शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

‘मिनरल’च्या नावावर दुर्गंधीयुक्त पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 23:43 IST

आजघडीला पानटपऱ्यांपासून तर रस्त्यांवर मिनरल वॉटरच्या नावाखाली दुर्गंधीयुक्त पाणी लोकांना विकण्याचा सपाटा काही कंपन्यांनी सुरू केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वेगवेगळ्या नावांनी अनेक कंपन्या दरवर्षी लाखो रूपयांची उलाढाल यामाध्यमातून करीत असून हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देलाखोंची उलाढाल : अन्नभेसळ कायद्याची सर्रास पायमल्ली

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आजघडीला पानटपऱ्यांपासून तर रस्त्यांवर मिनरल वॉटरच्या नावाखाली दुर्गंधीयुक्त पाणी लोकांना विकण्याचा सपाटा काही कंपन्यांनी सुरू केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वेगवेगळ्या नावांनी अनेक कंपन्या दरवर्षी लाखो रूपयांची उलाढाल यामाध्यमातून करीत असून हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती वर्तविली जात आहे. असा प्रकार शहरात व जिल्ह्यात होत असतानाही अन्न व औषध प्रशासन अनभिज्ञ आहे. त्यामुळे या गोरखधंद्यात अधिकारी व कंपनी चालकांची मिलिभगत असल्याची चर्चा होऊ लागली आहे.जिल्ह्यात रोज पाऊच, तसेच पाणी बॉटल व जारच्या माध्यमातून हजारो लिटर मिनरल वॉटर विकल्या जाते. मात्र नागरिक त्या पाऊच, बॉटलवरील बॅच नंबर व पॅकींगची तारीख देखिल पाहण्याची तसदी घेत नाही. त्यामुळे तहानेने व्याकुळ झालेले नागरिक नकळत दुर्गंधीयुक्त पाणी पितात.अन्न व भेसळ प्रतिबंधक कायदा १९५४ च्या नियम १९५५ अन्वये कुठल्याही तयार मालाची पॅकींग करताना त्यावर पॅकींगची तारीख आणि बॅच नंबर नमूद करणे बंधनकारक आहे. मात्र शहरात व जिल्ह्यात रोज लाखोच्या संख्येत विकल्या जाणाºया पाऊचवर बॅच नंबर व पॅकींगची तारीख लिहिलेलीच नसते. त्यामुळे विविध कंपन्यांतून तयार होणाºया पाऊच व बाटल्यांच्या शुद्धतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.मिनरल वॉटर तयार करणाºया कंपन्या नियमांची सर्रास पायमल्ली करून नागरिकांचे आरोग्य धोक्यात टाकत असताना अन्न व औषधी प्रशासनाने आजतागायत कुठलीही कारवाई केल्याचे ऐकिवात नाही.काही वर्षांपूर्वी मिनरल वॉटरचे फॅड फक्त शहरी भागातच होते. मात्र आता ग्रामीण भागातीलही गल्लीबोळात पाण्याचे पाऊच विकले जातात. जिल्ह्यात तयार होणाºया मिनरल वॉटरची परजिल्ह्यातील लगतच्या गावांतही विक्री केली जाते. अनेक गावांतील बसस्थानकांवर तर हमखास हे पाणी पाऊच मिळतात. मात्र विकत घेतलेल्या पाऊचमधील पाणी किती शुद्ध आहे, याची शहानिशा न करताच प्रवासीही पाणी पितात. काही पाऊचमधील पाण्याची तर दुर्गंधी येत असतानाही पाणी विकले जाते.या मिनरल वॉटरचा गोरखधंदा चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र पसरला आहे. त्यामुळे मिनरल वॉटरच्या विक्रीबाबत नियम कडक करण्याची गरज आता निर्माण झाली असून शासनाने याकडे लक्ष द्यावे.जारच्या पाण्याची शुद्धता काय?चंद्रपूर शहरात दररोज सकाळी १० वाजताच्या सुमारास अनेक टेम्पो पाण्याने भरलेले जार विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयांत पोहोचवितात. त्यामुळे पाण्याच्या जारने भरलेल्या टेम्पोची रस्त्यावर गर्दी दिसते. २५ ते ३० रूपये या जारचे आकारले जाते. मात्र या जारमधील पाणी कितपत शुद्ध आहे, याची कुणीही शहानिशा करीत नाही. अनेकदा जार बाहेरून चिखलाने किंवा धुळीने माखलेले असतात. मात्र याच जारमधून पाणी दिले जाते. त्यामुळे जारमध्ये पाणी भरताना जार किती स्वच्छ केले जातात, याची प्रचिती येते. मात्र नागरिकही जारचे पाणी, शुद्ध पाणी म्हणून विविध कार्यालय तसेच घरगुती कार्यक्रमात जारच्या पाण्याचा सर्रास वापर करतात. याचाच फायदा घेत अनेकदा कार्यक्रमादरम्यान ५० जारमध्ये दहा जारचे पाणी दंड नसले किंवा शुद्ध नसले तरी ते लक्षात येत नाही. आपण विकत घेतलेले पाणी शुद्ध आहे किंवा नाही, हे तपासण्याचे कोणतेही यंत्र किंवा मशिन ग्राहकाकडे नसल्याने पाणी विक्रेत्यांचे चांगलेच फावत आहे. मात्र अन्न व औषध प्रशासनानही पाणी प्लांटची तपासणी करून कारवाई केल्याची एकही कारवाई आजपर्यंत जिल्ह्यात झालेली नाही. आतातरी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन जनतेच्या आरोग्याशी सुरू असलेला खेळ थांबविण्याची गरज आहे.

टॅग्स :Mineral Waterमिनरल वॉटर