शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

कापूस वेचण्याआधीच होतोयं काळा !

By admin | Updated: January 8, 2017 00:45 IST

कोरपना तालुक्याची औद्योगिक तालुका म्हणून सर्वत्र ओळख आहे. अल्ट्राटेक सिमेंट, माणिकगड, अंबुजा, मुर्ली अ‍ॅग्रो सिमेंट कंपन्यामुळे या तालुक्यातील औद्योगिकरण वाढले.

शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान : उद्योग येतात; पण पर्यावरणाचे काय?रत्नाकर चटप नांदाफाटा कोरपना तालुक्याची औद्योगिक तालुका म्हणून सर्वत्र ओळख आहे. अल्ट्राटेक सिमेंट, माणिकगड, अंबुजा, मुर्ली अ‍ॅग्रो सिमेंट कंपन्यामुळे या तालुक्यातील औद्योगिकरण वाढले. त्यानंतर गेल्या दोन वर्षापूर्वी विरुर- गाडेगाव गावात कोळसा खाण सुरु करण्यात आली. यात काहींना रोजगार मिळाला. झपाट्याने उत्पादनही सुरु आहे. मात्र क्षेत्रातील रस्त्यालगतच्या कापसाच्या पांढऱ्या शेत्या पुरत्या काळ्या झाल्या आहे.विशेष म्हणजे, कंपन्या झाल्या असल्या तरी गावातील अद्यापही १७ टक्के लोकांच्या रोजगाराचा प्रश्न कायम आहे. ज्यांच्या जमिनी उद्योगात गेल्या, त्यांना त्याचा मोबदला आणि नोकऱ्या मिळाल्या. ते कुटुंब सुखी झाले. परंतु ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी कोळसा खाणीत गेलेल्या नाहीत, त्यांच्यापुढे आता रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. गाडेगाव- भोयगाव व मुख्य मार्गाने दररोज २०० ते ३०० चारचाकी, सहाचाकी वाहनाची वर्दळ असते. कोळशाची वाहतूक करताना कोळशावर फाड्याही झाकल्या जात नाही. ऐवढेच नाही तर अनेक ट्रक रस्त्याच्या बाजूला उभे करण्यात येतात. यामुळे नगारिकांना वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होत आहे. कोळशाच्या धुळीमुळे शेतात असलेला पांढरा कापूस काळा पडला आहे. त्यामुळे वर्षभर कष्ट करुन राबराब राबणाऱ्या शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान होताना दिसत आहे. सदर कापसाची वेचणी करुन कापूस खरेदी केंद्रावर नेल्यानंतर कवडीमोल भावात कापसाची विक्री होत असल्याचे शेतकरी सांगत आहे. यातच कोळशाच्या जड वाहनांची वाहतूक गाडेगाव गावातून होते. यामुळे अपघाताची शक्यताही निर्माण झाली आहे. गावातील रस्त्यावर थातूरमातूर पाणी टाकून धुळीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न व्यवस्थापनामार्फत होत असला तरी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. वाहतूक नियंत्रणासाठी गावात व्यवस्थापणाने काही वाहतूक नियंत्रक नेमले खरे. परंतु रस्त्यावरची मोठी वर्दळ पाहता अपघाताची शक्यता दिवसेंदिवस निर्माण होत आहे. कोळशाचे उत्पादन दिवसेंदिवस वाढत असले तरी प्रदूषणाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.रस्त्यावर मोठे खड्डेकोळशाच्या वाहतुकीमुळे गाडेगाव - भोयगाव रस्त्याची अवस्था गंभीर झाली आहे. रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले असून प्रवाशांना नरकयातना सोसाव्या लागत आहे. याकडे कोळसा व्यवस्थापन आणि प्रशासनाकडून कोणतेही पाऊल उचलले जात नसल्याचे दिसते. वारंवार थातूरमातूर डागडूजी करुन गावकऱ्यांचे समाधान केले जात असले तरी रस्त्याची समस्या कायम आहे.