चंद्रपूर : चंद्रपूर-गडचिरोली या मार्गावर खुलेआमपणे परवानगी नसलेल्या अनेक ट्रॅव्हल्स गाड्या धावत आहेत. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचा जीव धोक्यात आला असून, परिवहन महामंडळाच्या आर्थिक उत्पन्नात घट होत आहे. त्यामुळे या मार्गावरून धावणाऱ्या विनापरवानगी ट्रॅव्हल्स गाड्यांची तपासणी करून कारवाई करावी करण्याची मागणी भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष मनोज पाल यांच्या नेतृत्वात चंद्रपूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अहिरे यांच्याकडे निवेदनातून केली आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे बहुतांश नागरिक आपल्या नातेवाईक किंवा अन्य कामासाठी दररोज ये-जा करीत असतात. प्रवाशांची संख्या मोठी असल्याने एस.टी. गाड्यांसोबत अनेक बड्या व्यावसायिकांनी ट्रॅव्हल्स बसगाड्या सुरू केल्या आहेत. या अवैध वाहतूक होत असून कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिष्टमंडळात शिवसेना जिल्हा संघटीका कुसूम उदार, भारती दुधानी, माया पटले, तरुण राय, बप्पू बोपचे यांचा समावेश होता. (स्थानिक प्रतिनिधी)
परवानगी नसलेल्या ट्रॅव्हल्स वाहनांवर कारवाईची मागणी
By admin | Updated: July 21, 2015 01:02 IST