शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

पहाडावरील पिके करपली

By admin | Updated: July 9, 2015 00:56 IST

निसर्गाच्या भरवशावर कोरडवाहु शेती करणाऱ्या पहाडावरील शेतकरी निसर्गाच्या दृष्टचक्रामुळे संकटात सापडला आहे.

जिवती : निसर्गाच्या भरवशावर कोरडवाहु शेती करणाऱ्या पहाडावरील शेतकरी निसर्गाच्या दृष्टचक्रामुळे संकटात सापडला आहे. पिके अंकुर काढण्यापूर्वीच उन्हाच्या चटक्याने करपू लागली आहेत. सावकारी कर्ज काढुन काळ्या आईची ओटी भरणारे शेतकरी यंदा तरी निसर्ग साथ देईल, अशी आशा बाळगून होते. मात्र अल्पवधीतच त्यांच्या स्वप्नाचा चुराडा केल्याने दुबार पेरणी तरी कशी करावी, अशा विवंचनेत पहाडावरील शेतकरी सापडला आहे.जिवती तालुका डोंगराळ व पहाडी भागात असल्याने संपूर्ण कोरडवाहु शेती आहे. जवळपास सगळ्याच शेतकऱ्यांनी सावकारी कर्ज काढुन मौल्यवान पिकाची लागवड केली आहे. सुरूवातीच्या दमदार पावसामुळे शेतातील पिके हिरवीगार दिसत होती. यावर्षी तरी निसर्ग साथ देईल, कर्जातून मुक्ती मिळणार व सुखाचे जीवन जगणार, अशी आशा मनात बाळगली होती. शेतातील हिरवीगार पिके पाहून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसत होते. मात्र आठ दिवसांपासून परिसरात पावसाचा पत्ता नसल्याने पिकाची वाढ थांबुन खडकाळे रानातील पिके करपली जात आहे. पाऊस आज पडेल, उद्या पडेल या आशेवर शेतकरी आहेत. मात्र पावसाने चांगलीच दडी मारल्याने त्यांचे चेहरे सुकले आहे. पेरणी करताना, सावकारी कर्ज, बँक कर्ज, उंबरठे झिजवून व्याजासह पैसा देण्याच्या बोलीने त्यांनी शेतीत खर्च केले. अशीच स्थिती कायम राहिल्यास खरीपाच्या पेरणीवर केलेला खर्च पाण्यात जाण्याच्या मार्गावर आहे. परिसरात सिंचनाची कुठलीच सोय नाही. निसर्गाच्या भरवशावर शेतकरी कोरडवाहू शेती करतात. दिवसभर केलेल्या कामाचा मोबदला अधिक मिळावा, सावकारी कर्ज, बँक कर्जातून मुक्त व्हावे यासाठी नगदी पिक म्हणून सर्वात जास्त कापूस पिकाची लागवड परिसरात झाली असून कापसाबरोबरच सोयाबीन, ज्वारी, तुर, मुंग, उडीद आदी पिकेही मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र शेतातील हिरव्यागार पिकात मन लावून काम करणाऱ्या शेतकऱ्यांचे स्वप्न वर्षानुवर्षे भंगु लागले आहेत. दिवसेंदिवस वाढत जाणारी उन्हाची तिव्रता व शेतातील कोमेजलेली पिके पाहुन शेतकरी खचू लागला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांचे अंदाजपत्रक खरिप हंगामावरच अवलंबून असते. मुलांचे शिक्षण असो वा मुलां-मुलींचे लग्न, की सावकारी व बँक कर्ज हा खरीप हंगामावरच अवलंबून असतो. खरीप हंगामच हातातून गेला तर करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला असुन एकुणच तालुक्यातील खरिप हंगाम निसर्गाच्या लहरीपणामुळे धोक्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)