शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?
5
सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात सापडला मानवी सांगाडा, मृतदेह कुणाचा? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती
6
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी, सहा हजारांहून अधिक पदं भरली जाणार, लगेच करा अर्ज!
7
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
8
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
9
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
10
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
13
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
14
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
15
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
16
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
17
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
18
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
19
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
20
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड

चंद्रपुरात घनकचऱ्याचा प्रश्न गंभीर

By admin | Updated: July 21, 2015 01:00 IST

चंद्रपूर शहर महानगरपालिकेने घरोघरी जाऊन कचरा संकलनाची व्यवस्था केली असली तरी नागरिक मात्र याबाबत

चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेने घरोघरी जाऊन कचरा संकलनाची व्यवस्था केली असली तरी नागरिक मात्र याबाबत कमालिचे उदासिन असल्याचे दिसून येत आहेत. शहरातील काही भागात घंटागाड्यांना प्रतिसाद न देता नागरिक घरातील कचरा रस्त्यावरच फेकून देत आहेत. त्यामुळे पावसाळ्यात आरोग्य बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.महानगर पालिकेने शहरातील घनकचरा संकलन करण्यासाठी एका कंत्राटदाराची नेमणूक केली असून यासाठी घंटागाड्यांचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे. या घंटागाड्या सध्या घरोघरी जाऊन कचरा संकलन करीत आहेत. मात्र मोठ्या इमारतींमध्ये राहणारे अनेकजण घरातील कचरा खाली उतरून घंटागाडीपर्यंत नेऊन देण्यासाठी कंटाळा करतात. नंतर जेव्हा जास्त कचरा जमा होतो. तेव्हा मग तो कचरा मिळेल त्या ठिकाणी फेकल्या जातो. शहरातील अनेक भागात असा प्रकार सुरू असल्याने घनकचऱ्याचा प्रश्न गंभीर होत आहे. येथील तुकूम परिसरातील प्रभाग दोनमध्ये कारमेल अकॅडमीच्या प्रवेशद्वाराजवळच्या रस्त्यावर आजुबाजूच्या परिसरातील नागरिक कचरा, शिळे अन्न, प्लॉस्टिक पिशव्या टाकत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिळ्या पदार्थांची दुर्गंधी, त्यावर घोंगावणाऱ्या माशा जीवजंतू यामुळे येथून जाणाऱ्या नागरिकांना नाकावर रुमाल ठेऊनच पुढे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांनाही याचा त्रास होत आहे. याबाबत महानगरपालिकेकडे अनेकदा तक्रारी करूनही कार्यवाही करण्यात आली नाही. मनपा प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)मोकाट जनावरांपासून धोका४घनकचऱ्याच्या ढिगाऱ्यावर मोकाट जनावरांचा कळप उभा असतो. त्यामुळे या जनावरांपासून विद्यार्थ्यांनाही धोका निर्माण झाला आहे. अशीच परिस्थिती शहरातील इतर भागातही असल्याचे दिसून येत आहे. स्वच्छ भारत मोहिमेचा फज्जा४एकीकडे स्वच्छ भारत मोहिम राबविली जात आहे, तर दुसरीकडे शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडत असल्याचे दिसत आहे. या घनकचऱ्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन शिवसेनेचे चंद्रपूर महानगर प्रमुख प्रमोद पाटील यांनी एका निवेदनाद्वारे आयुक्तांकडे केली आहे. या मागणीवर मनपा काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मलबा रस्त्यावर४शहरातील विविध वॉर्डात सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांची साफसफाई सुरू आहे. मात्र नाल्यातील मलबा एकतर नालिच्या काठावर अथवा रस्त्यावर टाकला जातो. गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे या मलब्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला बाधा पोहचत आहे. नालितून काढण्यात येणारा मलब्याची इतरत्र विल्हेवाट लावावी, अशी मागणी होत आहे.