शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
3
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
4
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
5
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
6
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
7
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
8
मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की राग राग होतो? त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या सोप्या टिप्स!
9
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
10
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
11
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
12
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
13
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
14
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
15
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
16
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
17
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
18
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."
19
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
20
चिकनच्या किमतीपेक्षा अंडी झाली महाग, भाज्यांचे दरही गगनाला; बांगलादेशात सगळाच गोंधळ

ग्रामस्वच्छता अभियानाचे उडाले धिंडवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:36 IST

प्रशासनाचे दुर्लक्षित धोरण : गावागावात जनजागृतीची गरज सावली : राज्य शासनाकडून ग्रामीण भागात राबविण्यात येत असलेल्या ग्रामस्वच्छता ...

प्रशासनाचे दुर्लक्षित धोरण : गावागावात जनजागृतीची गरज

सावली : राज्य शासनाकडून ग्रामीण भागात राबविण्यात येत असलेल्या ग्रामस्वच्छता अभियानाकडे तालुका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे तालुक्यात सर्वत्र स्वच्छता अभियानाचा फज्जा उडत असल्याचे चित्र आहे.

गेली दोन वर्षे पंचायत समितीच्यावतीने तालुक्यात शंभर टक्के शौचालय बांधकाम करून तालुका हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प राबविण्यात आला. त्यासाठी गावागावात जनजागृतीही करण्यात आली. जनतेला स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात हागणदारीमुक्त अभियानाला यश मिळाल्याचे दिसत होते. परंतु गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनामुळे या अभियानाकडे प्रशासनाने पाठ फिरविल्याने तालुक्यात हागणदारीमुक्तीसह स्वच्छतेचा फज्जा उडाल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे.

शासनाने अनेकवेळा ‘स्वच्छतेकडून सुरक्षिततेकडे’ असे घोषवाक्य देऊन गावे किती स्वच्छ केली. पण जी गावे स्वच्छ व हागणदारीमुक्त झालेली आहेत, त्या गावातील परिस्थिती विदारक असून ‘हीच का ती स्वच्छ व हागणदारीमुक्त गावे?’ असाही प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. अनेक गावात शौचालय निर्माण झाले खरे, पण त्याचा वापरही योग्य पद्धतीने होत नसून नागरिक उघड्यावर शौचास जाण्यास प्राधान्य देत असल्याचे चित्र दिसते.

बॉक्स

अनेक गावात नावापुरतेच अभियान

अनेक गावांमध्ये केवळ नावापुरतेच अभियान राबविले जात असल्याची चर्चा आहे. ग्रामीण भागात गावात प्रवेश करताक्षणीच अस्वच्छता पहावयास मिळत असून ही बाब प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही माहिती आहे. असे असताना तेसुद्धा याकडे डोळेझाक करीत असल्याचे चित्र आहे. स्वच्छता अभियानात प्रशासनासह नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा आहे. यासाठी प्रशासनाकडून ग्रामस्थांमध्ये जनजागृतीची गरज आहे. त्यामध्ये ग्रामपंचायत प्रशासन, पदाधिकारी यांची भूमिका महत्त्वाची आहे. ग्रामस्थांनीही आपल्या जबाबदारीचे भान ठेवून वागल्यास गावात स्वच्छता राहून विविध आजारांना दूर ठेवता येऊ शकते.