शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

हजार ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार

By admin | Updated: March 12, 2017 01:37 IST

जिल्ह्यातील सुमारे एक हजार ग्रामपंचायत सदस्य अपात्र फेऱ्यात अडकले आहेत. दीड वर्ष होऊनही त्यांनी आपले

 ५०० अर्ज प्रलंबित : जातवैधता प्रमाणपत्राअभावी जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस मिलिंद कीर्ती  चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे एक हजार ग्रामपंचायत सदस्य अपात्र फेऱ्यात अडकले आहेत. दीड वर्ष होऊनही त्यांनी आपले जातवैधता प्रमाणपत्र (व्हॅलिडीटी) सादर केलेले नाही. त्या सर्व सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे. सुनावणीदरम्यान, त्यांनी समाधानकारक उत्तर सादर न केल्यास सदस्यासाठी अपात्र घोषित केले जाणार आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. तर ४० ग्रामपंचायत सदस्यांनी न्यायालयातून स्थगनादेश मिळविला आहे. जिल्ह्यात गेल्या महिन्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत राखीव जागांवर निवडणूक लढविणाऱ्या सदस्यांनी जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी समाज कल्याण विभागाच्या आणि आदिवासी विकास विभागाच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे प्रस्ताव सादर केले आहेत. निवडणुकीत विजयी झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत त्यांना आपले जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. या प्रमाणेच जिल्ह्यात दीड वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांनाही सहा महिन्यांची मुदत देण्यात आली होती. जिल्ह्यात सुमारे ८२७ ग्रामपंचायती आहेत. त्यामध्ये विजयी झालेल्या सदस्यांची संख्या सुमारे ६ हजार ७०० आहे. त्यापैकी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्गातील सदस्यांना सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करायचे होते. सहा महिन्यांची मुदत संपून आता एक वर्षाचा कालावधी झाला आहे. तालुका निवडणूक अधिकाऱ्यांनी या मागास प्रवर्गातील सदस्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याबाबत वेळोवेळी सूचना दिली. परंतु दीड वर्षानंतरही ग्रामपंचायत सदस्यांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यामुळे त्यांना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी नोटीस बजावली आहे. त्याची सुनावणी सुरू करण्यात आली आहे. अपात्रतेची प्रक्रिया सुरू जिल्हाधिकाऱ्यांनी हजारावर ग्रामपंचायत सदस्यांना नोटीस देऊन जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास बजावले होते. त्यापैकी काही सदस्यांनी आपले जातवैधता प्रमाणपत्र सादर केले. तर ४० सदस्यांनी न्यायालयात धाव घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या नोटीसवर स्थगनादेश मिळविला आहे. ते स्थगनादेश मिळविणारे सदस्य वगळता उर्वरित एक हजार सदस्यांची जिल्हाधिकारी सलील यांनी सुनावणी सुरू केली आहे. त्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर न करण्याचे ठोस कारण विचारण्यात येत आहे. तसेच जे हे प्रमाणपत्र सादर करण्यास अयशस्वी ठरत आहेत. त्यांची यादी तयार करण्यात येत आहे. त्या सदस्यांविरोधात मार्च महिन्याच्या शेवटी कारवाई केली जाणार आहे. जात पडताळणी समितीकडे प्रस्ताव प्रलंबित अनुसूचित जाती आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गातील ग्रामपंचायत सदस्यांनी समाज कल्याण विभागाच्या जात पडताळणी समितीकडे जातवैधता प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव सादर केले आहेत. नोव्हेंबर महिन्यात निवडणुकीसंबंधी ४२५ प्रकरणे प्रलंबित होती. त्यामध्ये बहुसंख्य प्रकरणे ग्रामपंचायत सदस्यांची आहेत. काही प्रकरणांमध्ये जात पडताळणी समितीच्या सचिव व सदस्यांने सही केल्यानंतरही अध्यक्षांनी तांत्रिक दोष काढून ते प्रस्ताव अडवून ठेवल्याची माहिती आहे. या प्रमाणेच आदिवासी विभागाच्या जात पडताळणी समितीकडेही आदिवासी समाजातील ग्रामपंचायत सदस्यांची प्रकरणे प्रलंबित आहेत. आदिवासी खात्याच्या जात पडताळणी समितीच्या कारभारात समाज कल्याणपेक्षाही अधिक गोंधळ आहे. ५० वर्षांपूर्वीचे पुरावे नाहीत जिल्ह्यातील कोरपना, पोंभुर्णा आणि जिवती तालुक्यातील बहुसंख्य नागरिकांकडे ५० वर्षांपूर्वीचे महसूल पुरावे उपलब्ध नाहीत. या तालुक्यातील नागरिक मराठवाड्यातून रोजगाराच्या शोधार्थ चंद्रपूर जिल्ह्यात आले. ते येथेच स्थायिक झाले. त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात वसाहत केल्यानंतर त्यांच्या वारसांकडे चंद्रपूर जिल्ह्यातील पुरावे नाहीत. परिणामी त्यांना जातवैधता प्रमाणपत्र मिळणे कठिण जात आहे. त्यांचे मूळ मराठवाड्यात असून तेथेदेखील अनेकांना ५० वर्षांपूर्वीचे पुरावे उपलब्ध होत नाहीत. त्यातील ग्रामपंचायत सदस्यांना जातवैधता सादर करण्यासाठी ५० वर्षांपूर्वीचा दाखला मिळालेला नाही. त्या सर्वांवर अपात्र ठरण्याची पाळी येणार आहे.