शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

चंद्रपुरात घनकचऱ्याचा प्रश्न गंभीर

By admin | Updated: July 21, 2015 01:00 IST

चंद्रपूर शहर महानगरपालिकेने घरोघरी जाऊन कचरा संकलनाची व्यवस्था केली असली तरी नागरिक मात्र याबाबत

चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेने घरोघरी जाऊन कचरा संकलनाची व्यवस्था केली असली तरी नागरिक मात्र याबाबत कमालिचे उदासिन असल्याचे दिसून येत आहेत. शहरातील काही भागात घंटागाड्यांना प्रतिसाद न देता नागरिक घरातील कचरा रस्त्यावरच फेकून देत आहेत. त्यामुळे पावसाळ्यात आरोग्य बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.महानगर पालिकेने शहरातील घनकचरा संकलन करण्यासाठी एका कंत्राटदाराची नेमणूक केली असून यासाठी घंटागाड्यांचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे. या घंटागाड्या सध्या घरोघरी जाऊन कचरा संकलन करीत आहेत. मात्र मोठ्या इमारतींमध्ये राहणारे अनेकजण घरातील कचरा खाली उतरून घंटागाडीपर्यंत नेऊन देण्यासाठी कंटाळा करतात. नंतर जेव्हा जास्त कचरा जमा होतो. तेव्हा मग तो कचरा मिळेल त्या ठिकाणी फेकल्या जातो. शहरातील अनेक भागात असा प्रकार सुरू असल्याने घनकचऱ्याचा प्रश्न गंभीर होत आहे. येथील तुकूम परिसरातील प्रभाग दोनमध्ये कारमेल अकॅडमीच्या प्रवेशद्वाराजवळच्या रस्त्यावर आजुबाजूच्या परिसरातील नागरिक कचरा, शिळे अन्न, प्लॉस्टिक पिशव्या टाकत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिळ्या पदार्थांची दुर्गंधी, त्यावर घोंगावणाऱ्या माशा जीवजंतू यामुळे येथून जाणाऱ्या नागरिकांना नाकावर रुमाल ठेऊनच पुढे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांनाही याचा त्रास होत आहे. याबाबत महानगरपालिकेकडे अनेकदा तक्रारी करूनही कार्यवाही करण्यात आली नाही. मनपा प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)मोकाट जनावरांपासून धोका४घनकचऱ्याच्या ढिगाऱ्यावर मोकाट जनावरांचा कळप उभा असतो. त्यामुळे या जनावरांपासून विद्यार्थ्यांनाही धोका निर्माण झाला आहे. अशीच परिस्थिती शहरातील इतर भागातही असल्याचे दिसून येत आहे. स्वच्छ भारत मोहिमेचा फज्जा४एकीकडे स्वच्छ भारत मोहिम राबविली जात आहे, तर दुसरीकडे शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडत असल्याचे दिसत आहे. या घनकचऱ्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन शिवसेनेचे चंद्रपूर महानगर प्रमुख प्रमोद पाटील यांनी एका निवेदनाद्वारे आयुक्तांकडे केली आहे. या मागणीवर मनपा काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मलबा रस्त्यावर४शहरातील विविध वॉर्डात सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांची साफसफाई सुरू आहे. मात्र नाल्यातील मलबा एकतर नालिच्या काठावर अथवा रस्त्यावर टाकला जातो. गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे या मलब्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला बाधा पोहचत आहे. नालितून काढण्यात येणारा मलब्याची इतरत्र विल्हेवाट लावावी, अशी मागणी होत आहे.