शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

पहाडावरील पिके करपली

By admin | Updated: July 9, 2015 00:56 IST

निसर्गाच्या भरवशावर कोरडवाहु शेती करणाऱ्या पहाडावरील शेतकरी निसर्गाच्या दृष्टचक्रामुळे संकटात सापडला आहे.

जिवती : निसर्गाच्या भरवशावर कोरडवाहु शेती करणाऱ्या पहाडावरील शेतकरी निसर्गाच्या दृष्टचक्रामुळे संकटात सापडला आहे. पिके अंकुर काढण्यापूर्वीच उन्हाच्या चटक्याने करपू लागली आहेत. सावकारी कर्ज काढुन काळ्या आईची ओटी भरणारे शेतकरी यंदा तरी निसर्ग साथ देईल, अशी आशा बाळगून होते. मात्र अल्पवधीतच त्यांच्या स्वप्नाचा चुराडा केल्याने दुबार पेरणी तरी कशी करावी, अशा विवंचनेत पहाडावरील शेतकरी सापडला आहे.जिवती तालुका डोंगराळ व पहाडी भागात असल्याने संपूर्ण कोरडवाहु शेती आहे. जवळपास सगळ्याच शेतकऱ्यांनी सावकारी कर्ज काढुन मौल्यवान पिकाची लागवड केली आहे. सुरूवातीच्या दमदार पावसामुळे शेतातील पिके हिरवीगार दिसत होती. यावर्षी तरी निसर्ग साथ देईल, कर्जातून मुक्ती मिळणार व सुखाचे जीवन जगणार, अशी आशा मनात बाळगली होती. शेतातील हिरवीगार पिके पाहून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसत होते. मात्र आठ दिवसांपासून परिसरात पावसाचा पत्ता नसल्याने पिकाची वाढ थांबुन खडकाळे रानातील पिके करपली जात आहे. पाऊस आज पडेल, उद्या पडेल या आशेवर शेतकरी आहेत. मात्र पावसाने चांगलीच दडी मारल्याने त्यांचे चेहरे सुकले आहे. पेरणी करताना, सावकारी कर्ज, बँक कर्ज, उंबरठे झिजवून व्याजासह पैसा देण्याच्या बोलीने त्यांनी शेतीत खर्च केले. अशीच स्थिती कायम राहिल्यास खरीपाच्या पेरणीवर केलेला खर्च पाण्यात जाण्याच्या मार्गावर आहे. परिसरात सिंचनाची कुठलीच सोय नाही. निसर्गाच्या भरवशावर शेतकरी कोरडवाहू शेती करतात. दिवसभर केलेल्या कामाचा मोबदला अधिक मिळावा, सावकारी कर्ज, बँक कर्जातून मुक्त व्हावे यासाठी नगदी पिक म्हणून सर्वात जास्त कापूस पिकाची लागवड परिसरात झाली असून कापसाबरोबरच सोयाबीन, ज्वारी, तुर, मुंग, उडीद आदी पिकेही मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र शेतातील हिरव्यागार पिकात मन लावून काम करणाऱ्या शेतकऱ्यांचे स्वप्न वर्षानुवर्षे भंगु लागले आहेत. दिवसेंदिवस वाढत जाणारी उन्हाची तिव्रता व शेतातील कोमेजलेली पिके पाहुन शेतकरी खचू लागला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांचे अंदाजपत्रक खरिप हंगामावरच अवलंबून असते. मुलांचे शिक्षण असो वा मुलां-मुलींचे लग्न, की सावकारी व बँक कर्ज हा खरीप हंगामावरच अवलंबून असतो. खरीप हंगामच हातातून गेला तर करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला असुन एकुणच तालुक्यातील खरिप हंगाम निसर्गाच्या लहरीपणामुळे धोक्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)