शहरं
Join us  
Trending Stories
1
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
2
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
3
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
4
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
5
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
6
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
7
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
8
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
9
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
10
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
11
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
12
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
13
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
14
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
15
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
16
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
17
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
18
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
19
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
20
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी

वनशास्त्र विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर समिती गठित करण्याचा निर्णय

By admin | Updated: March 9, 2016 02:05 IST

चंद्रपुरात मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या वनशास्त्र पदवीधर विद्यार्थ्यांच्या आमरण उपोषणाची दखल अखेर वनमंत्र्यांनी घेतली.

मंत्रालयात बैठक : चंद्रपुरातील आंदोलनाची आमरण उपोषणानंतर दखलचंद्रपूर : चंद्रपुरात मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या वनशास्त्र पदवीधर विद्यार्थ्यांच्या आमरण उपोषणाची दखल अखेर वनमंत्र्यांनी घेतली. या संदर्भात मंत्रालयात मंगळवारी बैठक पार पडली. त्यात या विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर अभ्यास समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. मागील दोन महिन्यांपासून या विद्यार्थ्यांचे वनसंरक्षक कार्यालयापुढे आंदोलन सुरू आहे. मागण्यांची आणि आंदोलनाची दखल घेत नाही हे पाहून या विद्यार्थ्यांनी आंदोलन तीव्र केले. चार दिवसांपासून त्यांनी आमरण उपोषण सुरू केले. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने या आंदोलनकर्त्यांचे प्रचंड हाल झाले होते. त्यांच्या निवासाची आणि भोजनाचीही अडचण निर्माण झाली होती. ‘लोकमत’ने गेल्या आठवड्यात याची दखल घेऊन वृत्त प्रकाशित केले होते. दरम्यान, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष पप्पू देशमुख यांनी ‘आत्मक्लेष’ या मथळ्याखाली एक मजकूर सोशल मिडियावरून पाठविला. तो व्हायरल होत वनमंत्री सुधिर मुनगंटीवार यांच्यापर्यंत पोहोचला. वनमंत्र्यांनी याची तातडीने दखल घेवून देशमुख यांना सोमवारी रात्री १० वाजताच्या दरम्यान मोबाईलवरून संपर्क साधला. देशमुख यांनी उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची गंभीरता वनमंत्र्यांना सांगितली. अखेर ना. मुनगंटीवार यांनी ८ मार्चला दुपारी २ वाजता मंत्रालयात तातडीची बैठक बोलविली. वनमंत्र्यांच्या दालनात झालेल्या या बैठकीला वन विभागाचे सचिव विकास खारगे उपस्थित होते. या बैठकीत वनमंत्र्यांनी या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी समिती गठीत करण्याचे आदेश दिले. त्यानुसार समिती गठीत करण्यात आली असून लवकरच ही समिती आपला अहवाल देणार आहे. या विद्यार्थ्यांचे हाल लक्षात घेवून अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि समाजसेवी संघटना मदतीसाठी सरसावल्या होत्या. कॅटरर्सचे संचालक अमूल रामटेके यांनी रात्री वेळेवर स्वयंपाक करून मुलामुलींची जेवणाची व्यवस्था केली. अनेक व्यक्तींनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला. रोटी बँकेचे चोरडिया व सातपुते यांच्या मदतीने जयश्री गावंडे यांनी त्यांच्या रात्रीच्या भोजनाची व्यवस्था केली. ग्रामीण पत्रकार संघानेही उपोषण मंडपाला भेट देऊन मदत दिली. (जिल्हा प्रतिनिधी)