शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

ग्रामस्वच्छता अभियानाचे उडाले धिंडवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:36 IST

प्रशासनाचे दुर्लक्षित धोरण : गावागावात जनजागृतीची गरज सावली : राज्य शासनाकडून ग्रामीण भागात राबविण्यात येत असलेल्या ग्रामस्वच्छता ...

प्रशासनाचे दुर्लक्षित धोरण : गावागावात जनजागृतीची गरज

सावली : राज्य शासनाकडून ग्रामीण भागात राबविण्यात येत असलेल्या ग्रामस्वच्छता अभियानाकडे तालुका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे तालुक्यात सर्वत्र स्वच्छता अभियानाचा फज्जा उडत असल्याचे चित्र आहे.

गेली दोन वर्षे पंचायत समितीच्यावतीने तालुक्यात शंभर टक्के शौचालय बांधकाम करून तालुका हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प राबविण्यात आला. त्यासाठी गावागावात जनजागृतीही करण्यात आली. जनतेला स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात हागणदारीमुक्त अभियानाला यश मिळाल्याचे दिसत होते. परंतु गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनामुळे या अभियानाकडे प्रशासनाने पाठ फिरविल्याने तालुक्यात हागणदारीमुक्तीसह स्वच्छतेचा फज्जा उडाल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे.

शासनाने अनेकवेळा ‘स्वच्छतेकडून सुरक्षिततेकडे’ असे घोषवाक्य देऊन गावे किती स्वच्छ केली. पण जी गावे स्वच्छ व हागणदारीमुक्त झालेली आहेत, त्या गावातील परिस्थिती विदारक असून ‘हीच का ती स्वच्छ व हागणदारीमुक्त गावे?’ असाही प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. अनेक गावात शौचालय निर्माण झाले खरे, पण त्याचा वापरही योग्य पद्धतीने होत नसून नागरिक उघड्यावर शौचास जाण्यास प्राधान्य देत असल्याचे चित्र दिसते.

बॉक्स

अनेक गावात नावापुरतेच अभियान

अनेक गावांमध्ये केवळ नावापुरतेच अभियान राबविले जात असल्याची चर्चा आहे. ग्रामीण भागात गावात प्रवेश करताक्षणीच अस्वच्छता पहावयास मिळत असून ही बाब प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही माहिती आहे. असे असताना तेसुद्धा याकडे डोळेझाक करीत असल्याचे चित्र आहे. स्वच्छता अभियानात प्रशासनासह नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा आहे. यासाठी प्रशासनाकडून ग्रामस्थांमध्ये जनजागृतीची गरज आहे. त्यामध्ये ग्रामपंचायत प्रशासन, पदाधिकारी यांची भूमिका महत्त्वाची आहे. ग्रामस्थांनीही आपल्या जबाबदारीचे भान ठेवून वागल्यास गावात स्वच्छता राहून विविध आजारांना दूर ठेवता येऊ शकते.