शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

विरूर परिसरात डेंग्यू, मलेरियाची साथ

By admin | Updated: September 15, 2015 01:22 IST

आंध्रप्रदेश सीमेवर असलेल्या राजुरा तालुक्यातील विरूर परिसरातील चिंचाळा येथे गेल्या आठ दिवसांपासून डेंग्यू,

विरुर (स्टे.) : आंध्रप्रदेश सीमेवर असलेल्या राजुरा तालुक्यातील विरूर परिसरातील चिंचाळा येथे गेल्या आठ दिवसांपासून डेंग्यू, मलेरियाची साथ पसरली असून संपूर्ण परिसर तापाच्या विळख्यात सापडला आहे. चिंचाळा येथे आठ दिवसांत डेंग्यूसदृश्य आजाराने एकाचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृतामध्ये गावचे पाटील सित्रु मडावी (६०) यांचा समावेश आहे. तर भिमराव वेंकटी कुळमेथे (२२) रा. चिंचाळा याची प्रकृती गंभीर आहे. परिसरातील चार गावे तापाच्या विळख्यात आहे. मात्र याकडे वैद्यकिय अधिकाऱ्यांचे कमालिचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसुन येत आहे.राजुरा तालुक्यातील चिंचाळा, केळझर, भेंडाळा येथे बहुतांशी लोक शेतकरी, आदिवासी गरीब जनता वास्तव्यास आहे. मागील १५ दिवसांपासून परिसरात डेंग्यू मलेरियाची साथ पसरल्याने गरीब रुग्ण खासगी रुग्णालयाचा आसरा घेत असल्याचे दिसुन येत आहे. मात्र याकडे वैद्यकिय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे आदिवासी गरीब जनतेला अधिकचा आर्थिक भुर्दंड बसत आहे. येथुन बारा कि.मी. अंतरावर चिंचोली प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. परंतु अधिकारी उपस्थित नसल्याने रुग्णांना आल्या पावली परतावे लागत आहे. परिणामी परिसरातील आरोग्य सेवा कोलमडली आहे. आता चिंचाळा, केळझर, भेंडाळा येथे तापाची साथ पसरल्याने गावातील प्रत्येक घरी एक दोन रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे गावकरी भयभीत झाले आहेत. आरोग्य विभाग थातुरमातुर उपचार करून रुग्णांना दिलासा देत आहे परंतु रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसुन येत आहे. गावकरी विविध ठिकाणच्या खासगी रुग्णालयात दाखल होत असल्याचे दिसुन येत आहे. चिंचाळा गावात गंगुबाई दौलत गेडाम, भिमराव वेंकटी सिडाम, गंगाधर परचाके, सखुबाई परचाके, देवराव गेडाम, हनुमंतु मडावी, शेखु मारोती मडावी यांच्यासह अनेक रुग्ण खाटेवर पडून आहे. तसेच भेंडाळा येथील मंगेश ढवस, दत्तु ढवस, दादाजी शेळमाके, अविनाश ढवस, छाया ढवस यांचेसह केळझर गावकरी हे तापाने फणफणत आहे.चिंचोली (बु.) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. मात्र अधिकारी व कर्मचारी यांच्या उदासीनतेमुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. (वार्ताहर)सदर व्यक्तीचा मृत्यू नेमका कोणत्या आजाराने व कशामुळे झाला हे आता सांगणे कठीण आहे. सगळीकडे डेंग्यू मलेरियाची साथ सुरू आहे. प्रत्येकांनी परिसर स्वच्छ ठेवावे व शुद्ध पाण्याचा वापर करावा. डासांचा प्रतिबंध करावा, कोरडा दिवस पाळावा, असे गावकऱ्यांना सांगितले. तसेच अबेड व अळीनाशक औषधांची फवारणी केली. रुग्णांना औषधांचे वाटप करण्यात आले.- डॉ. सुनील फुलझले, चिंचोली (बु), प्राथमिक आरोग्य केंद्र