शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

ग्रामीण बँक सुरू करण्याची मागणी

By admin | Updated: July 3, 2015 01:23 IST

देवाडा येथे विदर्भ कोकण ग्रामीण बँक सुरू करण्यात आली होती. त्यानंतर सुरळीत व्यवहार सुरू असताना सन २००९ मध्ये सदर बँक शाखा बंद करण्यात आली.

शाखा अचानक बंद : नागरिकांना सोसावा लागते आर्थिक भुर्दंडदेवाडा : देवाडा येथे विदर्भ कोकण ग्रामीण बँक सुरू करण्यात आली होती. त्यानंतर सुरळीत व्यवहार सुरू असताना सन २००९ मध्ये सदर बँक शाखा बंद करण्यात आली. परिणामी नागरिकांना व्यवहार करण्यासाठी देवाडा परिसरातील २५ गावातील नागरिकांना २५ ते ३० कि.मी. राजुरा येथे जावे लागत आहे. यात नागरिकांच्या वेळेचा अपव्यय होत असून आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.या आदिवासी दुर्गम भागात देवाडा हे मोठे गाव असल्यामुळे २५ गावे देवाडा या गावाच्या संपर्कात आहेत. रविवारी या ठिकाणी मोठा बाजार भरतो. अनेक वर्षांपासून हा बाजार व्यवस्थित सुरू आहे. परंतु राष्ट्रीयकृत बँक नसल्यामुळे कोणत्याही लहान मोठे कामानिमित्त राजुरा येथे जावे लागते. महिला बचतगट यांना दरमहा रक्कम उचल करणे व भरण्यासाठी व कर्ज घेण्यासाठी दरवर्षी बँकेत जावे लागते. तसेच शेतकऱ्यांना कर्ज फेडणे, कर्ज घेणे यासाठी बँकेत खाते उघडणे, निराधार, श्रावणबाळ, संजय गांधी इंदिरा गांधी योजनांचा लाभ घेणे, अपंग व वायोवृद्ध नागरिकांना बँकेतून रक्कम घेण्याकरिता २५ ते ३० कि.मी. तुडवत जावे लागते. यात त्यांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतो.शासनाच्या जीआरनुसार आॅनलाईन पद्धत झाल्यामुळे जनधन योजना असो किंवा शौचालयाचे बांधकाम झालेली रक्कम किंवा तेंदुपत्ता रक्कम अशा कोणत्याही योजना असो बँकेत नागरिकांना आपले सेविंग खाते लिंकीग करावे लागते. यासाठीआपले महत्त्वाचे कार्य सोडून राजुराकडे धाव घ्यावी लागते. देवाडा सर्कलमध्ये ७० टक्के शेतकरी असून त्यांचे जीवन शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. मात्र बँकेच्या कामासाठी गेले की, त्यांचा दिवस व्यर्थ जातो. एका फेरीत काम झाले तर ठिक अन्यथा परत दुसऱ्या दिवशी पुन्हा राजुऱ्यात जावे लागते. त्यामुळे विदर्भ कोकण ग्रामीण बँक सुरू करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)