शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

भूमिहीन शेतमजूर प्रमाणपत्र देण्यास विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:32 IST

बिबी : महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर युती सरकारने बंद केलेली जुनी खावटी योजना परत सुरू करून गोरगरीब आदिवासी ...

बिबी : महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर युती सरकारने बंद केलेली जुनी खावटी योजना परत सुरू करून गोरगरीब आदिवासी समाजातील वंचित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. खावटी योजनेचा प्रचार, प्रसार कमी झाल्याने अनेक पात्र कुटुंबे या योजनेपासून वंचित होती.

त्यामुळे शासनाने नव्याने या योजनेचे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू केली. परंतु कोरपना तालुक्यातील खावटी योजनेच्या समन्वयक समितीने तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती व आदिवासी समाजाला योजनेचे अर्ज व माहितीच पुरविली नाही. त्यामुळे बिबी, नांदा, आवारपूर, हिरापूर, अंतरगाव या ग्रामपंचायतींच्या काही पदाधिकाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन या योजनेचे अर्ज व माहिती आदिवासी समाज बांधवांना दिली व त्यांच्याकडून अर्ज भरून घेतले. खावटी योजनेच्या लाभाकरिता भूमिहीन शेतमजूर प्रमाणपत्र गरजेचे आहे. त्यामुळे भूमिहीन प्रमाणपत्र मिळविण्याकरिता आदिवासी लाभार्थ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. खावटी योजनेचे अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ५ सप्टेंबर आहे. त्यापूर्वी सर्व अर्ज समन्वयकांकडे जमा करून ते संगणकीकृत करणे गरजेचे आहे. परंतु कोरपना तालुक्यातील तहसील कार्यालयातून भूमिहीन शेतमजूर प्रमाणपत्र देण्यास विलंब होत असल्याने अनेक पात्र आदिवासी कुटुंबांना खावटी योजनेच्या लाभापासून वंचित होण्याची वेळ आली आहे. एकीकडे भूमिहीन प्रमाणपत्र मिळण्याकरिता विलंब होत आहे. सोबतच खावटी योजनेचे अर्ज स्वीकारण्याची मुदत ५ सप्टेंबरपर्यंतच असल्याने भूमिहीन प्रमाणपत्राअभावी कोरपना तालुक्यातील जवळपास ५०० च्या वर पात्र लाभार्थ्यांना खावटी योजनेचा लाभ मिळणार नाही.