शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
3
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
4
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
5
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
6
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
7
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
8
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
9
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
10
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
11
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
12
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
13
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
14
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
15
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
16
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
17
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
18
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
19
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
20
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 

पहाडावरील पिके करपली

By admin | Updated: July 9, 2015 00:56 IST

निसर्गाच्या भरवशावर कोरडवाहु शेती करणाऱ्या पहाडावरील शेतकरी निसर्गाच्या दृष्टचक्रामुळे संकटात सापडला आहे.

जिवती : निसर्गाच्या भरवशावर कोरडवाहु शेती करणाऱ्या पहाडावरील शेतकरी निसर्गाच्या दृष्टचक्रामुळे संकटात सापडला आहे. पिके अंकुर काढण्यापूर्वीच उन्हाच्या चटक्याने करपू लागली आहेत. सावकारी कर्ज काढुन काळ्या आईची ओटी भरणारे शेतकरी यंदा तरी निसर्ग साथ देईल, अशी आशा बाळगून होते. मात्र अल्पवधीतच त्यांच्या स्वप्नाचा चुराडा केल्याने दुबार पेरणी तरी कशी करावी, अशा विवंचनेत पहाडावरील शेतकरी सापडला आहे.जिवती तालुका डोंगराळ व पहाडी भागात असल्याने संपूर्ण कोरडवाहु शेती आहे. जवळपास सगळ्याच शेतकऱ्यांनी सावकारी कर्ज काढुन मौल्यवान पिकाची लागवड केली आहे. सुरूवातीच्या दमदार पावसामुळे शेतातील पिके हिरवीगार दिसत होती. यावर्षी तरी निसर्ग साथ देईल, कर्जातून मुक्ती मिळणार व सुखाचे जीवन जगणार, अशी आशा मनात बाळगली होती. शेतातील हिरवीगार पिके पाहून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसत होते. मात्र आठ दिवसांपासून परिसरात पावसाचा पत्ता नसल्याने पिकाची वाढ थांबुन खडकाळे रानातील पिके करपली जात आहे. पाऊस आज पडेल, उद्या पडेल या आशेवर शेतकरी आहेत. मात्र पावसाने चांगलीच दडी मारल्याने त्यांचे चेहरे सुकले आहे. पेरणी करताना, सावकारी कर्ज, बँक कर्ज, उंबरठे झिजवून व्याजासह पैसा देण्याच्या बोलीने त्यांनी शेतीत खर्च केले. अशीच स्थिती कायम राहिल्यास खरीपाच्या पेरणीवर केलेला खर्च पाण्यात जाण्याच्या मार्गावर आहे. परिसरात सिंचनाची कुठलीच सोय नाही. निसर्गाच्या भरवशावर शेतकरी कोरडवाहू शेती करतात. दिवसभर केलेल्या कामाचा मोबदला अधिक मिळावा, सावकारी कर्ज, बँक कर्जातून मुक्त व्हावे यासाठी नगदी पिक म्हणून सर्वात जास्त कापूस पिकाची लागवड परिसरात झाली असून कापसाबरोबरच सोयाबीन, ज्वारी, तुर, मुंग, उडीद आदी पिकेही मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र शेतातील हिरव्यागार पिकात मन लावून काम करणाऱ्या शेतकऱ्यांचे स्वप्न वर्षानुवर्षे भंगु लागले आहेत. दिवसेंदिवस वाढत जाणारी उन्हाची तिव्रता व शेतातील कोमेजलेली पिके पाहुन शेतकरी खचू लागला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांचे अंदाजपत्रक खरिप हंगामावरच अवलंबून असते. मुलांचे शिक्षण असो वा मुलां-मुलींचे लग्न, की सावकारी व बँक कर्ज हा खरीप हंगामावरच अवलंबून असतो. खरीप हंगामच हातातून गेला तर करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला असुन एकुणच तालुक्यातील खरिप हंगाम निसर्गाच्या लहरीपणामुळे धोक्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)