शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

क्रांतीच्या ज्वाळातून उगवली स्वातंत्र्याची पहाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2019 00:47 IST

८ आॅगस्ट १९४२ ला गवालिया टँक मैदान मुंबई येथे भारत छोडो आंदोलनादरम्यान महात्मा गांधीजींनी ‘करा अथवा मरा’ हा नारा दिला. गांधीजींच्या या संदेशाने देश इंग्रजांविरुद्ध पेटून उठला. चिमूर शहरातील क्रांतिकारक व नागरिकांनी १२ आॅगस्ट १९४२ पासून गुप्त बैठका घेऊन जनजागृती करून स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकले.

ठळक मुद्दे१६ आॅगस्ट १९४२ चिमूर क्रांतिलढा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनांनी पेटून उठली जनता

राजकुमार चुनारकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : ८ आॅगस्ट १९४२ ला गवालिया टँक मैदान मुंबई येथे भारत छोडो आंदोलनादरम्यान महात्मा गांधीजींनी ‘करा अथवा मरा’ हा नारा दिला. गांधीजींच्या या संदेशाने देश इंग्रजांविरुद्ध पेटून उठला. चिमूर शहरातील क्रांतिकारक व नागरिकांनी १२ आॅगस्ट १९४२ पासून गुप्त बैठका घेऊन जनजागृती करून स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकले. भारतीय स्वातंत्र्याच्या पे्ररणेने झपाटलेले युवक, वृद्ध व महिलांनी ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारला. १६ आॅगस्ट १९४२ रोजी सर्कल इन्स्पेक्टर जरासंध, पोलीस कांताप्रसाद, नायब तहसीलदार सोनवाने, एसडीओ डुंगाजी या इंग्रज अधिकाऱ्यांची हत्या करून इंग्रजांचा युनियन जॅक उतरविला आणि तिरंगा ध्वज फडकविला. सलग तीन दिवस स्वातंत्र उपभोगले. तेव्हा १६ आॅगस्ट १९४२ ला सारा भारत देश इंग्रजांच्या गुलामीत होता. मात्र चिमूर शहर स्वतंत्र झाले होते. भारतात व्यापारी म्हणून आलेल्या इंग्रजांनी तब्बल दीडशे वर्षांच्या कारभारात भारतीयांवर मोठा अत्याचार केला. इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरुद्ध भारतीयांमध्ये स्वातंत्र्याची लाट निर्माण झाली होती. याकरिता भगतसिंग, राजगुरू यासारखे क्रांतिकारक ब्रिटिश सरकारविरूद्ध पेटून उठले.स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात चिमूरचा उठाव हे एक सोनेरी पान आहे.१६ आॅगस्टच्या सकाळी काय घडले?महात्मा गांधीजींच्या ‘करा अथवा मरा’ या संदेशाने चिमूर येथील क्रांतिकारक इंग्रजांविरूद्ध पेटून उठले. १६ आॅगस्ट १९४२ ला सकाळी ९ वाजता गोपाळराव कोरेकार यांच्या नेतृत्वात अभूतपूर्व प्रभातफेरी काढण्यात आली. काँग्रेस सेवादलचे श्रीराम बिंगेवार, सखाराम माटेवार,बाबूलाल झिरे, दादाजी किरीमकर, मारोती खोबरे,गणपत खेडेकर आदी क्रांतिकारक सहभागी झाले होते. ही प्रभातफेरी जुन्या बसस्थानकाजवळून निघाली. 'व्हॉइसरॉय दिल्ली मे जुते खाये गल्ली मे' या घोषणा देत प्रभातफेरी नागमंदिराकडे निघाली. हा दिवस नागपंचमीचा होता. दुसरीकडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचे प्रवचन सुरू होते. या प्रवचनात सुमारे पाचशे नागरिक सहभागी झाले होते. तत्कालीन ठाणेदार हरिराम शर्मा व क्रांतिकारक पांडुरंग पोतदार या दोघांनीही महाराजासमोर आपली बाजू मांडली होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणाले, ‘तुम्ही आपल्या ठिकाणी योग्य आहात. आपले काम करा, तुमचा मार्ग तुम्हाला सापडेल’ असा सल्ला दिला. आदल्या दिवशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी देशभक्तीच्या ज्वालाग्रही विचारांची तेजस्वी भजने सादर केली.‘पत्थर सारे बॉम्ब बनेंगे’‘पत्थर सारे बॉम्ब बनेंगे’ या राष्ट्रसंताच्या भजनाने क्रांतिकारकांच्या मनात देशप्रेमाची ज्योत पेटविली. सर्वांच्या मनात क्रांती हाच शब्द घुमत होता. भारत मातेचे स्वतंत्र्य रूप क्रांतीकारकांना दिसत होते. 'गुलामी अब नही होना, हमारे प्रिय भारत देश मे’ या भजनाने क्रांतिकारक पेटून उठले. यापैकी सेवादलाचे उद्धवराव खेमस्कर यांनी क्रांतीचा बिगुल फुंकला आणि सारे कार्यकर्ते अभ्यंकर मैदावर येऊन 'भारत माता की जय' अशा घोषणा देऊ लागले. तेवढ्यात पोलीस दलाने स्वातंत्र्यवीरांच्या हातातील तिरंगा झेंडा हिसकावून १२ क्रांतीकारकांना तुरूंगात डांबले. 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिन