शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

निवडणूक अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांवर वक्रदृष्टी

By admin | Updated: July 20, 2015 00:45 IST

महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या व त्याची पूर्वतयारी म्हणून महाराष्ट्रात ग्रामपंचायत ..

हक्काच्या दोन सुट्टीवर संक्रांत : सुट्टीच्या दिवशीच ठेवले कर्मचाऱ्यांचे निवडणूक प्रशिक्षणतळोधी (बा) : महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या व त्याची पूर्वतयारी म्हणून महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी शासनाकडून नेहमीप्रमाणे कर्मचारी वर्गाची नियुक्ती करण्यात आली असून त्यासाठी प्रशिक्षणाची खास सोयही करण्यात आली आहे. मात्र नागभीड तालुका निवडणूक अधिकारी यांनी हे प्रशिक्षण सुटीच्याच दिवशी ठेवल्याने कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या दोन सुटीवर सक्रांत आली आहे. तसेच मागील दोन ग्रामपंचायत निवडणुकांचे मानधन १० वर्षाचा कालावधी लोटून अद्यापही न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष दिसून येत आहे.शासनाला कोणत्याही प्रकारची राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय कामे करावयाची असली तर त्या प्रक्रियेत शिक्षकांना अवश्य सामावून घेतले जाते. आतापर्यंतच्या प्रक्रियेतून असाच अनुभव आला आहे. एवढा विश्वास शिक्षकांप्रति शासनाला आहे. कारण शिक्षक बांधव कोणतीही कुरकूर न करता त्यांच्यावर टाकलेली जबाबदारी सहजतेने व विश्वासाने पार पाडतात. म्हणून शिक्षण विभागाव्यतिरिक्त इतर विभागाचे अधिकारी आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी शिक्षकांवरच अवलंबून असल्याचे दिसून येते. मात्र हे करताना शिक्षकांवर अन्याय होतो काय, किंवा त्यांच्या मानसिकतेचा विचार होत नसल्याची बाब पुन्हा एकदा ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून पुढे आली आहे.नागभीड तालुका निवडणूक अधिकारी यांनी निवडणुकीकरिता प्रशिक्षण देण्यासाठी सुटीच्याच कालावधीची निवड केली आहे. त्यामुळे या प्रशिक्षणाकरिता निवड झालेल्या कर्मचाऱ्यांची हक्काच्या दोन दिवसांच्या सुटीवर गदा येणार आहे. इतकेच नव्हे तर निवडणूक पथकांची निवड करताना बहुतांश जि.प. शिक्षकांचीच मतदान केंद्राध्यक्ष म्हणून निवड केली. त्यांच्या पथकात कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक, हायस्कूल शिक्षक व इतर विभागाचे अधिकारी मात्र मतदान अधिकारी म्हणून काम पहाणार आहे.ही पथक निर्मिती प्रक्रिया कोणत्या आधारावर केली, हे मात्र समजले नाही. कारण जिल्ह्यातील इतर तालुक्यात मात्र कर्मचाऱ्यांची निवडणूक पथकात निवड करताना सामान्यता त्यांची पद, कार्यालय, शिक्षण, मिळणारी वेतनश्रेणी यांचा विचार केलेला आहे. पण नागभीड तालुक्यात मात्र याकडे लक्ष दिले गेलेले नाही.याशिवाय यापूर्वी झालेल्या दोन ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्याकरिता सहभागी कर्मचाऱ्यांचे मानधन दहा वर्षापेक्षा अधिक कालावधी होऊनही कर्मचाऱ्यांना मिळाले नसल्याची चर्चा शिक्षक वर्गात होताना दिसत आहे. न मिळालेले मानधन, प्रशिक्षणाकरिता सुटीचा कालावधी तसेच पथक निवडीमध्ये असलेली अनियमितता यामुळे शिक्षक वर्गात असंतोष दिसून येत आहे. विशेष म्हणजे, निवडणूक स्थळी असणारी अव्यवस्था व जबाबदार अधिकाऱ्यांकडून निवडणूक प्रक्रियेतील वेळकाढू धोरण, यावरही शिक्षकांमध्ये आवडीने चर्चा रंगत असल्याचे चित्र दिसत आहे. (वार्ताहर)