शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
2
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
3
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
4
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
5
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
6
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
7
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
8
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
9
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
10
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
11
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
12
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
13
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
14
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
15
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
16
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
17
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
18
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
19
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
20
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 

जलवाहिनीतील व्हॉल्वच्या टाक्यात घाणीचे साम्राज्य

By admin | Updated: July 12, 2015 01:17 IST

इरई धरणातून चंद्रपूर शहराच्या जलशुद्धीकरण केंद्राला जलवाहिनीद्वारे पाण्याचा पुरवठा होतो. वीज केंद्राच्या मेजर गेटपुढे यावर बसविलेल्या एका व्हॉल्वचे टाके उघड्यावर पडले आहे.

पाणी दूषित: अनेक दिवसांपासून प्रशासनाचे दुर्लक्षदुर्गापूर : इरई धरणातून चंद्रपूर शहराच्या जलशुद्धीकरण केंद्राला जलवाहिनीद्वारे पाण्याचा पुरवठा होतो. वीज केंद्राच्या मेजर गेटपुढे यावर बसविलेल्या एका व्हॉल्वचे टाके उघड्यावर पडले आहे. यात घाणीचे साम्राज्य पसरले असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे.चंद्रपूर शहराला इरई धरणातून पाण्याचा पुरवठा केल्या जात आहे. धरणातून पाणी आणण्यासाठी तुकूमस्थित जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत एक मोठी जलवाहिनी टाकण्यात आली आहे. यावर ठिकठिकणी एअर व्हॉल्व्ह शिवाय मुख्य व्हॉल्व बसविले आहेत. त्या सभोवताल सिमेंट क्राँक्रीटच्या टाक्याचे बांधकाम करण्यात आले आहे. असाच एक व्हॉल्व चंद्रपूर-ताडोबा मार्गावर वीज केंद्राच्या मेजर गेट पुढे आहे. याचे बांधकाम करण्यात आले. तेव्हा टाके बंद अवस्थेत होते. मात्र सध्या हे टाके उघड्यावर पडले आहे. यावरील झाकण चोरट्यांनी लंपास केले आहे. यामुळे या टाक्यात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या परिसरात राहणारे नागरिक, व्यावसायिक कचराकुंडीसारखे याच व्हॉल्वमध्ये केरकचरा फेकत आहेत. या टाक्यातील घाण पाणी व्हॉल्वद्वारे जलवाहिनीत शिरुन पाणी दूषित होत आहे. याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. (वार्ताहर)