शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

चंद्रपूर शहरातील जडवाहतूक कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी

By admin | Updated: November 13, 2014 23:00 IST

शहरातील वाढते अपघात लक्षात घेता शहरातून होणारी जडवाहतूक कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष मनदीप रोडे यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे केली आहे.

चंद्रपूर : शहरातील वाढते अपघात लक्षात घेता शहरातून होणारी जडवाहतूक कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष मनदीप रोडे यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे केली आहे.चंद्रपूर शहरातील प्रमुख महाविद्यालय, हॉस्पीटल, शासकीय तसेच खासगी कार्यालय असलेल्या अत्यंत वर्दळीच्या मार्गावरून नागपूर, बल्लारपूर, मूल, सीटीपीएसकडे जाणारी जडवाहतूक दिवसरात्रं सुरू असल्याने अपघाताच्या घटनांत वाढ झाली आहे. अपघातात युवक, युवती, शाळकरी मुला, मुलींचे नाहक बळी जात आहेत. आतापर्यंत या मार्गावर ५०० पेक्षा अधिक नागरिकांचे जडवाहतुकीमुळे मृत्यू झाले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. परिणामी नागरिकांमध्ये जडवाहतुकीच्याविरोधात संताप निर्माण झाला आहे. नागरिकांच्या भावनांची दखल घेत मनसे शहर अध्यक्ष मनदीप रोडे यांनी यापूर्वी वेळोवेळी अनेक आंदोलन केली आहे. पोलीस प्रशासन जडवाहतुकीमुळे होणाऱ्या अपघाती मृत्यबाबत गंभीर नसल्याने आतापर्यंत शासकीय नियमानुसार जडवाहतुकी विरोधात कारवाई करण्यास कुचराई करीत आहे. जडवाहतुकीमुळे चंद्रपुरतील जनतेचा नाहक बळी जात आहे. वरोरा नाका उडाणपुलाच्या बांधकामामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. चंद्रपुरातील नागपूर रोड, बंगाली कॅम्प, तुकूम रोडवर महाविद्यालय, शाळा, हॉस्पीटल, हॉटेल, शासकीय, खाजगी कार्यालय, व्यापारी प्रतिष्ठान असल्याने रस्त्यावर अत्यंत वर्दळ असते. यात महाविद्यालयीन, शाळेतील तरुण, तरुणी, लहान मुल, मुलींचा समावेश आहे. नागपूर, बल्लारपूर, मूल, सिटीपीेस मार्गाने धावणाऱ्या जडवाहतूक तरुण, शाळकरी मुल, मुलींचा अपघातात बळी घेत आहे. नियमाचे उल्लंघन करून जडवाहतूक सर्रासपणे सुरू आहे. जडवाहतुकीवर ठोस कारवाई केली जात नाही. जडवाहतूकीच्या विरोधात थातूरमातूर कारवाई करून पोलीस प्रशासन कारवाई करीत असल्याचे भासवित आहे. कडक कारवाईचा धाक नसल्याने येथील ट्रान्सपोर्ट मालक निर्ढावले आहेत. अपघाती मृत्यू ही एक मोठी गंभीर समस्या चंद्रपूर शहरवासियांची झाली आहे. अपघाताच्या घटनांवर आळा घालण्याच्या दृष्टीकोनातून मनसेने आतापर्यंत अनेकदा पोलीस प्रशासनाला निवेदन दिले. चंद्रपूर शहरातील मुख्य वर्दळीच्या रस्त्याने जडवाहतुकीस कायमस्वरूपी बंद केल्यास अपघाती मृत्यू टाळता येऊ शकतात, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पोलीस प्रशासन अपघाती मृत्यूबाबत गंभीर नाही, ही बाब चंद्रपुरकरांसाठी अतिशय दुर्दैवाची आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाने जडवाहतूक विरोधात कडक पावले उचलावी, वर्दळीच्या मार्गावरील जडवाहतूक कायमस्वरूपी बंद करावी अशी मागणी मनसच्यावतीने करण्यात आली आहे. कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)