शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

‘त्या’ गुन्ह्याला क्षमा नसावी

By admin | Updated: October 28, 2016 00:48 IST

आवळगाव येथील अल्पवयीन मुलीला शेतशिवारात जिवानीशी मारले. आरोपी राजेंद्र दयाराम शेंडे याला ब्रह्मपुरी व मेंडकी पोलिसांनी अल्पावधीत पकडले.

सामाजिक तेढीची घटना : मानवी विकृतीमुळे सामाजिक असंतोषब्रह्मपुरी : आवळगाव येथील अल्पवयीन मुलीला शेतशिवारात जिवानीशी मारले. आरोपी राजेंद्र दयाराम शेंडे याला ब्रह्मपुरी व मेंडकी पोलिसांनी अल्पावधीत पकडले. या नराधमाने केलेले कृत्य हे मानवी मनाला कलंकीत करणारे असून समाजात दुफळी माजविणारे आहे. अशा कौर्यकर्माला क्षमा नसावी, अशी भावना सर्वस्तरातून व्यक्त केली जात आहे.मृत मुलीचे वय खेळण्या-बागडण्याचे होते. अकरावीत शिक्षण घेत असताना आपण काही तरी मोठे होऊन घरचे अठराविश्व द्रारिद्य कमी करावे. घराण्याचे व समाजाचे नाव मोठ करावे, असा ध्यास कदाचित असावा. पण आपल्याच नाते संबंधातील व्यक्ती असा प्रसंग आपल्यावर कधीही करणार नाही, असा विचार तिने स्वप्नातही केला नसेल. नराधम राजेंद्र हा ३५ वर्षाचा असल्याने त्याने आपल्या परिपक्वतेच्या आधारावर पीडित मुलगी बहिणीसारखी आहे. तिच्या व आपल्या वयात दुप्पट अंतर आहे. आपल्याला पत्नी, मुलगा, आई-वडील, भाऊ असा कुटुंब आहे. त्याने या साऱ्या विवेकबुद्धीचा विचारच केला नसल्याने समाजाला, घराण्याला काळीमा फासण्याचे काम केले आहे.मृत मुलीचे आई-वडील, लहान दोन बहिणी व त्याहून एक लहान भाऊ या सर्वाची जबाबदारी दोन- तीन वर्षानंतर तिला पेलायची होती. तो आधारच निघून गेला, याचे शल्य आईच्या डोळ्यात दिसून येत होते. पडके घर, दोन वेळेचे पुरेसे जेवन नाही. घालायला चांगले कपडे नाहीत, याचे तरी भान नराधम राजेंद्रने ठेवले नाही.उलट, भाऊ ! जाताना मला आवाज देशील. मी तुझ्या सायकलवर येईन, असा तिने विश्वास ठेवला. पण त्याने मात्र घात केला. ही विकृती केवळ मानवी विचारातून निर्माण झाली असते. त्याला जात, समाज हा संबंध नसतो. पण नंतर मात्र हा संबंध जोडल्या जाऊन काहूर माजविले जाते. तेव्हा कायदा-सुव्यवस्था, पोषक वातावरण, सामाजिक सलोखा, असुरक्षतेची भावना न कळत जन्माला येत असते. ते समाज, जात, नेते, आणि जे-जे कोणी जाणकार आहेत, त्यांनी स्वत: समजून व व इतरांना समजवून सांगण्याची ही घटना आहे. केलेले कृत्य हे कल्पनेच्या बाहेरचे आहे. स्कार्पने गळा आवळते. नंतर स्कार्प सोडून वाचली तर काय होईल, या भीतीपोटी तिच्याच अंगावरचे कपडे फाडून त्याच्या चिंध्या करुन दोरी तयार करणे आणि त्या दोरीने हात बांधून ठेवणे, ही ‘विनाशकालीन बुद्धी’, जसी त्याला सूचली, त्यापेक्षा हे कृत्य करण्यापूर्वी सद्बुद्धीने विचार केला असता तर या खून झालेल्या अल्पवयीन मुलीवर ही पाळी आली नसती. (तालुका प्रतिनिधी)मानवी विकृतीची झळ समाजालामानवी विकृती ही मनुष्यामध्ये निर्माण होते. त्याला कोणताही समाज असे कृत्य करायला सांगत नाही. तरीही समाजा-समाजामध्ये वादळ माजविल्या जाते. हे कुठेतरी थांबले पाहिजे, असे समाजमन असलेल्या प्रत्येकाला वाटत असते. समाजा-समाजात तेढ निर्माण करणाऱ्या घटना अशा प्रवृत्तीमधून येत असतात. पण ही प्रवृत्ती केवळ एक किंवा एकापेक्षा जास्त व्यक्तीची स्वतंत्र राहत असते. मात्र, त्याची झळ दोन समाजातील व पर्यायाने सर्व जनतेला भोगावी लागते. ते कुठेतरी थांबण्याची व समजून घेण्याची पुरोगामी म्हणविणाऱ्यांनी समजून घेणे आवश्यक झाले आहे.