शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
5
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
6
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
7
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
8
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
9
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
10
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
11
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
12
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
13
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
14
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
15
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
16
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
17
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
18
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
19
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
20
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर

शेतीचे पाणी सिमेंट कंपन्यांना

By admin | Updated: March 6, 2017 00:32 IST

आदिवासीबहुल क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोरपना तालुक्यातील पकडीगुड्डम व अमलनाला तलावाची....

शेतकरी वंचित : तलावातील गाळ उपसा करण्याची मागणीकोरपना : आदिवासीबहुल क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोरपना तालुक्यातील पकडीगुड्डम व अमलनाला तलावाची निर्मिती होऊन ३० वर्षाचा कालावधी लोटला आहे. या तलावामुळे परिसरातील शेती ओलिताखाली येऊन हरितक्रांती होईल, अशी अपेक्षा होती. मात्र शेतीचे पाणी सिमेंट उद्योगाला दिले जात असल्याने शेतीला अद्यापही सिंचनाची प्रतीक्षा आहे.कोरपना तालुक्यात दोन सिंचन प्रकल्प आहेत. या दोन्ही प्रकल्पाचे पाणी उद्योगासाठी सिमेंट कंपन्यांना प्राधान्याने उपलब्ध करून दिल्याने प्रस्तावित लाभक्षेत्रातील अंदाजे दोन हजार हेक्टर शेती क्षेत्र सिंचनापासून वंचित आहे. परिणामी या क्षेत्रात सिंचनाची व्यवस्था असूनही सिंचनाची समस्या कायम आहे. ही समस्या टाळण्यासाठी तलाव आणि बोड्यांमधील गाळाचा उपसा करून पाटचारीची कामे करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.गेल्या दहा-पंधरा वर्षापासून लघु वितरिका नासधूस झालेल्या आहेत. अनेक गावात पाटचारीची कामे झालेली नाही. त्यामुळे शिवार ओला होत नसल्याने सिंचन राहूनसुद्धा शिवार कोरडवाहू पिके घेत आहे. पकडीगुड्डमवरुन ३५ किमी अंतरावर असलेल्या अंबुजा सिमेंट कंपनीला पाईपलाईन द्वारे पाणी पुरवठा होतो. गतवर्षी मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा झाल्याने एप्रिल व मे महिन्यात १२ गावांची नळयोजना बंद पडली होती. जिवंत जलसाठ्यातून कंपनीसाठी पाणी आरक्षित असल्याने व २५.६८ टक्के पाण्याची उचल होत असल्याने ९४३ हेक्टर सिंचनाला फटका बसत आहे. तसेच रब्बी, खरीप हंगामात आजतागायत पाटबंधारे विभाग प्रस्तावित उद्दीष्ट साध्य करण्यास असमर्थ ठरत असून २५ टक्के गावांत पाणीच पोहचलेले नाही. तसेच अमलनाला येथूल अल्ट्राटेक, माणिकगड या सिमेंट कंपन्यांसाठी १६.२० टक्के पाणी आरक्षित आहे. २०१५-१६ मध्ये अमलनाला प्रकल्पाचे सॅटेलाईट सर्वेनुसार १.६५ द.क्ष.मी. पाणी साठा गाळ साचल्यामुळे जलसाठ्यात घट झाली. ही गाळ काढण्यासाठी व पिपर्डा शिवारात पाटचारी ऐवजी पाईप डिस्ट्रीब्यूशन सिस्टीम द्वारे प्रायोगिक तत्वावर सिंचनाची सोय उपलब्ध करण्याची मागणी पालकमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. याची दखल व सकारात्मक भूमिका घेत संबंधित विभागाला पालकमंत्र्यांना निर्देश दिले. विभागाकडून या विषयी हालचाली सुद्धा झाल्या आहेत. अनेक ठिकाणच्या गळतीमुळे कालव्याचे पाणी शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही. येथील मुख्य कालव्यांची दुरुस्ती, पकडीगुड्डम वितरिका, लघु वितरीकाची गरज असून या पूर्वी तीन कोटींचा निधी सांडव्यावर खर्च झाला. मात्र त्याचा काहीच उपयोग सिंचनासाठी झाला नाही. नव्याने पाच कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्यास या भागातील दहा ते पंधरा गावांना सिंचनाचा लाभ होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात असून याची प्रशासनाने दखल घेण्याची मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)उच्च पातळीचे बांध बांधल्यास शेतीला मिळेल पाणीतालुक्याच्या उत्तरेस पैनगंगा नदी वाहते. मात्र यावर उच्च पातळीचे बांध नसल्याने पाणी वाहून जाते. नदीवर उद्योगासाठी कंपनीमार्फत बंधारा बांधल्यास चार त पाच किमी अंतरावरुन सिमेंट कंपन्यांना व शेतकऱ्यांनाही हक्काचे पाणी उपलब्ध होईल तसेच याचा लाभ कोरपना, राजूरा तालुक्यासह घुग्घुस आणि यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील शेतीलासुद्धा होऊ शकतो.