शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

शेतीचे पाणी सिमेंट कंपन्यांना

By admin | Updated: March 6, 2017 00:32 IST

आदिवासीबहुल क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोरपना तालुक्यातील पकडीगुड्डम व अमलनाला तलावाची....

शेतकरी वंचित : तलावातील गाळ उपसा करण्याची मागणीकोरपना : आदिवासीबहुल क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोरपना तालुक्यातील पकडीगुड्डम व अमलनाला तलावाची निर्मिती होऊन ३० वर्षाचा कालावधी लोटला आहे. या तलावामुळे परिसरातील शेती ओलिताखाली येऊन हरितक्रांती होईल, अशी अपेक्षा होती. मात्र शेतीचे पाणी सिमेंट उद्योगाला दिले जात असल्याने शेतीला अद्यापही सिंचनाची प्रतीक्षा आहे.कोरपना तालुक्यात दोन सिंचन प्रकल्प आहेत. या दोन्ही प्रकल्पाचे पाणी उद्योगासाठी सिमेंट कंपन्यांना प्राधान्याने उपलब्ध करून दिल्याने प्रस्तावित लाभक्षेत्रातील अंदाजे दोन हजार हेक्टर शेती क्षेत्र सिंचनापासून वंचित आहे. परिणामी या क्षेत्रात सिंचनाची व्यवस्था असूनही सिंचनाची समस्या कायम आहे. ही समस्या टाळण्यासाठी तलाव आणि बोड्यांमधील गाळाचा उपसा करून पाटचारीची कामे करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.गेल्या दहा-पंधरा वर्षापासून लघु वितरिका नासधूस झालेल्या आहेत. अनेक गावात पाटचारीची कामे झालेली नाही. त्यामुळे शिवार ओला होत नसल्याने सिंचन राहूनसुद्धा शिवार कोरडवाहू पिके घेत आहे. पकडीगुड्डमवरुन ३५ किमी अंतरावर असलेल्या अंबुजा सिमेंट कंपनीला पाईपलाईन द्वारे पाणी पुरवठा होतो. गतवर्षी मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा झाल्याने एप्रिल व मे महिन्यात १२ गावांची नळयोजना बंद पडली होती. जिवंत जलसाठ्यातून कंपनीसाठी पाणी आरक्षित असल्याने व २५.६८ टक्के पाण्याची उचल होत असल्याने ९४३ हेक्टर सिंचनाला फटका बसत आहे. तसेच रब्बी, खरीप हंगामात आजतागायत पाटबंधारे विभाग प्रस्तावित उद्दीष्ट साध्य करण्यास असमर्थ ठरत असून २५ टक्के गावांत पाणीच पोहचलेले नाही. तसेच अमलनाला येथूल अल्ट्राटेक, माणिकगड या सिमेंट कंपन्यांसाठी १६.२० टक्के पाणी आरक्षित आहे. २०१५-१६ मध्ये अमलनाला प्रकल्पाचे सॅटेलाईट सर्वेनुसार १.६५ द.क्ष.मी. पाणी साठा गाळ साचल्यामुळे जलसाठ्यात घट झाली. ही गाळ काढण्यासाठी व पिपर्डा शिवारात पाटचारी ऐवजी पाईप डिस्ट्रीब्यूशन सिस्टीम द्वारे प्रायोगिक तत्वावर सिंचनाची सोय उपलब्ध करण्याची मागणी पालकमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. याची दखल व सकारात्मक भूमिका घेत संबंधित विभागाला पालकमंत्र्यांना निर्देश दिले. विभागाकडून या विषयी हालचाली सुद्धा झाल्या आहेत. अनेक ठिकाणच्या गळतीमुळे कालव्याचे पाणी शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही. येथील मुख्य कालव्यांची दुरुस्ती, पकडीगुड्डम वितरिका, लघु वितरीकाची गरज असून या पूर्वी तीन कोटींचा निधी सांडव्यावर खर्च झाला. मात्र त्याचा काहीच उपयोग सिंचनासाठी झाला नाही. नव्याने पाच कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्यास या भागातील दहा ते पंधरा गावांना सिंचनाचा लाभ होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात असून याची प्रशासनाने दखल घेण्याची मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)उच्च पातळीचे बांध बांधल्यास शेतीला मिळेल पाणीतालुक्याच्या उत्तरेस पैनगंगा नदी वाहते. मात्र यावर उच्च पातळीचे बांध नसल्याने पाणी वाहून जाते. नदीवर उद्योगासाठी कंपनीमार्फत बंधारा बांधल्यास चार त पाच किमी अंतरावरुन सिमेंट कंपन्यांना व शेतकऱ्यांनाही हक्काचे पाणी उपलब्ध होईल तसेच याचा लाभ कोरपना, राजूरा तालुक्यासह घुग्घुस आणि यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील शेतीलासुद्धा होऊ शकतो.