शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

ऐनवेळी कपाशीचे पीक धोक्यात

By admin | Updated: October 3, 2015 00:51 IST

मागील आठवड्यात सातत्याने तीन दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस पडला.

शेतकऱ्यांनी करावे काय ? : अकाली पावसाचा परिणामवरोरा : मागील आठवड्यात सातत्याने तीन दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. या पावसामुळे अनेक शेतातील कपाशीच्या झाडाचे मुळे जमिनीतून बाहेरच येत कपाशीचे झाडे वाळून गेले आहे. येत्या काही दिवसात कापूस हाती येणार असताना अकाली पावसाने कपाशीचे झाडे वाळत चालल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.यावर्षीचा हंगामात पावसाने चांगली सुरुवात केल्याने शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड केली. पावसाने काही काळ विश्रांती त्यानंतर पाऊस आल्याने कपाशी पिकाची आंतर मशागत चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना करता आल्याने कपाशीचे पिक चांगले आहे. सध्या कपाशी पिकाला पात्या व बोंड असल्याने दसऱ्यामध्ये कापूस विकण्याचे मनसूबे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी रचले होते. अनेक ठिकाणी कपाशीच्या झाडांना कापूसही दिसू लागला असल्याने शेतकरी आनंदी दिसत होता. परंतु मागील आठवड्यात पावसाने तीन दिवस बस्तान मांडल्याने शेतकऱ्यांच्या मनसुब्यावर पाणी फेरले असल्याचे दिसून येत आहे. तीन दिवस सातत्याने पाऊस झाल्याने वरोरा तालुक्यातील माढेळी, येवती, नागरी, शेंबळक, डोंगरगाव, चिकणी आदी गावालगतच्या कपाशीच्या शेतातील कपाशीचे झाडे वाळत आहे. शेतात पाणी साचल्यामुळे कपाशीच्या झाडाच्या मुळांनी जमीन सोडून दिल्याने बोंड व पात्या असलेले कपाशीचे झाडे जमिनीवर लोळत आहे. तर मुळ कमजोर झाल्याने झाडाची द्रव्य शोषण्याची शक्ती कमी झाल्याने अनेक रोग कपाशींवर आले आहे. त्यामुळे या संकटाचा सामना कसा करावा, या चिंतेत शेतकरी सापडला आहे. रोखीचे समजले जाणारे कपाशीचे पिक हातात येत असताना संकटे आल्याने कापूस उत्पादक शेतकरी तूर्तास हवालदिल झाला आहे. (तालुका प्रतिनिधी)जी कपाशीचे झाडे जमिनीपासून झुकली व सुकली आहे, अशा झाडांना मातीचा आधार देऊन पायाने हलका दाब देऊन झाड उभे करावे. झाडाच्या बुंध्याजवळ आवळणी करावी. युरिया १०० ग्रॅम, कॉपर आॅक्सीफ्लोराईड वीस ग्रॅम, ह्युमिक अ‍ॅसीड २० ग्रॅम याप्रमाणे दहा लिटर पाण्यात मिश्रण करुन प्रादुर्भाव ग्रस्त झाडाच्या बुंध्याजवळ द्यावे.-प्रशांत राऊत, संशोधक एकार्जुन