शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

भूमिहीन शेतमजूर प्रमाणपत्र देण्यास विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:32 IST

बिबी : महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर युती सरकारने बंद केलेली जुनी खावटी योजना परत सुरू करून गोरगरीब आदिवासी ...

बिबी : महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर युती सरकारने बंद केलेली जुनी खावटी योजना परत सुरू करून गोरगरीब आदिवासी समाजातील वंचित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. खावटी योजनेचा प्रचार, प्रसार कमी झाल्याने अनेक पात्र कुटुंबे या योजनेपासून वंचित होती.

त्यामुळे शासनाने नव्याने या योजनेचे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू केली. परंतु कोरपना तालुक्यातील खावटी योजनेच्या समन्वयक समितीने तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती व आदिवासी समाजाला योजनेचे अर्ज व माहितीच पुरविली नाही. त्यामुळे बिबी, नांदा, आवारपूर, हिरापूर, अंतरगाव या ग्रामपंचायतींच्या काही पदाधिकाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन या योजनेचे अर्ज व माहिती आदिवासी समाज बांधवांना दिली व त्यांच्याकडून अर्ज भरून घेतले. खावटी योजनेच्या लाभाकरिता भूमिहीन शेतमजूर प्रमाणपत्र गरजेचे आहे. त्यामुळे भूमिहीन प्रमाणपत्र मिळविण्याकरिता आदिवासी लाभार्थ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. खावटी योजनेचे अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ५ सप्टेंबर आहे. त्यापूर्वी सर्व अर्ज समन्वयकांकडे जमा करून ते संगणकीकृत करणे गरजेचे आहे. परंतु कोरपना तालुक्यातील तहसील कार्यालयातून भूमिहीन शेतमजूर प्रमाणपत्र देण्यास विलंब होत असल्याने अनेक पात्र आदिवासी कुटुंबांना खावटी योजनेच्या लाभापासून वंचित होण्याची वेळ आली आहे. एकीकडे भूमिहीन प्रमाणपत्र मिळण्याकरिता विलंब होत आहे. सोबतच खावटी योजनेचे अर्ज स्वीकारण्याची मुदत ५ सप्टेंबरपर्यंतच असल्याने भूमिहीन प्रमाणपत्राअभावी कोरपना तालुक्यातील जवळपास ५०० च्या वर पात्र लाभार्थ्यांना खावटी योजनेचा लाभ मिळणार नाही.