शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
3
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
4
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
5
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
6
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
7
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
8
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
9
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
10
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
11
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
12
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
13
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
14
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
15
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
16
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
17
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
18
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
19
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
20
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात वाढतेय गुळाच्या चहाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 00:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : काळ बदलत गेला, तसा लोकांच्या खानपान आणि चवीमध्येही मोठ्या प्रमाणात बदल झाला. पूर्वी शहरवासियांना ...

ठळक मुद्देसंडे अँकर । आरोग्यासह लाभ, नागरिकांमध्ये मोठी लोकप्रियता, शहरात अनेक ठिकाणी लागले ठेले

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : काळ बदलत गेला, तसा लोकांच्या खानपान आणि चवीमध्येही मोठ्या प्रमाणात बदल झाला. पूर्वी शहरवासियांना गरिबांच्या घरचा गुळाचा चहा नकोसा वाटत होता. आता गुळाच्या चहाचे घोट आवडीने घेणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. चंद्रपुरातील अनेक भागात ‘स्पेशल गुळाची चहा’ विकणारे दुकाने लागले आहेत. तर नागरिकही मोठ्या आवडीने गुळाची चहा पित आहेत.एकमेकांच्या गाठीभेटी झाल्यानंतर दोघांतील बोलण्याला जास्ते वेळ मिळवून देणारे चहा हे पेय प्रत्येक कुटुंबातील अविभाज्य घटक बनले आहे. एक कप चहा अनेक कामे करून जातो.मात्र, अतिचहामुळे त्यांचे दुष्परिणामही भोगावे लागतात.कोणत्याही कानाकोपºयात चहा सहजपणे आणि प्रत्येकाला परवडणाºया दरात मिळतो. परंतु साखरेची चहा अतिसेवनाने शरीरात शरीरात उष्णताा वाढणे, मधुमेह, आम्लपित्त आणि त्यामुळे सुरू होणारी डोकेदुखी असे अनेक दुष्परिणामही जाणवतात.परंतु, गुळाचा चहा पिल्याने आरोग्यावर कोणतेही दुष्परिणाम होत नाही, असे चहा विक्रेते आणि पिणाऱ्यांचे मत आहे. यामुळे शहरातील गुळाच्या चहाला जादा मागणी असल्याचे चंद्रपूर येथील जयंत टॉकीज समोरील चहा विक्रेते गोविंद (गोपी) मित्रा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.रोज लागतो दोन किलो गुळचंद्रपूर येथील जयंत टॉकीज समोर गोपी मिश्रा यांच्या दुकानात साध्या चहासोबत गुळ चहा सुरु केला. सुरुवातीला अल्प प्रतिसाद होता. मात्र आता चहा पिणाºयांची संख्या वाढत आहे. त्यांना दररोज दीड ते दोन किलो गुड लागतो. दिवसभारात दिडशेच्या जवळपास ग्राहक गुळाची चहा पिऊन समाधान व्यक्त करतात. त्यामुळे आनंद होते असे मित्रा यांनी ‘लोकमत’ला सांगितले.हर्बल चायवातावरणातील बदलामुळे नागरिकांना सर्दी, खोकला असे आजार जडत असतात. त्यासाठी हर्बल चहासुद्धा मिश्रा यांच्या दुकानात मिळतो. हर्बल चहामध्ये लवंग, सुंड, ईलायची, कलमी आदी साहीत्य वापरुन हर्बल चहा बनविला जातो. अनेकजण सर्दीसाठी हा चाय पित असल्याचे मिश्रा यांनी सांगितले.दिवसेंदिवस ग्राहकांची संख्या वाढतेयपूर्वी केवळ साखरेच्या चहाची मागणी होती. मात्र एक दोन ग्राहकांनी गुळाच्या चहाबाबत दुकानामध्ये चर्चा केली. तेव्हापासून गुडाची चहा विक्री सुरु केली. पूर्वी त्याला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. मात्र आता दररोज गुळाच्या चाय पिणाºयांची संख्या वाढत असल्याचे गोपी मित्रा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.