शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

चंद्रपुरात वाढतेय गुळाच्या चहाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 00:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : काळ बदलत गेला, तसा लोकांच्या खानपान आणि चवीमध्येही मोठ्या प्रमाणात बदल झाला. पूर्वी शहरवासियांना ...

ठळक मुद्देसंडे अँकर । आरोग्यासह लाभ, नागरिकांमध्ये मोठी लोकप्रियता, शहरात अनेक ठिकाणी लागले ठेले

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : काळ बदलत गेला, तसा लोकांच्या खानपान आणि चवीमध्येही मोठ्या प्रमाणात बदल झाला. पूर्वी शहरवासियांना गरिबांच्या घरचा गुळाचा चहा नकोसा वाटत होता. आता गुळाच्या चहाचे घोट आवडीने घेणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. चंद्रपुरातील अनेक भागात ‘स्पेशल गुळाची चहा’ विकणारे दुकाने लागले आहेत. तर नागरिकही मोठ्या आवडीने गुळाची चहा पित आहेत.एकमेकांच्या गाठीभेटी झाल्यानंतर दोघांतील बोलण्याला जास्ते वेळ मिळवून देणारे चहा हे पेय प्रत्येक कुटुंबातील अविभाज्य घटक बनले आहे. एक कप चहा अनेक कामे करून जातो.मात्र, अतिचहामुळे त्यांचे दुष्परिणामही भोगावे लागतात.कोणत्याही कानाकोपºयात चहा सहजपणे आणि प्रत्येकाला परवडणाºया दरात मिळतो. परंतु साखरेची चहा अतिसेवनाने शरीरात शरीरात उष्णताा वाढणे, मधुमेह, आम्लपित्त आणि त्यामुळे सुरू होणारी डोकेदुखी असे अनेक दुष्परिणामही जाणवतात.परंतु, गुळाचा चहा पिल्याने आरोग्यावर कोणतेही दुष्परिणाम होत नाही, असे चहा विक्रेते आणि पिणाऱ्यांचे मत आहे. यामुळे शहरातील गुळाच्या चहाला जादा मागणी असल्याचे चंद्रपूर येथील जयंत टॉकीज समोरील चहा विक्रेते गोविंद (गोपी) मित्रा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.रोज लागतो दोन किलो गुळचंद्रपूर येथील जयंत टॉकीज समोर गोपी मिश्रा यांच्या दुकानात साध्या चहासोबत गुळ चहा सुरु केला. सुरुवातीला अल्प प्रतिसाद होता. मात्र आता चहा पिणाºयांची संख्या वाढत आहे. त्यांना दररोज दीड ते दोन किलो गुड लागतो. दिवसभारात दिडशेच्या जवळपास ग्राहक गुळाची चहा पिऊन समाधान व्यक्त करतात. त्यामुळे आनंद होते असे मित्रा यांनी ‘लोकमत’ला सांगितले.हर्बल चायवातावरणातील बदलामुळे नागरिकांना सर्दी, खोकला असे आजार जडत असतात. त्यासाठी हर्बल चहासुद्धा मिश्रा यांच्या दुकानात मिळतो. हर्बल चहामध्ये लवंग, सुंड, ईलायची, कलमी आदी साहीत्य वापरुन हर्बल चहा बनविला जातो. अनेकजण सर्दीसाठी हा चाय पित असल्याचे मिश्रा यांनी सांगितले.दिवसेंदिवस ग्राहकांची संख्या वाढतेयपूर्वी केवळ साखरेच्या चहाची मागणी होती. मात्र एक दोन ग्राहकांनी गुळाच्या चहाबाबत दुकानामध्ये चर्चा केली. तेव्हापासून गुडाची चहा विक्री सुरु केली. पूर्वी त्याला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. मात्र आता दररोज गुळाच्या चाय पिणाºयांची संख्या वाढत असल्याचे गोपी मित्रा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.