शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

ग्रामपंचायतींना उत्पन्न वाढीसाठी साडेबारा कोटींचे कर्ज

By admin | Updated: April 28, 2016 00:44 IST

गेल्या अनेक वषार्पासून प्रलंबित असलेल्या जिल्हा ग्राम विकास निधीचे ग्रामपंचायतींना कर्ज स्वरुपात वितरण करण्याचा...

ग्रामपंचायतींना मिळाले उत्पन्नाचे स्त्रोत : १५ वर्षांत प्रथमच मोठ्या निधीचे वितरण चंद्रपूर : गेल्या अनेक वषार्पासून प्रलंबित असलेल्या जिल्हा ग्राम विकास निधीचे ग्रामपंचायतींना कर्ज स्वरुपात वितरण करण्याचा लोकाभिमुख निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी घेतला आहे. यातून ग्रामपंचायतींना उत्पन्न वाढीची संधी निर्माण करुन दिली आहे. १५ वर्षात प्रथमच १२ कोटी ४३ लाख १२ हजार ८७१ रुपयांचा जिल्हा ग्राम विकास निधी कर्ज स्वरुपात वाटप केल्याने ग्राम पंचायतीला स्वत:चे उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करता येऊन ग्रामपंचायत आर्थिकदृष्टया सक्षम होतील, असे दिसून येत आहे.ग्रामपंचायतीच्या स्वत:च्या उत्पन्नावर ०.२५ टक्के अंशदान जिल्हा ग्राम विकास निधीच्या जिल्हा स्तरावरील खात्यात ग्रामपंचायतमार्फत जमा केल्या जाते. त्या खात्यावर उपलब्ध असलेल्या निधीतून ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार कर्ज उपलब्ध करुन दिल्या जाते. परंतु ग्रामपंचायती कर्ज घेण्यास इच्छुक नसल्यामुळे १९८५ ते २०१३-१४ पर्यंत केवळ एक कोटी ८० लाख ३० हजार एवढाच निधी कर्ज स्वरुपात वितरीत करण्यात आला होता.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी जिल्हा ग्राम विकास निधी वितरणाचा २० ते २२ वषार्पासूनचा आढावा घेतला. सदर योजनेचा निधी जिल्हयातील ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी तसेच ग्रामपंचायतींना आर्थिकदृष्टया सक्षम करण्यासाठी उपयुक्त असल्याचे त्यांच्या लक्षात येताच जिल्हा परिषदेकडे १५ वषार्पासून प्रलंबित असलेल्या १५ कोटी ४५ लाख ८० हजार निधीचे नियोजन करुन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हयातील १२ पंचायत समित्यांना १२ कोटी ४३ लाख १२ हजारांचा निधी तात्काळ वितरित केला. या निधीमधून ग्रामपंचायतीला आपले आर्थिक उत्पन्न वाढविण्यास पाठबळ मिळणार आहे. जिल्हा ग्राम विकास निधी अंतर्गत कर्ज मागणीचे ८६ प्रस्ताव जिल्हा परिषदेला प्राप्त झाले होते. त्यापैकी 70 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. यात ट्रॅक्टर खरेदी, दुकान गाडे बांधकाम, बँक इमारत, मंगल कार्यालय व सांस्कृतिक भवन, सिमेंट क्राँकेट रोड, बाजार ओटे, स्मशानभूमिचे वॉल कंपाऊंड, सार्वजनिक वाचनालय, कोंडवाना बांधकाम व विश्रामगृह बांधकाम इत्यादीचा समावेश आहे. गेल्या अनेक वर्षांनंतर ग्रामपंचायतींना मोठया प्रमाणात कर्ज स्वरुपात निधी वितरित करण्यात आल्याने ग्रामपंचायतींना आपल्या उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. (शहर प्रतिनिधी)