शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
2
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
3
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
4
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
5
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
6
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
7
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
8
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
9
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
10
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
11
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
12
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
13
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
14
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
15
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
16
सोनं १३०६ रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा कॅरेटनिहाय लेटेस्ट रेट
17
Jara Hatke: अजब प्रथा: 'या' गावात लग्नाआधी तोडले जातात वधूचे दात; पण का??? वाचा 
18
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
19
IPL Auction 2026 LIVE: नवोदित कार्तिक शर्मा, प्रशांत वीर, अकिब जावेदवर पैशांचा पाऊस, लागल्या विक्रमी बोली
20
Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
Daily Top 2Weekly Top 5

क्रांतीच्या ज्वाळातून उगवली स्वातंत्र्याची पहाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2019 00:47 IST

८ आॅगस्ट १९४२ ला गवालिया टँक मैदान मुंबई येथे भारत छोडो आंदोलनादरम्यान महात्मा गांधीजींनी ‘करा अथवा मरा’ हा नारा दिला. गांधीजींच्या या संदेशाने देश इंग्रजांविरुद्ध पेटून उठला. चिमूर शहरातील क्रांतिकारक व नागरिकांनी १२ आॅगस्ट १९४२ पासून गुप्त बैठका घेऊन जनजागृती करून स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकले.

ठळक मुद्दे१६ आॅगस्ट १९४२ चिमूर क्रांतिलढा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनांनी पेटून उठली जनता

राजकुमार चुनारकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : ८ आॅगस्ट १९४२ ला गवालिया टँक मैदान मुंबई येथे भारत छोडो आंदोलनादरम्यान महात्मा गांधीजींनी ‘करा अथवा मरा’ हा नारा दिला. गांधीजींच्या या संदेशाने देश इंग्रजांविरुद्ध पेटून उठला. चिमूर शहरातील क्रांतिकारक व नागरिकांनी १२ आॅगस्ट १९४२ पासून गुप्त बैठका घेऊन जनजागृती करून स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकले. भारतीय स्वातंत्र्याच्या पे्ररणेने झपाटलेले युवक, वृद्ध व महिलांनी ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारला. १६ आॅगस्ट १९४२ रोजी सर्कल इन्स्पेक्टर जरासंध, पोलीस कांताप्रसाद, नायब तहसीलदार सोनवाने, एसडीओ डुंगाजी या इंग्रज अधिकाऱ्यांची हत्या करून इंग्रजांचा युनियन जॅक उतरविला आणि तिरंगा ध्वज फडकविला. सलग तीन दिवस स्वातंत्र उपभोगले. तेव्हा १६ आॅगस्ट १९४२ ला सारा भारत देश इंग्रजांच्या गुलामीत होता. मात्र चिमूर शहर स्वतंत्र झाले होते. भारतात व्यापारी म्हणून आलेल्या इंग्रजांनी तब्बल दीडशे वर्षांच्या कारभारात भारतीयांवर मोठा अत्याचार केला. इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरुद्ध भारतीयांमध्ये स्वातंत्र्याची लाट निर्माण झाली होती. याकरिता भगतसिंग, राजगुरू यासारखे क्रांतिकारक ब्रिटिश सरकारविरूद्ध पेटून उठले.स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात चिमूरचा उठाव हे एक सोनेरी पान आहे.१६ आॅगस्टच्या सकाळी काय घडले?महात्मा गांधीजींच्या ‘करा अथवा मरा’ या संदेशाने चिमूर येथील क्रांतिकारक इंग्रजांविरूद्ध पेटून उठले. १६ आॅगस्ट १९४२ ला सकाळी ९ वाजता गोपाळराव कोरेकार यांच्या नेतृत्वात अभूतपूर्व प्रभातफेरी काढण्यात आली. काँग्रेस सेवादलचे श्रीराम बिंगेवार, सखाराम माटेवार,बाबूलाल झिरे, दादाजी किरीमकर, मारोती खोबरे,गणपत खेडेकर आदी क्रांतिकारक सहभागी झाले होते. ही प्रभातफेरी जुन्या बसस्थानकाजवळून निघाली. 'व्हॉइसरॉय दिल्ली मे जुते खाये गल्ली मे' या घोषणा देत प्रभातफेरी नागमंदिराकडे निघाली. हा दिवस नागपंचमीचा होता. दुसरीकडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचे प्रवचन सुरू होते. या प्रवचनात सुमारे पाचशे नागरिक सहभागी झाले होते. तत्कालीन ठाणेदार हरिराम शर्मा व क्रांतिकारक पांडुरंग पोतदार या दोघांनीही महाराजासमोर आपली बाजू मांडली होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणाले, ‘तुम्ही आपल्या ठिकाणी योग्य आहात. आपले काम करा, तुमचा मार्ग तुम्हाला सापडेल’ असा सल्ला दिला. आदल्या दिवशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी देशभक्तीच्या ज्वालाग्रही विचारांची तेजस्वी भजने सादर केली.‘पत्थर सारे बॉम्ब बनेंगे’‘पत्थर सारे बॉम्ब बनेंगे’ या राष्ट्रसंताच्या भजनाने क्रांतिकारकांच्या मनात देशप्रेमाची ज्योत पेटविली. सर्वांच्या मनात क्रांती हाच शब्द घुमत होता. भारत मातेचे स्वतंत्र्य रूप क्रांतीकारकांना दिसत होते. 'गुलामी अब नही होना, हमारे प्रिय भारत देश मे’ या भजनाने क्रांतिकारक पेटून उठले. यापैकी सेवादलाचे उद्धवराव खेमस्कर यांनी क्रांतीचा बिगुल फुंकला आणि सारे कार्यकर्ते अभ्यंकर मैदावर येऊन 'भारत माता की जय' अशा घोषणा देऊ लागले. तेवढ्यात पोलीस दलाने स्वातंत्र्यवीरांच्या हातातील तिरंगा झेंडा हिसकावून १२ क्रांतीकारकांना तुरूंगात डांबले. 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिन