शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

राजुरा तालुक्याला प्रदूषणाचा शाप

By admin | Updated: December 7, 2014 22:48 IST

राजुरा तालुक्यात असलेल्या कोळसा खाणींमुळे प्रदूषणात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून यावर उपाय योजना म्हणून कोणतेही पाऊल उचलण्यात येत नसल्याने

गोवारी : राजुरा तालुक्यात असलेल्या कोळसा खाणींमुळे प्रदूषणात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून यावर उपाय योजना म्हणून कोणतेही पाऊल उचलण्यात येत नसल्याने राजुरा प्रदूषणाचा तालुका म्हणून नावारूपास येत आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुका काळ्या सोन्यासाठी अग्रेसर मानला जातो. येथे कोळसा खाणींची संख्या अधिक असल्याने धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. गोवरी, पोवनी, सास्ती, धोपटाळा, गोवरी डीप या वेकोलिच्या कोळसा खाणी केवळ पाच किमी अंतरावर असल्यामुळे या परिसरात नेहमीच कोळसाने भरलेली जड वाहने रस्त्याने दिवस-रात्रं धावत असतात. जड वाहतुकीने राजुरा तालुक्यातील रस्त्यांचे बारा वाजले असून रस्ते पूर्णत: धुळीने माखले आहेत.कोळसा वाहतुकीने रस्त्यावरील अपघातात वाढ झाली असून नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. कोळसा खाण परिसरात शेतकऱ्यांच्या शेती असल्याने पिकांवर काळ्या धुळीचा थर साचून हाती येणारे पिक पूर्णत: खराब होत आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत असून वेकोलिकडून कोणतीही प्रकारची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळालेली नाही.वेकोलिच्या कोळसा खाणीमुळे तालुक्याच्या प्रदूषणात वाढ झाली. मात्र यावर वेकोलिकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. उद्योगांमुळे परिसराची भरभराट होते असे म्हणतात. मात्र येथे कोणाचा वचक नसल्याने व प्रदूषण नियंत्रण मंडळाचेही याकडे डोळेझाक होत असल्यामुळे राजुरा तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वेकोलिच्या नियोजन शुन्य धोरणाचा फटका परिसरातील जनतेला सहन करावा लागत आहे. (वार्ताहर)