शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

अक्षय तृतीयाच्या विवाह मुहूर्ताला कोरोनाचे विरजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:29 IST

चंद्रपूर : साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी लग्न सोहळा आयोजित करण्याचा बहुतांश कुटुंबीयांचा कल असतो. ...

चंद्रपूर : साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी लग्न सोहळा आयोजित करण्याचा बहुतांश कुटुंबीयांचा कल असतो. मात्र यावर्षी कोरोना संकटामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशीचा सोहळा अनेकांनी रद्द केला असून, लग्न तारीख पुढे ढकलली आहे. परिणामी शहरातील एकाही लाॅन, मंगलकार्यालयामध्ये या दिवशी लग्न नाही. त्यातच २५ जणांच्याच उपस्थित लग्न उरकायचेे असल्याने मुहूर्ताच्या भानगडीत न पडता काहीजण लग्न करीत आहे. त्यामुळे लाॅन संचालक, कॅटरर्स तसेच यावर अवलंबून असलेल्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

दरवर्षी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लग्न करण्यासाठी अनेकांची लगबग असायची. मंगल कार्यालय बुक करण्यासाठी मोठी धावपळ व्हायची. अनेकवेळा या दिवशीची तारीखही मिळत नव्हती. मात्र यावर्षी एकसुद्धा लग्न या मुहूर्तावर नसल्याचे चित्र पहिल्यांदाच बघायला मिळत असल्याचे लाॅन तसेच मंगल संचालकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, दोन ते तीन महिन्यांपूर्वी या मुहूर्तावर अनेकांनी लग्नाची तारीख बुक केली. मात्र कोरोना संकटामुळे ॲडव्हान्स सुद्धा वापस करण्याची वेळ आली आहे. एवढेच नाही तर पुढील जून तसेच जुलै महिन्यांपर्यंतही लग्न तारीख रद्द करण्यात आल्याचे संचालकांनी सांगितले.

यासंदर्भात प्रशासकीय यंत्रणेला विचारले असता, काटेकोर नियमांचे पालन करून काहींना परवानगी देण्यात आली आहे. मात्र यातीलही अनेकांनी समारंभ रद्द केल्याची माहिती मिळाली आहे.

कोट

दरवर्षी अक्षय तृतीयेच्या विवाह मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात धामधूम असायची. अनेकांना लग्न करण्यासाठी मंगल कार्यालय, लाॅनमध्ये तारीख सुद्धा मिळत नव्हती. यावर्षी मात्र एकही लग्न या मुहूर्तावर नाही. काहींनी दोन ते तीन महिन्यापूर्वीच या मुहूर्तावर बुकिंग केली. मात्र कोरोना संकटामुळे त्यांनी ॲडव्हान्स सुद्धा वापस घेतला आहे.

- विश्वास बल्की

संचालक, विश्वास कॅटरर्स तथा बिछायात केंद्र

बाॅक्स

आर्थिक उलाढालही थांबली

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर विवाह सोहळ्यासह विविध शुभकार्याची सुरुवात व्हायची. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्बंध घातले आहे. त्यामुळे अनेकांनी लग्नकार्य तसेच अन्य कामाचा मुहूर्त पुढे ढकलला आहे. त्यामुळे कार्यक्रमच रद्द झाल्यामुळे व्यापाऱ्यांसह अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांची मोठे नुकसान झाले असून, बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल थांबली आहे.

बाॅक्स

२५ पाहुण्यांमध्ये कसे करणार लग्न

कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने लाॅकडाऊन केले. दरम्यान, २५ पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न उरकविण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे बहुतांश कुटुंबीयांनी लग्नाची तारीख पुढे ढकलली आहे, तर काहींनी घरच्या घरीच लग्नकार्य उरकून टाकले आहे. परिणामी कॅटरर्स, लाॅन, मंगलकार्यालय, घोडे, बॅंड, आचारी डेकोरेशन, संगित, एवढेच नाही तर वाहनचालक-मालक, जनरेटर चालकांचेही मोठे नुकसान झाले आहे.

बाॅक्स

बाजारपेठतही शांतता

साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त हा अक्षय तृतीयेच्या दिवशी असतो. या दिवसापासून अनेकजण शुभकार्याला सुरुवात करतात. विशेषत: विवाह बंधनात अडकणाऱ्या जोडप्यांची संख्या या दिवशी मोठी असते. या दिवसामध्ये बाजारपेठेत धामधूम असते. मात्र यावर्षी विवाह नाही की कोणते शुभकार्य नाही. त्यामुळे बाजारपेठेमध्ये स्मशानशांतता पसरली आहे.

बाॅक्स

नियमाचे पालन करून घरीच उरकले लग्न

कोरोनामुळे प्रशासनाची परवानगी घेऊन केवळ २५ पाहुण्यांच्या उपस्थित लग्न करण्याची परवानगी शासनाने दिली आहे. मात्र काहींनी परवानगीच्या भानगडीत न पडता घरच्या घरीच लग्न उरकले आहे.