शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ गुन्ह्याला क्षमा नसावी

By admin | Updated: October 28, 2016 00:48 IST

आवळगाव येथील अल्पवयीन मुलीला शेतशिवारात जिवानीशी मारले. आरोपी राजेंद्र दयाराम शेंडे याला ब्रह्मपुरी व मेंडकी पोलिसांनी अल्पावधीत पकडले.

सामाजिक तेढीची घटना : मानवी विकृतीमुळे सामाजिक असंतोषब्रह्मपुरी : आवळगाव येथील अल्पवयीन मुलीला शेतशिवारात जिवानीशी मारले. आरोपी राजेंद्र दयाराम शेंडे याला ब्रह्मपुरी व मेंडकी पोलिसांनी अल्पावधीत पकडले. या नराधमाने केलेले कृत्य हे मानवी मनाला कलंकीत करणारे असून समाजात दुफळी माजविणारे आहे. अशा कौर्यकर्माला क्षमा नसावी, अशी भावना सर्वस्तरातून व्यक्त केली जात आहे.मृत मुलीचे वय खेळण्या-बागडण्याचे होते. अकरावीत शिक्षण घेत असताना आपण काही तरी मोठे होऊन घरचे अठराविश्व द्रारिद्य कमी करावे. घराण्याचे व समाजाचे नाव मोठ करावे, असा ध्यास कदाचित असावा. पण आपल्याच नाते संबंधातील व्यक्ती असा प्रसंग आपल्यावर कधीही करणार नाही, असा विचार तिने स्वप्नातही केला नसेल. नराधम राजेंद्र हा ३५ वर्षाचा असल्याने त्याने आपल्या परिपक्वतेच्या आधारावर पीडित मुलगी बहिणीसारखी आहे. तिच्या व आपल्या वयात दुप्पट अंतर आहे. आपल्याला पत्नी, मुलगा, आई-वडील, भाऊ असा कुटुंब आहे. त्याने या साऱ्या विवेकबुद्धीचा विचारच केला नसल्याने समाजाला, घराण्याला काळीमा फासण्याचे काम केले आहे.मृत मुलीचे आई-वडील, लहान दोन बहिणी व त्याहून एक लहान भाऊ या सर्वाची जबाबदारी दोन- तीन वर्षानंतर तिला पेलायची होती. तो आधारच निघून गेला, याचे शल्य आईच्या डोळ्यात दिसून येत होते. पडके घर, दोन वेळेचे पुरेसे जेवन नाही. घालायला चांगले कपडे नाहीत, याचे तरी भान नराधम राजेंद्रने ठेवले नाही.उलट, भाऊ ! जाताना मला आवाज देशील. मी तुझ्या सायकलवर येईन, असा तिने विश्वास ठेवला. पण त्याने मात्र घात केला. ही विकृती केवळ मानवी विचारातून निर्माण झाली असते. त्याला जात, समाज हा संबंध नसतो. पण नंतर मात्र हा संबंध जोडल्या जाऊन काहूर माजविले जाते. तेव्हा कायदा-सुव्यवस्था, पोषक वातावरण, सामाजिक सलोखा, असुरक्षतेची भावना न कळत जन्माला येत असते. ते समाज, जात, नेते, आणि जे-जे कोणी जाणकार आहेत, त्यांनी स्वत: समजून व व इतरांना समजवून सांगण्याची ही घटना आहे. केलेले कृत्य हे कल्पनेच्या बाहेरचे आहे. स्कार्पने गळा आवळते. नंतर स्कार्प सोडून वाचली तर काय होईल, या भीतीपोटी तिच्याच अंगावरचे कपडे फाडून त्याच्या चिंध्या करुन दोरी तयार करणे आणि त्या दोरीने हात बांधून ठेवणे, ही ‘विनाशकालीन बुद्धी’, जसी त्याला सूचली, त्यापेक्षा हे कृत्य करण्यापूर्वी सद्बुद्धीने विचार केला असता तर या खून झालेल्या अल्पवयीन मुलीवर ही पाळी आली नसती. (तालुका प्रतिनिधी)मानवी विकृतीची झळ समाजालामानवी विकृती ही मनुष्यामध्ये निर्माण होते. त्याला कोणताही समाज असे कृत्य करायला सांगत नाही. तरीही समाजा-समाजामध्ये वादळ माजविल्या जाते. हे कुठेतरी थांबले पाहिजे, असे समाजमन असलेल्या प्रत्येकाला वाटत असते. समाजा-समाजात तेढ निर्माण करणाऱ्या घटना अशा प्रवृत्तीमधून येत असतात. पण ही प्रवृत्ती केवळ एक किंवा एकापेक्षा जास्त व्यक्तीची स्वतंत्र राहत असते. मात्र, त्याची झळ दोन समाजातील व पर्यायाने सर्व जनतेला भोगावी लागते. ते कुठेतरी थांबण्याची व समजून घेण्याची पुरोगामी म्हणविणाऱ्यांनी समजून घेणे आवश्यक झाले आहे.