शहरं
Join us  
Trending Stories
1
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
2
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
3
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
4
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
5
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
6
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
7
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
8
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
9
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
10
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
12
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
13
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
14
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
15
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
16
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
17
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
18
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
19
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
20
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं

शेतीचे पाणी सिमेंट कंपन्यांना

By admin | Updated: March 6, 2017 00:32 IST

आदिवासीबहुल क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोरपना तालुक्यातील पकडीगुड्डम व अमलनाला तलावाची....

शेतकरी वंचित : तलावातील गाळ उपसा करण्याची मागणीकोरपना : आदिवासीबहुल क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोरपना तालुक्यातील पकडीगुड्डम व अमलनाला तलावाची निर्मिती होऊन ३० वर्षाचा कालावधी लोटला आहे. या तलावामुळे परिसरातील शेती ओलिताखाली येऊन हरितक्रांती होईल, अशी अपेक्षा होती. मात्र शेतीचे पाणी सिमेंट उद्योगाला दिले जात असल्याने शेतीला अद्यापही सिंचनाची प्रतीक्षा आहे.कोरपना तालुक्यात दोन सिंचन प्रकल्प आहेत. या दोन्ही प्रकल्पाचे पाणी उद्योगासाठी सिमेंट कंपन्यांना प्राधान्याने उपलब्ध करून दिल्याने प्रस्तावित लाभक्षेत्रातील अंदाजे दोन हजार हेक्टर शेती क्षेत्र सिंचनापासून वंचित आहे. परिणामी या क्षेत्रात सिंचनाची व्यवस्था असूनही सिंचनाची समस्या कायम आहे. ही समस्या टाळण्यासाठी तलाव आणि बोड्यांमधील गाळाचा उपसा करून पाटचारीची कामे करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.गेल्या दहा-पंधरा वर्षापासून लघु वितरिका नासधूस झालेल्या आहेत. अनेक गावात पाटचारीची कामे झालेली नाही. त्यामुळे शिवार ओला होत नसल्याने सिंचन राहूनसुद्धा शिवार कोरडवाहू पिके घेत आहे. पकडीगुड्डमवरुन ३५ किमी अंतरावर असलेल्या अंबुजा सिमेंट कंपनीला पाईपलाईन द्वारे पाणी पुरवठा होतो. गतवर्षी मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा झाल्याने एप्रिल व मे महिन्यात १२ गावांची नळयोजना बंद पडली होती. जिवंत जलसाठ्यातून कंपनीसाठी पाणी आरक्षित असल्याने व २५.६८ टक्के पाण्याची उचल होत असल्याने ९४३ हेक्टर सिंचनाला फटका बसत आहे. तसेच रब्बी, खरीप हंगामात आजतागायत पाटबंधारे विभाग प्रस्तावित उद्दीष्ट साध्य करण्यास असमर्थ ठरत असून २५ टक्के गावांत पाणीच पोहचलेले नाही. तसेच अमलनाला येथूल अल्ट्राटेक, माणिकगड या सिमेंट कंपन्यांसाठी १६.२० टक्के पाणी आरक्षित आहे. २०१५-१६ मध्ये अमलनाला प्रकल्पाचे सॅटेलाईट सर्वेनुसार १.६५ द.क्ष.मी. पाणी साठा गाळ साचल्यामुळे जलसाठ्यात घट झाली. ही गाळ काढण्यासाठी व पिपर्डा शिवारात पाटचारी ऐवजी पाईप डिस्ट्रीब्यूशन सिस्टीम द्वारे प्रायोगिक तत्वावर सिंचनाची सोय उपलब्ध करण्याची मागणी पालकमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. याची दखल व सकारात्मक भूमिका घेत संबंधित विभागाला पालकमंत्र्यांना निर्देश दिले. विभागाकडून या विषयी हालचाली सुद्धा झाल्या आहेत. अनेक ठिकाणच्या गळतीमुळे कालव्याचे पाणी शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही. येथील मुख्य कालव्यांची दुरुस्ती, पकडीगुड्डम वितरिका, लघु वितरीकाची गरज असून या पूर्वी तीन कोटींचा निधी सांडव्यावर खर्च झाला. मात्र त्याचा काहीच उपयोग सिंचनासाठी झाला नाही. नव्याने पाच कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्यास या भागातील दहा ते पंधरा गावांना सिंचनाचा लाभ होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात असून याची प्रशासनाने दखल घेण्याची मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)उच्च पातळीचे बांध बांधल्यास शेतीला मिळेल पाणीतालुक्याच्या उत्तरेस पैनगंगा नदी वाहते. मात्र यावर उच्च पातळीचे बांध नसल्याने पाणी वाहून जाते. नदीवर उद्योगासाठी कंपनीमार्फत बंधारा बांधल्यास चार त पाच किमी अंतरावरुन सिमेंट कंपन्यांना व शेतकऱ्यांनाही हक्काचे पाणी उपलब्ध होईल तसेच याचा लाभ कोरपना, राजूरा तालुक्यासह घुग्घुस आणि यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील शेतीलासुद्धा होऊ शकतो.