शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
2
“वाह फडणवीस वाह, एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार”
3
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
4
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
5
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
6
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
7
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
8
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
9
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
10
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
11
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
12
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
13
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
14
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
15
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
16
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
17
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
18
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
19
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
20
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण

खरेदीसाठी बाजारात गर्दी उसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:28 IST

चंद्रपूर : कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे रुग्णालयात बेडसुद्धा मिळत नसल्याची स्थिती असून दररोज २० ते २५ ...

चंद्रपूर : कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे रुग्णालयात बेडसुद्धा मिळत नसल्याची स्थिती असून दररोज २० ते २५ जणांचा मृत्यू होत आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापाऱ्यांसोबत चर्चा करून जनता कर्फ्यूची घोषणा केली आहे. त्यामुळे नागरिकांनी मंगळवारी खरेदीसाठी बाजारात एकच गर्दी केली होती. विशेषत: भाजी बाजारामध्ये तर पाय ठेवायलाही जागा नसल्याची स्थिती होती.

जिल्ह्यात रुग्णसंख्या ४० हजारांवर गेली असून मृत्यूदरही दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णालयांत रुग्णांना जागा नसल्याची स्थिती आहे. मात्र, नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नसून बाजारासह अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत. त्यामुळे रुग्ण कमी होण्यापेक्षा आणखीच वाढतच आहे. यावर उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने व्यापाऱ्यांसोबत चर्चा करून जनता कर्फ्यूची घोषणा केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी एक पत्रक काढून २१ ते २५ तसेच २८ एप्रिल ते १ मे पर्यंत जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे, या जनता कर्फ्यूमध्ये केवळ रुग्णालये, मेडिकल तसेच पेट्रोल पंप सुरू राहणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी किराणा तसेच भाजीपाला भरून ठेवण्यासाठी बाजारात गर्दी केल्याचे चित्र मंगळवारी दिवसभर बघायला मिळाले.

बाॅक्स

भाव कडाडले

जनता कर्फ्यूची घोषणा झाल्यानंतर नागरिकांनी बाजारात गर्दी केली. याच संधीचा फायदा उचलत काही व्यावसायिकांनी भाव वाढविल्याचा प्रकार आज बघायला मिळाला. विशेषत: भाजीचे भाव गगणाला भिडले आहे. सोबतच फळांचेही भाव वाढविण्यात आले. नागरिकांचा इलाज नसल्यामुळे मुकाट्याने त्यांनी खरेदी केली.

बाॅक्स

कोरोनाचा होणार प्रसार

जनता कर्फ्यूची घोषणा होताच नागरिकांनी बाजारात मोठी गर्दी केली. ज्या कारणासाठी जनता कर्फ्यू लावण्यात आला. त्यामुळेच गर्दीतून कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, बाजारात गर्दीवर नियंत्रणासाठी पोलीस अथवा महसूल प्रशासन फिरकलेसुद्धा नाही.