शहरं
Join us  
Trending Stories
1
२०६ च्या एकदम ४४...! सीआयए अन् मोसादनं रचला काँग्रेसला हरवण्याचा कट? माजी खासदाराचा मोठा दावा, काय तर्क दिला? जाणून घ्या
2
कर्नाटक सत्तासंघर्ष : "जनादेश एका क्षणाचा नाही तर पाच वर्षांचा..."; CM-DCM यांचं वाक्युद्ध 
3
इम्रान खान कुठे आहेत? पाकिस्तान संसदेत पीटीआयचा गदारोळ; बहिणी तुरुंगाबाहेच बसून...
4
WPL 2026 Auction : एअरफोर्स ऑफिसर Shikha Pandey वर पैशांची 'बरसात'; ३६ व्या वर्षी विक्रमी बोली
5
"२ तारखेपर्यंत मला युती टिकवायचीय"; शिवसेनेसोबतच्या वादावर रविंद्र चव्हाणांचे मोठे राजकीय संकेत...
6
WPL 2026 Auction : अनुष्का शर्माचं नाव येताच RCB तिच्या मागून धावला! पण खर्च नाही झेपला अन्...
7
“भाजपा पैसे वाटल्याशिवाय जिंकू शकत नाही, भविष्यात महायुती टिकणार नाही”: विजय वडेट्टीवार
8
१०० वर्षांनी पंचग्रही योग, २०२६ला ७ राशींची मनासारखी कमाई; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-लाभ भरभराट!
9
ट्रेनमध्ये प्रवास करताना नेटवर्क का जाते? इंटरनेट का होते स्लो? जाणून घ्या 'या' समस्येवरचा उपाय
10
एकपेक्षा जास्त लग्न करणे गुन्हा...'या' राज्यात विधेयक मंजूर; दंडासह कठोर शिक्षेची तरतूद
11
ॲपल अडकली? भारतात ₹३.२० लाख कोटी दंडाची टांगती तलवार; कायदा बदलला अन्...
12
३०० सीट वाढणार, ४ कोच कायमस्वरुपी जोडले जाणार; वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद
13
मन हेलावून टाकणारी घटना...! पती, पत्‍नी, प्रियकर अन् एक अजब करार...! सर्वत्र होतेय चर्चा 
14
टाटा सिएरा खरेच ₹११.४९ लाखांना मिळणार? नेक्सॉन, हॅरिअरलाच खाऊन टाकणार..., हो, नाही...
15
अरेच्चा! भारतीयांना 'हे' शब्द नीट उच्चारताच येत नाही; तुम्ही Croissant, Ghibli चा उच्चार चुकवता?
16
Hong Kong Fire : अग्निकल्लोळ! हाँगकाँगमध्ये इमारतीला कशी लागली एवढी मोठी आग? ५५ जणांचा मृत्यू, २७९ जण बेपत्ता
17
अजय देवगणच्या अश्लील डीपफेकवर दिल्ली हायकोर्टाचा मोठा आदेश, अभिनेत्यालाही केले सवाल
18
घुसखोरांना मतदानाचा अधिकार द्यायचा का? SIR प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाची महत्वपूर्ण टिप्पणी
19
WPL 2026 Auction : होऊ द्या खर्च! मुंबई इंडियन्सनं Amelia Kerr साठी निम्मी पर्स केली रिकामी
20
याला म्हणतात ढासू शेअर...! 5 वर्षांत 2 रुपयांच्या स्टॉकनं केलं करोडपती, दिला 93806.67% चा बंपर परतावा
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर शहरातील जडवाहतूक कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी

By admin | Updated: November 13, 2014 23:00 IST

शहरातील वाढते अपघात लक्षात घेता शहरातून होणारी जडवाहतूक कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष मनदीप रोडे यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे केली आहे.

चंद्रपूर : शहरातील वाढते अपघात लक्षात घेता शहरातून होणारी जडवाहतूक कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष मनदीप रोडे यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे केली आहे.चंद्रपूर शहरातील प्रमुख महाविद्यालय, हॉस्पीटल, शासकीय तसेच खासगी कार्यालय असलेल्या अत्यंत वर्दळीच्या मार्गावरून नागपूर, बल्लारपूर, मूल, सीटीपीएसकडे जाणारी जडवाहतूक दिवसरात्रं सुरू असल्याने अपघाताच्या घटनांत वाढ झाली आहे. अपघातात युवक, युवती, शाळकरी मुला, मुलींचे नाहक बळी जात आहेत. आतापर्यंत या मार्गावर ५०० पेक्षा अधिक नागरिकांचे जडवाहतुकीमुळे मृत्यू झाले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. परिणामी नागरिकांमध्ये जडवाहतुकीच्याविरोधात संताप निर्माण झाला आहे. नागरिकांच्या भावनांची दखल घेत मनसे शहर अध्यक्ष मनदीप रोडे यांनी यापूर्वी वेळोवेळी अनेक आंदोलन केली आहे. पोलीस प्रशासन जडवाहतुकीमुळे होणाऱ्या अपघाती मृत्यबाबत गंभीर नसल्याने आतापर्यंत शासकीय नियमानुसार जडवाहतुकी विरोधात कारवाई करण्यास कुचराई करीत आहे. जडवाहतुकीमुळे चंद्रपुरतील जनतेचा नाहक बळी जात आहे. वरोरा नाका उडाणपुलाच्या बांधकामामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. चंद्रपुरातील नागपूर रोड, बंगाली कॅम्प, तुकूम रोडवर महाविद्यालय, शाळा, हॉस्पीटल, हॉटेल, शासकीय, खाजगी कार्यालय, व्यापारी प्रतिष्ठान असल्याने रस्त्यावर अत्यंत वर्दळ असते. यात महाविद्यालयीन, शाळेतील तरुण, तरुणी, लहान मुल, मुलींचा समावेश आहे. नागपूर, बल्लारपूर, मूल, सिटीपीेस मार्गाने धावणाऱ्या जडवाहतूक तरुण, शाळकरी मुल, मुलींचा अपघातात बळी घेत आहे. नियमाचे उल्लंघन करून जडवाहतूक सर्रासपणे सुरू आहे. जडवाहतुकीवर ठोस कारवाई केली जात नाही. जडवाहतूकीच्या विरोधात थातूरमातूर कारवाई करून पोलीस प्रशासन कारवाई करीत असल्याचे भासवित आहे. कडक कारवाईचा धाक नसल्याने येथील ट्रान्सपोर्ट मालक निर्ढावले आहेत. अपघाती मृत्यू ही एक मोठी गंभीर समस्या चंद्रपूर शहरवासियांची झाली आहे. अपघाताच्या घटनांवर आळा घालण्याच्या दृष्टीकोनातून मनसेने आतापर्यंत अनेकदा पोलीस प्रशासनाला निवेदन दिले. चंद्रपूर शहरातील मुख्य वर्दळीच्या रस्त्याने जडवाहतुकीस कायमस्वरूपी बंद केल्यास अपघाती मृत्यू टाळता येऊ शकतात, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पोलीस प्रशासन अपघाती मृत्यूबाबत गंभीर नाही, ही बाब चंद्रपुरकरांसाठी अतिशय दुर्दैवाची आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाने जडवाहतूक विरोधात कडक पावले उचलावी, वर्दळीच्या मार्गावरील जडवाहतूक कायमस्वरूपी बंद करावी अशी मागणी मनसच्यावतीने करण्यात आली आहे. कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)