शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

प्रकल्पग्रस्त धरणातील गाळपेर जमीन वाहिनीपासून वंचित

By admin | Updated: March 28, 2017 00:31 IST

धरणातील गाळपेर जमीन ही धरणात जमीन गेलेल्या प्रकल्पग्रस्तांना वाहिनीकरिता देणे बंधनकारक आहे.

जमिनीवर अतिक्रमण : लाखों रुपयांचा महसूल बुडालावरोरा : धरणातील गाळपेर जमीन ही धरणात जमीन गेलेल्या प्रकल्पग्रस्तांना वाहिनीकरिता देणे बंधनकारक आहे. परंतु, गाळपेर जमिनीवर अतिक्रमण करुन अतिक्रमणधारक लाखों रुपयांचे उत्पन्न घेत आहेत. परिणामी पाटबंधारे विभागाचा लाखों रुपयांचा महसूल बुडत आहे. मात्र धरणग्रस्त शेतकरी गाळपेर जमिनीतून पीक घेण्यापासून मागील कित्येक वर्षापासून वंचित झाले आहे.वरोरा तालुक्यातील चारगाव धरणात आकोला गिरोला, राळेगाव, बोरगाव, पारडी, उमरी, सावरी चारगाव आदी गावातील शेतकऱ्यांच्या जमीनी गेल्या आहेत. खरीप हंगामात चारगाव धरणातील पाणी कमी झाल्यानंतर शिल्लक असलेली गाळपेर जमिनीत पीके घेण्याकरिता पाटबंधारे विभागाने धरणग्रस्त शेतकऱ्यांकडून भूभाडे घेवून दिल्या जातात. मागील कित्येक वर्षापासून या नियमाला तिलांजली दिल्याने या गाळपेर जमिनीवर इतर शेतकरी अतिक्रमण करुन लाखों रुपयांचे उत्पन्न घेत आहे. यामध्ये शासनासाला कुठलाही महसूल अतिक्रमण धारकांकडून मिळत नाही. मागील वर्षी पाटबंधारे विभागाने धरणग्रस्त शेतकऱ्यांना गाळपेर जमिनीकरिता अर्ज मागीतले होते. धरणग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करुन प्रत्येकांने एक हजार रुपये भूभाडे अदा केले होते. त्यानंतर गाळपेर जमिनीचे पट्टे वाटप करण्यात आले होते. परंतु, वाटपाची प्रक्रिया विलंबाने झाली. त्या जमिनीवर अतिक्रमण करुन पिके घेण्यात आले होते. त्यामुळे धरणग्रस्तांना रक्कम अदा करुनही गाळपेर जमिनीवर पिके घेता आले नाही. यावर्षीही पाटबंधारे विभागाने गाळपेर जमिनी वाटपासंदर्भात धरणग्रस्तांकडून अर्ज मागीतले. धरणग्रस्तांनी अर्ज करुन भूर्भाडे अदा केले. परंतु, आता मार्च महिनाही निघून गेला. मात्र अद्यापही धरणग्रस्तांना गाळपेर जमिनीचे वाटप करण्यात आले नाही.(तालुका प्रतिनिधी)पीक घेण्यापासून शेतकरी वंचितधरणातील गाळपेर जमीन प्रकल्पग्रस्तांना वाहिनीकरिता देण्याचा नियम आहे. मात्र या गाळपेर जमिनीवर अनेकांनी अतिक्रमण केले असल्यामुळे गाळपेर जमिनीतून पीक घेण्यापासून शेतकरी वंचित आहेत. परिणामी शेतकऱ्यांचे अािर्थक नुकसान होत आहे. पूर्वी संकटात सापडलेला शेतकरी आणखीनच संकटात सापडला आहे. २९ मार्चला जिल्हाधिकाऱ्यासोबत बैठकधरणग्रस्तांनी गाळपेर जमिन मिळत नसल्याची आपली व्यथा चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे मांडली. त्यांनी तातडीने २९ मार्चला बैठक घेण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला दिले त्यामुळे या बैठकीतील निर्णयाकडे धरणग्रस्ताचे लक्ष लागले आहे. पीक लिलावाची प्रक्रिया रेंगाळलीमागील वर्षी गाळपेर जमिनीवर अतिक्रमण करुन पीक घेण्यात आले. ही पिके अतिक्रमण करुन घेण्यात आल्याने पाटबंधारे विभागाने पीक जप्त करण्याची कारवाई केली अतिक्रमणधारक उच्च न्यायालयात गेले. त्यावेळी अतिक्रमणधारकांच्या विरोधात निकाल लागला. त्यामुळे अतिक्रमण जागेवरचे पिकांचा लिलाव करण्याची घोषणा केली. ही घोषणा हवेतच विरली. अतिक्रमणधारकांनी पीक घेतल्यानंतरही शासनाला महसुलापासून वंचित रहावे लागत आहे.