शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

जड वाहनांना बंदी घालण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:33 IST

पोलीस पाटलांची पदे भरण्याची मागणी चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पोलीस पाटलांची पदे रिक्त आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन ...

पोलीस पाटलांची पदे भरण्याची मागणी

चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पोलीस पाटलांची पदे रिक्त आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रिक्त पदांमुळे गावातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. शासनाने रिक्त पदे त्वरित भरावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

कठड्यांअभावी अपघाताची शक्यता

चंद्रपूर : जिल्ह्यातील काही नद्यांच्या पुलावरील कठडे तुटले आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वर्दळीच्या रस्त्यावरील पुलाच्या कठड्याचे त्वरित बांधकाम करावे, अशी मागणी केली जात आहे.

वेगवान वाहनांवर कारवाई करा

चंद्रपूर : स्पर्धात्मक युगात अल्पवयीन मुले मोटरसायकलवर स्वार होऊन सुसाट वेगाने दुचाकी चालवितात. त्यामुळे अपघात होत आहेत. शहरातील वर्दळीच्या मुख्य मार्गावर भरधाव वेगाने वाहन चालविली जातात. त्यामुळे अनेकांना याचा त्रास सहन करावा लागतो. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यात्रा स्थळांना सुविधेचा अभाव

चंद्रपूर : जिल्ह्यात चिमूर, कोरपना, राजुरा, सिंदेवाही, गोंडपिपरी आदी तालुक्यांमध्ये काही ठिकाणी यात्रा भरते; मात्र येथे सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. जिल्ह्यातील प्रत्येक यात्रा स्थळांचा विकास करावा, अशी मागणी होत आहे.

लिलावाअभावी वाहने धूळ खात

चंद्रपूर : येथील रामनगर आणि शहर पोलिसांनी विविध गुन्ह्यांतर्गत जप्त केलेली वाहने लिलावाअभावी अद्यापही धूळ खात आहेत. काही वाहने निकामी झाली असून, त्याचे स्पेअरपार्टही बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली आहे. या वाहनांचा लिलाव करण्याची मागणी आहे. यामुळे पोलीस स्टेशन परिसरातील जागा मोकळी होईल.

बचत गटांना प्रशिक्षण द्या

चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बचतगटांची स्थापना करण्यात आली आहे. या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळाला आहे; मात्र अद्यापही काही बचतगटांना प्रशिक्षण मिळाले नसल्याने त्यांना प्रशिक्षणाची गरज आहे.

वस्त्यांमधील बागेकडे मनपाचे दुर्लक्ष

चंद्रपूर : चंद्रपुरातील वस्त्यांमध्ये प्रशासनाने बागेसाठी जागा आरक्षित केल्या आहेत. ज्या ठिकाणी बाग आहे, त्या बागेकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या बागांचा विकास करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

डासांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

चंद्रपूर : शहरातील अनेक वार्डात घाणीचे साम्राज्य पसरले असून, त्यामुळे डासांचा प्रादूर्भाव वाढला आहे. परिणामी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नाल्यांची स्वच्छता करून फवारणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

रानडुकरांच्या उपद्रवाने शेतकरी वैतागले

चंद्रपूर : जिल्ह्यातील काही भागात रानडुकरांचा धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. पिकांच्या रक्षणासाठी शेतकरी विविध उपाययोजना करीत आहे. वन विभागाने रानडुकरांचा बंदोबस्त करावा. अशी मागणी करण्यात आली आहे.