकल्पिय प्रणालीमध्ये प्रलंबित दिसत असल्याचे म्हटले आहे. शासनाकडून या अखर्चित निधीबद्दल विचारणा झाली असून या निधीचा उपयोग जिल्हा परिषदेला करता न आल्याचा ठपका शासनाकडून ठेवण्यात आला आहे. या नोटीसला विवेक बोंद्रे काय उत्तर देतात, हे महत्वाचे आहे. (जिल्हा प्रतिनिधी)