शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

खरेदीसाठी बाजारात गर्दी उसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:28 IST

चंद्रपूर : कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे रुग्णालयात बेडसुद्धा मिळत नसल्याची स्थिती असून दररोज २० ते २५ ...

चंद्रपूर : कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे रुग्णालयात बेडसुद्धा मिळत नसल्याची स्थिती असून दररोज २० ते २५ जणांचा मृत्यू होत आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापाऱ्यांसोबत चर्चा करून जनता कर्फ्यूची घोषणा केली आहे. त्यामुळे नागरिकांनी मंगळवारी खरेदीसाठी बाजारात एकच गर्दी केली होती. विशेषत: भाजी बाजारामध्ये तर पाय ठेवायलाही जागा नसल्याची स्थिती होती.

जिल्ह्यात रुग्णसंख्या ४० हजारांवर गेली असून मृत्यूदरही दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णालयांत रुग्णांना जागा नसल्याची स्थिती आहे. मात्र, नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नसून बाजारासह अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत. त्यामुळे रुग्ण कमी होण्यापेक्षा आणखीच वाढतच आहे. यावर उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने व्यापाऱ्यांसोबत चर्चा करून जनता कर्फ्यूची घोषणा केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी एक पत्रक काढून २१ ते २५ तसेच २८ एप्रिल ते १ मे पर्यंत जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे, या जनता कर्फ्यूमध्ये केवळ रुग्णालये, मेडिकल तसेच पेट्रोल पंप सुरू राहणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी किराणा तसेच भाजीपाला भरून ठेवण्यासाठी बाजारात गर्दी केल्याचे चित्र मंगळवारी दिवसभर बघायला मिळाले.

बाॅक्स

भाव कडाडले

जनता कर्फ्यूची घोषणा झाल्यानंतर नागरिकांनी बाजारात गर्दी केली. याच संधीचा फायदा उचलत काही व्यावसायिकांनी भाव वाढविल्याचा प्रकार आज बघायला मिळाला. विशेषत: भाजीचे भाव गगणाला भिडले आहे. सोबतच फळांचेही भाव वाढविण्यात आले. नागरिकांचा इलाज नसल्यामुळे मुकाट्याने त्यांनी खरेदी केली.

बाॅक्स

कोरोनाचा होणार प्रसार

जनता कर्फ्यूची घोषणा होताच नागरिकांनी बाजारात मोठी गर्दी केली. ज्या कारणासाठी जनता कर्फ्यू लावण्यात आला. त्यामुळेच गर्दीतून कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, बाजारात गर्दीवर नियंत्रणासाठी पोलीस अथवा महसूल प्रशासन फिरकलेसुद्धा नाही.