शहरं
Join us  
Trending Stories
1
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
2
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
3
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
4
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
5
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
6
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
7
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
8
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
9
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
10
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
11
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
12
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
13
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
14
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
15
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
16
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
17
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
18
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
19
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
20
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...

८५ विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण

By admin | Updated: January 23, 2017 00:42 IST

जनता महाविद्यालय येथील सभागृहामध्ये दोन दिवसीय ‘आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाचे’ गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत विद्यार्थी कल्याण विभागाच्या वतीने आयोजन केले होते.

प्रात्यक्षिकाद्वारे प्रबोधन : गोंडवाना विद्यापीठाचा उपक्रमचंद्रपूर : जनता महाविद्यालय येथील सभागृहामध्ये दोन दिवसीय ‘आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाचे’ गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत विद्यार्थी कल्याण विभागाच्या वतीने आयोजन केले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये जनता महाविद्यालयाच्या २२ विद्यार्थ्यांना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या १९, कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय येथील २०, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथील २४ विद्यार्थ्यांनी अशा ८५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने जनजागृती निर्माण व्हावी, हा उद्देश समोर ठेवून गोंडवाना विद्यापीठाने आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण योजना राबविण्याचे ठरविले होते. कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे उपस्थित होते. डॉ. जीवतोडे यांनी भाषणातून आपत्ती व्यवस्थापन मानवाच्या जीवनात किती गरजेचे आहे, याचे महत्त्व पटवून दिले. तसेच अध्यक्षीय भाषणातून डॉ. एम. सुभाष यांनी मानवी जीवनात सातत्याने आपत्ती येत असतात. या आपत्तीचे निराकरण नियोजन पूर्वक केल्यास त्या आपत्तीची तीव्रता आपण कमी करू शकतो, हे पटवून दिले. प्रमुख अतिथी उपविभागीय पोलीस अधिकारी डी.एम. घुगे यांनी आपत्तीपूर्वी आपत्तीच्या काळात किंवा आपत्तीच्या नंतर विद्यार्थ्यांनी एकमेकांना मदत करण्यास सज्ज राहावे. त्यामुळे आपत्तीची तीव्रता किंवा हानी कमी होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक विद्यार्थी कल्याण विभाग अधिकारी डॉ. जी.ए. शंभरकर यांनी केले. उद्घाटन कार्यक्रमास डॉ. मिलिंद जांभूळकर, डॉ. किशोर ठाकरे, प्रा. आय.एस. कोंड्रा आदी उपस्थित होते. आपत्ती व आपतकालीन व्यवस्थापन या विषयावर मुख्य अग्निशमन अधिकारी डी.ए. ढोमणे यांनी मार्गदर्शन केले. द्वितीय सत्रामध्ये ‘आपत्ती व्यवस्थापन कायदे, नियम आणि प्रथमोपचार’, या विषयासंबंधी प्रा. दिलीप रामटेके आणि सामाजिक कार्यकर्ते संजय वैद्य यांनी व्यक्त केले. ‘आपत्ती व्यवस्थापन पूर आणि आग’, या विषयासंबंधी डॉ. योगेश्वर दुधपचारे आणि डॉ. वाय. बी. गेडाम यांनी विचार मांडले. ‘आपत्ती व्यवस्थापन आणि सामाजिक बांधिलकी’, या विषयावर पर्यावरणाचे अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे व सार्डचे अध्यक्ष प्रकाश कांबळे यांनी मार्गदर्शन केले. अंकुश अवथे यांनी आपत्तीचे प्रथमोपचार करण्याबाबत प्रात्यक्षिके करून दाखविले.समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एम. सुभाष होते. प्रमुख अतिथी डॉ. महेश वानखेडे व प्राचार्य डॉ. राजेश दहेगांवकर उपस्थित होते. संचालन अरविंद तिरणकर व आभार प्रदर्शन डॉ. पीयूष मेश्राम यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन सुरवाडे, दिनेश चामाटे, राकेश कन्नाके, गणेश नैताम, विजय भगत, अविनाश घटे यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)