शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

एमपीएससीचा निर्णय घटनेतील मूलभूत अधिकारांचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:32 IST

सास्ती : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एमपीएससी परीक्षेत ओबीसी व खुल्या प्रवर्गासाठी संधीची अट घातली असून, ही बाब ग्रामीण ...

सास्ती : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एमपीएससी परीक्षेत ओबीसी व खुल्या प्रवर्गासाठी संधीची अट घातली असून, ही बाब ग्रामीण व गरीब विद्यार्थ्यांसाठी जाचक आणि अन्याय करणारी असून, घटनेचे उल्लंघन करणारी आहे. आयोगाने ही अट तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान या संघटनेने राजुरा येथील तहसीलदार यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.

एमपीएससीने याबाबत आपला निर्णय मागे न घेतल्यास, संघटना न्यायालयाचे दार ठोठावणार असल्याचे प्रतिष्ठानचे राज्य प्रवक्ते राम इंगळे यांनी पत्रपरिषदेत सांगितले.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने ३० डिसेंबरला घोषणा करून परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना संधीची अट घातली आहे. यानुसार, अनुसूचित जाती व अनुसूचित जनजातीसाठी कुठलीही अट घालण्यात आली नाही. मात्र, ओबीसी विद्यार्थ्यांना कमाल नऊ व खुल्या प्रवर्गासाठी सहा संधीची अट घातली आहे. मुळातच वयोमर्यादेची अट असल्याने, या कमाल संधीची अट घालण्याचे प्रयोजन अन्यायकारक आहे. यामुळे ओबीसी व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांमधे अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली आहे.

ही संधीची अट म्हणजे भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कातील कलम १६चे उल्लंघन आहे. त्यामुळे आयोगाने तातडीने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र शिवमुद्रा प्रतिष्ठानने पत्रकार परिषदेत केली.

याविषयी आयोगाने आपला आदेश मागे न घेतल्यास, उच्च न्यायालयात याचिका दाखल करून, उमेदवारांना न्याय मिळवून देणार असल्याचे प्रतिष्ठानचे राज्य प्रवक्ता राम इंगळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी प्रतिष्ठानचे पदाधिकारी ज्ञानेश्वर जाधव, अरुण पर्वतवार, गोपाळ दैठणेकर, अभिजीत टेकाम, दत्ता जाधव, आनंद कदम, दत्ता सकनूरे, वैभव क्षीरसागर, गोपाळ दैठणेकर आदी उपस्थित होते.