शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

‘मिनरल’च्या नावावर दुर्गंधीयुक्त पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 23:43 IST

आजघडीला पानटपऱ्यांपासून तर रस्त्यांवर मिनरल वॉटरच्या नावाखाली दुर्गंधीयुक्त पाणी लोकांना विकण्याचा सपाटा काही कंपन्यांनी सुरू केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वेगवेगळ्या नावांनी अनेक कंपन्या दरवर्षी लाखो रूपयांची उलाढाल यामाध्यमातून करीत असून हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देलाखोंची उलाढाल : अन्नभेसळ कायद्याची सर्रास पायमल्ली

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आजघडीला पानटपऱ्यांपासून तर रस्त्यांवर मिनरल वॉटरच्या नावाखाली दुर्गंधीयुक्त पाणी लोकांना विकण्याचा सपाटा काही कंपन्यांनी सुरू केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वेगवेगळ्या नावांनी अनेक कंपन्या दरवर्षी लाखो रूपयांची उलाढाल यामाध्यमातून करीत असून हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती वर्तविली जात आहे. असा प्रकार शहरात व जिल्ह्यात होत असतानाही अन्न व औषध प्रशासन अनभिज्ञ आहे. त्यामुळे या गोरखधंद्यात अधिकारी व कंपनी चालकांची मिलिभगत असल्याची चर्चा होऊ लागली आहे.जिल्ह्यात रोज पाऊच, तसेच पाणी बॉटल व जारच्या माध्यमातून हजारो लिटर मिनरल वॉटर विकल्या जाते. मात्र नागरिक त्या पाऊच, बॉटलवरील बॅच नंबर व पॅकींगची तारीख देखिल पाहण्याची तसदी घेत नाही. त्यामुळे तहानेने व्याकुळ झालेले नागरिक नकळत दुर्गंधीयुक्त पाणी पितात.अन्न व भेसळ प्रतिबंधक कायदा १९५४ च्या नियम १९५५ अन्वये कुठल्याही तयार मालाची पॅकींग करताना त्यावर पॅकींगची तारीख आणि बॅच नंबर नमूद करणे बंधनकारक आहे. मात्र शहरात व जिल्ह्यात रोज लाखोच्या संख्येत विकल्या जाणाºया पाऊचवर बॅच नंबर व पॅकींगची तारीख लिहिलेलीच नसते. त्यामुळे विविध कंपन्यांतून तयार होणाºया पाऊच व बाटल्यांच्या शुद्धतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.मिनरल वॉटर तयार करणाºया कंपन्या नियमांची सर्रास पायमल्ली करून नागरिकांचे आरोग्य धोक्यात टाकत असताना अन्न व औषधी प्रशासनाने आजतागायत कुठलीही कारवाई केल्याचे ऐकिवात नाही.काही वर्षांपूर्वी मिनरल वॉटरचे फॅड फक्त शहरी भागातच होते. मात्र आता ग्रामीण भागातीलही गल्लीबोळात पाण्याचे पाऊच विकले जातात. जिल्ह्यात तयार होणाºया मिनरल वॉटरची परजिल्ह्यातील लगतच्या गावांतही विक्री केली जाते. अनेक गावांतील बसस्थानकांवर तर हमखास हे पाणी पाऊच मिळतात. मात्र विकत घेतलेल्या पाऊचमधील पाणी किती शुद्ध आहे, याची शहानिशा न करताच प्रवासीही पाणी पितात. काही पाऊचमधील पाण्याची तर दुर्गंधी येत असतानाही पाणी विकले जाते.या मिनरल वॉटरचा गोरखधंदा चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र पसरला आहे. त्यामुळे मिनरल वॉटरच्या विक्रीबाबत नियम कडक करण्याची गरज आता निर्माण झाली असून शासनाने याकडे लक्ष द्यावे.जारच्या पाण्याची शुद्धता काय?चंद्रपूर शहरात दररोज सकाळी १० वाजताच्या सुमारास अनेक टेम्पो पाण्याने भरलेले जार विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयांत पोहोचवितात. त्यामुळे पाण्याच्या जारने भरलेल्या टेम्पोची रस्त्यावर गर्दी दिसते. २५ ते ३० रूपये या जारचे आकारले जाते. मात्र या जारमधील पाणी कितपत शुद्ध आहे, याची कुणीही शहानिशा करीत नाही. अनेकदा जार बाहेरून चिखलाने किंवा धुळीने माखलेले असतात. मात्र याच जारमधून पाणी दिले जाते. त्यामुळे जारमध्ये पाणी भरताना जार किती स्वच्छ केले जातात, याची प्रचिती येते. मात्र नागरिकही जारचे पाणी, शुद्ध पाणी म्हणून विविध कार्यालय तसेच घरगुती कार्यक्रमात जारच्या पाण्याचा सर्रास वापर करतात. याचाच फायदा घेत अनेकदा कार्यक्रमादरम्यान ५० जारमध्ये दहा जारचे पाणी दंड नसले किंवा शुद्ध नसले तरी ते लक्षात येत नाही. आपण विकत घेतलेले पाणी शुद्ध आहे किंवा नाही, हे तपासण्याचे कोणतेही यंत्र किंवा मशिन ग्राहकाकडे नसल्याने पाणी विक्रेत्यांचे चांगलेच फावत आहे. मात्र अन्न व औषध प्रशासनानही पाणी प्लांटची तपासणी करून कारवाई केल्याची एकही कारवाई आजपर्यंत जिल्ह्यात झालेली नाही. आतातरी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन जनतेच्या आरोग्याशी सुरू असलेला खेळ थांबविण्याची गरज आहे.

टॅग्स :Mineral Waterमिनरल वॉटर