शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात घनकचऱ्याचा प्रश्न गंभीर

By admin | Updated: July 21, 2015 01:00 IST

चंद्रपूर शहर महानगरपालिकेने घरोघरी जाऊन कचरा संकलनाची व्यवस्था केली असली तरी नागरिक मात्र याबाबत

चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेने घरोघरी जाऊन कचरा संकलनाची व्यवस्था केली असली तरी नागरिक मात्र याबाबत कमालिचे उदासिन असल्याचे दिसून येत आहेत. शहरातील काही भागात घंटागाड्यांना प्रतिसाद न देता नागरिक घरातील कचरा रस्त्यावरच फेकून देत आहेत. त्यामुळे पावसाळ्यात आरोग्य बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.महानगर पालिकेने शहरातील घनकचरा संकलन करण्यासाठी एका कंत्राटदाराची नेमणूक केली असून यासाठी घंटागाड्यांचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे. या घंटागाड्या सध्या घरोघरी जाऊन कचरा संकलन करीत आहेत. मात्र मोठ्या इमारतींमध्ये राहणारे अनेकजण घरातील कचरा खाली उतरून घंटागाडीपर्यंत नेऊन देण्यासाठी कंटाळा करतात. नंतर जेव्हा जास्त कचरा जमा होतो. तेव्हा मग तो कचरा मिळेल त्या ठिकाणी फेकल्या जातो. शहरातील अनेक भागात असा प्रकार सुरू असल्याने घनकचऱ्याचा प्रश्न गंभीर होत आहे. येथील तुकूम परिसरातील प्रभाग दोनमध्ये कारमेल अकॅडमीच्या प्रवेशद्वाराजवळच्या रस्त्यावर आजुबाजूच्या परिसरातील नागरिक कचरा, शिळे अन्न, प्लॉस्टिक पिशव्या टाकत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिळ्या पदार्थांची दुर्गंधी, त्यावर घोंगावणाऱ्या माशा जीवजंतू यामुळे येथून जाणाऱ्या नागरिकांना नाकावर रुमाल ठेऊनच पुढे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांनाही याचा त्रास होत आहे. याबाबत महानगरपालिकेकडे अनेकदा तक्रारी करूनही कार्यवाही करण्यात आली नाही. मनपा प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)मोकाट जनावरांपासून धोका४घनकचऱ्याच्या ढिगाऱ्यावर मोकाट जनावरांचा कळप उभा असतो. त्यामुळे या जनावरांपासून विद्यार्थ्यांनाही धोका निर्माण झाला आहे. अशीच परिस्थिती शहरातील इतर भागातही असल्याचे दिसून येत आहे. स्वच्छ भारत मोहिमेचा फज्जा४एकीकडे स्वच्छ भारत मोहिम राबविली जात आहे, तर दुसरीकडे शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडत असल्याचे दिसत आहे. या घनकचऱ्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन शिवसेनेचे चंद्रपूर महानगर प्रमुख प्रमोद पाटील यांनी एका निवेदनाद्वारे आयुक्तांकडे केली आहे. या मागणीवर मनपा काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मलबा रस्त्यावर४शहरातील विविध वॉर्डात सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांची साफसफाई सुरू आहे. मात्र नाल्यातील मलबा एकतर नालिच्या काठावर अथवा रस्त्यावर टाकला जातो. गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे या मलब्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला बाधा पोहचत आहे. नालितून काढण्यात येणारा मलब्याची इतरत्र विल्हेवाट लावावी, अशी मागणी होत आहे.