शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

विरूर परिसरात डेंग्यू, मलेरियाची साथ

By admin | Updated: September 15, 2015 01:22 IST

आंध्रप्रदेश सीमेवर असलेल्या राजुरा तालुक्यातील विरूर परिसरातील चिंचाळा येथे गेल्या आठ दिवसांपासून डेंग्यू,

विरुर (स्टे.) : आंध्रप्रदेश सीमेवर असलेल्या राजुरा तालुक्यातील विरूर परिसरातील चिंचाळा येथे गेल्या आठ दिवसांपासून डेंग्यू, मलेरियाची साथ पसरली असून संपूर्ण परिसर तापाच्या विळख्यात सापडला आहे. चिंचाळा येथे आठ दिवसांत डेंग्यूसदृश्य आजाराने एकाचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृतामध्ये गावचे पाटील सित्रु मडावी (६०) यांचा समावेश आहे. तर भिमराव वेंकटी कुळमेथे (२२) रा. चिंचाळा याची प्रकृती गंभीर आहे. परिसरातील चार गावे तापाच्या विळख्यात आहे. मात्र याकडे वैद्यकिय अधिकाऱ्यांचे कमालिचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसुन येत आहे.राजुरा तालुक्यातील चिंचाळा, केळझर, भेंडाळा येथे बहुतांशी लोक शेतकरी, आदिवासी गरीब जनता वास्तव्यास आहे. मागील १५ दिवसांपासून परिसरात डेंग्यू मलेरियाची साथ पसरल्याने गरीब रुग्ण खासगी रुग्णालयाचा आसरा घेत असल्याचे दिसुन येत आहे. मात्र याकडे वैद्यकिय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे आदिवासी गरीब जनतेला अधिकचा आर्थिक भुर्दंड बसत आहे. येथुन बारा कि.मी. अंतरावर चिंचोली प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. परंतु अधिकारी उपस्थित नसल्याने रुग्णांना आल्या पावली परतावे लागत आहे. परिणामी परिसरातील आरोग्य सेवा कोलमडली आहे. आता चिंचाळा, केळझर, भेंडाळा येथे तापाची साथ पसरल्याने गावातील प्रत्येक घरी एक दोन रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे गावकरी भयभीत झाले आहेत. आरोग्य विभाग थातुरमातुर उपचार करून रुग्णांना दिलासा देत आहे परंतु रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसुन येत आहे. गावकरी विविध ठिकाणच्या खासगी रुग्णालयात दाखल होत असल्याचे दिसुन येत आहे. चिंचाळा गावात गंगुबाई दौलत गेडाम, भिमराव वेंकटी सिडाम, गंगाधर परचाके, सखुबाई परचाके, देवराव गेडाम, हनुमंतु मडावी, शेखु मारोती मडावी यांच्यासह अनेक रुग्ण खाटेवर पडून आहे. तसेच भेंडाळा येथील मंगेश ढवस, दत्तु ढवस, दादाजी शेळमाके, अविनाश ढवस, छाया ढवस यांचेसह केळझर गावकरी हे तापाने फणफणत आहे.चिंचोली (बु.) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. मात्र अधिकारी व कर्मचारी यांच्या उदासीनतेमुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. (वार्ताहर)सदर व्यक्तीचा मृत्यू नेमका कोणत्या आजाराने व कशामुळे झाला हे आता सांगणे कठीण आहे. सगळीकडे डेंग्यू मलेरियाची साथ सुरू आहे. प्रत्येकांनी परिसर स्वच्छ ठेवावे व शुद्ध पाण्याचा वापर करावा. डासांचा प्रतिबंध करावा, कोरडा दिवस पाळावा, असे गावकऱ्यांना सांगितले. तसेच अबेड व अळीनाशक औषधांची फवारणी केली. रुग्णांना औषधांचे वाटप करण्यात आले.- डॉ. सुनील फुलझले, चिंचोली (बु), प्राथमिक आरोग्य केंद्र