शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

ग्रामस्वच्छता अभियानाचे उडाले धिंडवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:36 IST

प्रशासनाचे दुर्लक्षित धोरण : गावागावात जनजागृतीची गरज सावली : राज्य शासनाकडून ग्रामीण भागात राबविण्यात येत असलेल्या ग्रामस्वच्छता ...

प्रशासनाचे दुर्लक्षित धोरण : गावागावात जनजागृतीची गरज

सावली : राज्य शासनाकडून ग्रामीण भागात राबविण्यात येत असलेल्या ग्रामस्वच्छता अभियानाकडे तालुका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे तालुक्यात सर्वत्र स्वच्छता अभियानाचा फज्जा उडत असल्याचे चित्र आहे.

गेली दोन वर्षे पंचायत समितीच्यावतीने तालुक्यात शंभर टक्के शौचालय बांधकाम करून तालुका हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प राबविण्यात आला. त्यासाठी गावागावात जनजागृतीही करण्यात आली. जनतेला स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात हागणदारीमुक्त अभियानाला यश मिळाल्याचे दिसत होते. परंतु गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनामुळे या अभियानाकडे प्रशासनाने पाठ फिरविल्याने तालुक्यात हागणदारीमुक्तीसह स्वच्छतेचा फज्जा उडाल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे.

शासनाने अनेकवेळा ‘स्वच्छतेकडून सुरक्षिततेकडे’ असे घोषवाक्य देऊन गावे किती स्वच्छ केली. पण जी गावे स्वच्छ व हागणदारीमुक्त झालेली आहेत, त्या गावातील परिस्थिती विदारक असून ‘हीच का ती स्वच्छ व हागणदारीमुक्त गावे?’ असाही प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. अनेक गावात शौचालय निर्माण झाले खरे, पण त्याचा वापरही योग्य पद्धतीने होत नसून नागरिक उघड्यावर शौचास जाण्यास प्राधान्य देत असल्याचे चित्र दिसते.

बॉक्स

अनेक गावात नावापुरतेच अभियान

अनेक गावांमध्ये केवळ नावापुरतेच अभियान राबविले जात असल्याची चर्चा आहे. ग्रामीण भागात गावात प्रवेश करताक्षणीच अस्वच्छता पहावयास मिळत असून ही बाब प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही माहिती आहे. असे असताना तेसुद्धा याकडे डोळेझाक करीत असल्याचे चित्र आहे. स्वच्छता अभियानात प्रशासनासह नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा आहे. यासाठी प्रशासनाकडून ग्रामस्थांमध्ये जनजागृतीची गरज आहे. त्यामध्ये ग्रामपंचायत प्रशासन, पदाधिकारी यांची भूमिका महत्त्वाची आहे. ग्रामस्थांनीही आपल्या जबाबदारीचे भान ठेवून वागल्यास गावात स्वच्छता राहून विविध आजारांना दूर ठेवता येऊ शकते.