महाराष्ट्र शासनाचा निर्णय : कामांना येणार गतीघनश्याम नवघडे नागभीडशासनावर कोणताही अधिकचा भार पडणार नाही या अटीच्या अधिन राहून महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने नागभीड येथे साबां विभागाच्या विभागीय कार्यालयाला मंजुरी दिली आहे. १७ जुलै २०१५ रोजी या विभागाने हा निर्णय घेतला.सार्वजनिक बांधकाम मंडळ चंद्रपूर अंतर्गत असलेले रोहयो (साबां) विभाग चंद्रपूर हे विभागीय कार्यालय नागभीड येथे स्थानांतरित करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती. सद्यस्थितीत या विभागाचे विभागीय कार्यालय चंद्रपूर येथे असून चिमूर, सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी सावली आणि चंद्रपूर हे सहा उपविभाग या विभागांतर्गत आहेत. या विभागापासून उपविभागीय कार्यालयाचे अंतर ८० ते १२५ किमी आहे. त्यामुळे विकास कामांची पाहणी, दर्जा, तपासणी निरीक्षण यावर परिणाम होत आहे. तसेच विभागीय कार्यालयांमध्ये होणाऱ्या बैठकांकरिता व इतर कामाकरिता उपविभागीय अधिकारी कर्मचारी यांना उपस्थित राहणे गैरसोयीचे होत होते. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन शासनावर कोणताही अधिकचा आर्थिक भार पडणार नाही. या अटीच्या अधिन राहून महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने १७ जुलै रोजी ईएसटी २०१५/ प्र.क्र. ७६ या अन्वये नागभीड येथे विभागीय कार्यालयास मंजुरी प्रदान केली आहे. शासनाच्या या निर्णयाचे येथील जनतेने स्वागत केले आहे. नागभीडसाठी जे जे करता येईल ते सर्व करण्याचा आपला प्रयत्न आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे विभागीय कार्यालय हा त्या प्रयत्नाचाच एक भाग आहे. नागभीडच्या विकासासाठी आपण कटीबद्ध आहोत.- कीर्तीकुमार भांगडिया, आमदार, चिमूर
विभागीय कार्यालयाला अखेर मंजुरी
By admin | Updated: July 20, 2015 00:52 IST