शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! उद्धव आणि राज सभास्थळी दाखल
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
4
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
5
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
6
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
7
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
8
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
9
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
10
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
11
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
12
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
13
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
14
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
15
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
16
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
17
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
18
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
19
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
20
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?

पहाडावरील पिके करपली

By admin | Updated: July 9, 2015 00:56 IST

निसर्गाच्या भरवशावर कोरडवाहु शेती करणाऱ्या पहाडावरील शेतकरी निसर्गाच्या दृष्टचक्रामुळे संकटात सापडला आहे.

जिवती : निसर्गाच्या भरवशावर कोरडवाहु शेती करणाऱ्या पहाडावरील शेतकरी निसर्गाच्या दृष्टचक्रामुळे संकटात सापडला आहे. पिके अंकुर काढण्यापूर्वीच उन्हाच्या चटक्याने करपू लागली आहेत. सावकारी कर्ज काढुन काळ्या आईची ओटी भरणारे शेतकरी यंदा तरी निसर्ग साथ देईल, अशी आशा बाळगून होते. मात्र अल्पवधीतच त्यांच्या स्वप्नाचा चुराडा केल्याने दुबार पेरणी तरी कशी करावी, अशा विवंचनेत पहाडावरील शेतकरी सापडला आहे.जिवती तालुका डोंगराळ व पहाडी भागात असल्याने संपूर्ण कोरडवाहु शेती आहे. जवळपास सगळ्याच शेतकऱ्यांनी सावकारी कर्ज काढुन मौल्यवान पिकाची लागवड केली आहे. सुरूवातीच्या दमदार पावसामुळे शेतातील पिके हिरवीगार दिसत होती. यावर्षी तरी निसर्ग साथ देईल, कर्जातून मुक्ती मिळणार व सुखाचे जीवन जगणार, अशी आशा मनात बाळगली होती. शेतातील हिरवीगार पिके पाहून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसत होते. मात्र आठ दिवसांपासून परिसरात पावसाचा पत्ता नसल्याने पिकाची वाढ थांबुन खडकाळे रानातील पिके करपली जात आहे. पाऊस आज पडेल, उद्या पडेल या आशेवर शेतकरी आहेत. मात्र पावसाने चांगलीच दडी मारल्याने त्यांचे चेहरे सुकले आहे. पेरणी करताना, सावकारी कर्ज, बँक कर्ज, उंबरठे झिजवून व्याजासह पैसा देण्याच्या बोलीने त्यांनी शेतीत खर्च केले. अशीच स्थिती कायम राहिल्यास खरीपाच्या पेरणीवर केलेला खर्च पाण्यात जाण्याच्या मार्गावर आहे. परिसरात सिंचनाची कुठलीच सोय नाही. निसर्गाच्या भरवशावर शेतकरी कोरडवाहू शेती करतात. दिवसभर केलेल्या कामाचा मोबदला अधिक मिळावा, सावकारी कर्ज, बँक कर्जातून मुक्त व्हावे यासाठी नगदी पिक म्हणून सर्वात जास्त कापूस पिकाची लागवड परिसरात झाली असून कापसाबरोबरच सोयाबीन, ज्वारी, तुर, मुंग, उडीद आदी पिकेही मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र शेतातील हिरव्यागार पिकात मन लावून काम करणाऱ्या शेतकऱ्यांचे स्वप्न वर्षानुवर्षे भंगु लागले आहेत. दिवसेंदिवस वाढत जाणारी उन्हाची तिव्रता व शेतातील कोमेजलेली पिके पाहुन शेतकरी खचू लागला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांचे अंदाजपत्रक खरिप हंगामावरच अवलंबून असते. मुलांचे शिक्षण असो वा मुलां-मुलींचे लग्न, की सावकारी व बँक कर्ज हा खरीप हंगामावरच अवलंबून असतो. खरीप हंगामच हातातून गेला तर करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला असुन एकुणच तालुक्यातील खरिप हंगाम निसर्गाच्या लहरीपणामुळे धोक्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)