शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
3
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
4
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
5
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
6
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
7
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
8
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
9
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
10
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
11
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
12
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
13
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
14
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
15
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
16
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
17
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
18
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
19
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
20
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार

नुकसान भरपाई देण्याची मागणी

By admin | Updated: January 21, 2016 01:15 IST

मागील शेती हंगामात पावसाचे अवकाळी आगमन झाल्याने शेतकऱ्यांना उत्पादनात घट येऊन आर्थिक तोटा सहन करावा लागला, त्यावेळी काँग्रेस शासनाने नुकसान भरपाई दिली होती.

चिमूर : मागील शेती हंगामात पावसाचे अवकाळी आगमन झाल्याने शेतकऱ्यांना उत्पादनात घट येऊन आर्थिक तोटा सहन करावा लागला, त्यावेळी काँग्रेस शासनाने नुकसान भरपाई दिली होती. परंतु प्रशासनाच्या दिरंगाईने तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याने वंचित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी व चिमूर तालुका दुषकाळग्रस्त घोषित कण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तालुका अध्यक्ष राजू देवतळे यांच्या नेतृत्वात तहसीलदार यांना देण्यात आले.शेतकरी अत्यंत डबघाईत आला असून सन २०१५-१६ च्या शेती हंगामात पाऊस अपुरा पडल्याने धान्याची उत्पन्न कमी प्रमाणात झाले. लागवडी खर्च जास्त तर उत्पन्न कमी झाले. तसेच बाजारात कापूस, धान, सोयाबिन मालास भाव नाही. त्यामुळे कर्जाची परतफेड करु शकत नाही. सत्तेत येण्यासाठी शेतकऱ्यांशी कैवारीची भाषा बोलत असणारे मात्र विसर पडला आहे. चिमूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा, आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती कमी झाल्याने पेट्रोल डिझेल दर कमी करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.यावेळी तालुका अध्यक्ष राजू देवतळे, शहर अध्यक्ष राजू हिंगणकर, माजी जि.प. अध्यक्ष डॉ. सतीश वारजुकर, नगरसेवक विनोद ठाकूरकर, कदीर शेख, अ‍ॅड. अरुण दुधनकर, विविध सहकारी संस्थेचे अध्यक्ष माधव बिरजे, उपाध्यक्ष प्रकाश बोकारे, संजय डोंगरे, देवानंद गावंडे, बाळकृष्ण बोभाटे, अरविंद रेवतकर, धनराज मालके, दादा दहीकर, अविनाश अगडे, आशिष उमरे, राकेश साटोणे, अरविंद रेवतकर आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)