शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत देण्याची मागणी

By admin | Updated: December 7, 2014 22:48 IST

अपुरा पाऊस, अकाली पाऊस तसेच वादळी वाऱ्यामुळे यावर्षी राज्याच्या बहुतांश जिल्ह्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. हिच स्थिती चंद्रपूर जिल्ह्याची आहे. धान शेतीबरोबरच सोयाबीन व कापसाचे

मूल : अपुरा पाऊस, अकाली पाऊस तसेच वादळी वाऱ्यामुळे यावर्षी राज्याच्या बहुतांश जिल्ह्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. हिच स्थिती चंद्रपूर जिल्ह्याची आहे. धान शेतीबरोबरच सोयाबीन व कापसाचे पीक घटले असून शेतकरी संकटात सापडलेला आहे. यासाठी संकटग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी मूल तालुका काँग्रेस कमेटीच्यावतीने तहसिलदार मूलच्या मार्फतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.धान उत्पादक शेतकरी तसेच सोयाबीन व कापूस लागवडी करणारा शेतकरी यावर्षीच्या हंगामात अपुऱ्या पावसामुळे पुर्णत: खचला आहे. वर्षभर राबराब राबून व हजारो रुपये खर्च करून देखील खर्च केलेली रक्कम निघणे कठीण झाल्याची स्थितीत मराठवाड्यासह विदर्भातील जिल्ह्यात आहे. चंद्रपूर जिल्ह्यात देखील हिच परिस्थिती असून सन १९७२ पेक्षाही भयंकर स्थिती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खचलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे ही शासनाची काळाची गरज आहे. यासाठी सोयाबीन व धान उत्पादक शेतकऱ्यांना २५ हजार रुपये हेक्टरी तर कापसाला सहा हजार रुपये रक्कम राज्य शासनाने बोनस म्हणून देण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. तसेच ओलिताच्या शेतकऱ्यांना व फळबागांना हेक्टरी ५० हजार रुपये देण्यात यावे, कापूस, सोयाबीन, धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत तर ओलीत व फळबाग शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्यात यावी, कापूस सहा हजार, सोयाबीन पाच हजार व धानाला चार हजार रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात यावा, शेतकऱ्यांचे पीक कर्ज व वीज बिल माफ करण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे. राज्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना पिण्याचे पाणी व रोजगार तसेच जनावरांसाठी चारा उपलब्ध करून संकटग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज व वीज बिल माफ करण्याची मागणी काँग्रेसने निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संतोष रावत, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष घनश्याम येनुरकर, राकेश रत्नावार, संजय मारकवार, विजय चिमड्यालवार आदी शेकडो शेतकरी उपस्थित होते. शासानाने नुकसानग्रस्तांना मदत जाहीर न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिले. हिवाळी अधिवेशन सुरु होत असून अधिवेशनादरम्यान मदतीची घोषणा करण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)