शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
ICAI CA Toppers 2025: मुंबईचा राजन काब्रा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
3
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
4
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
5
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
6
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
7
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
8
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
9
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
10
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
11
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
12
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
13
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
14
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
15
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
16
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
17
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
18
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
19
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
20
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)

तंटामुक्त समित्यांना निधीअभावी घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:27 IST

राजकुमार चुनारकर चिमूर : निधीअभावी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. जिल्ह्यातील अनेक गावांतील तंटामुक्त समित्यांना ...

राजकुमार चुनारकर

चिमूर : निधीअभावी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. जिल्ह्यातील अनेक गावांतील तंटामुक्त समित्यांना काहीच अर्थ राहिला नसून त्यांना हळूहळू घरघर लागल्याचे चित्र दिसत आहे.

काही गावांत मरगळलेल्या ठिकाणी अध्यक्षांनी राजीनामेही दिले आहेत. या समित्यांना पूर्वीप्रमाणे निधी देण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

गावात, शांतता नांदावी, छोट्या-छोट्या कारणांवरून होणाऱ्या तंट्यांचे पर्यवसान मोठ्या भांडणात होऊ नये, वादामध्ये मालमत्ता अडकून त्यातून आर्थिक नुकसान होऊ नये, काही ठिकाणी प्रशासनाचे सहकार्य घ्यावे व भांडणे गावातच मिटावीत आदी कारणांसाठी या समित्या स्थापन केल्या गेल्या. सध्या शासनाने तंटामुक्त

समित्यांना निधीच देण्याचे बंद केल्याने समित्या केवळ कागदोपत्रीच राहिल्या आहेत.

महत्त्वाचे म्हणजे, बहुतांश गावांतील तंटामुक्त अध्यक्षांनी राजीनामे दिले आहेत व काहीजण देण्याच्या तयारीत आहेत.

महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांची स्थापना तत्कालीन मंत्री आर. आर. पाटील यांनी १५ ऑगस्ट २००७ मध्ये केली होती. गावाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात तंटामुक्त समितीला सुरुवातीला निधी देण्यात आला. त्यामुळे तंटामुक्त समित्या जोमात होत्या. सध्या निधीअभावी तंटामुक्त समित्या कोमात चालल्या असून पूर्वीप्रमाणे निधी द्यावा, अशी मागणी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांनी केली आहे. समित्यांना निधी नसल्याने काही गावात या पदाच्या निवडीही थांबल्या असल्याचे दिसत आहे. मागील काही महिन्यांत गृहविभागाने तंटामुक्त समितीमध्ये काही दुरुस्त्या करून समितीत जास्तीत जास्त महिलांचा समावेश व्हावा, असा प्रस्ताव तयार केला मात्र या दुरुस्ती निधीची तरतूद केली नसल्याचे समजते.

बॉक्स

योजनेत मिटतात चार प्रकारचे तंटे

या योजनेत सर्वसाधारणपणे चार प्रकारचे तंटे मिटवले जातात. यामध्ये दिवाणी प्रकारात स्थावर मालमत्तेचे मालकी हक्क, वाटप हस्तांतर, वारसा हक्क, महसुली प्रकारात शेतीची मालकी, महसुली हक्क, अतिक्रमणे कूळ कायदा तर फौजदारीमध्ये फसवणुकीसह सरकार क्षेत्राचाही समावेश आहे. सर्व तंटे मिटवण्यासाठी प्रोत्साहन म्हणून समित्यांना निधी देणे आवश्यक आहे. तंटामुक्त समितीचा निधी शासनाने बंद केल्यामुळे तंटामुक्त समितीमध्ये मरगळ आली आहे. गावात शांतता नांदण्यासाठी या समित्या आवश्यक असून समित्यांना तत्काळ निधीची तरतूद करून देऊन या समित्यांचे काम पुढे चालू करावे, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.