शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
2
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
3
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
4
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
5
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
6
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
7
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
8
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
9
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
10
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
11
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
12
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
13
मोहम्मद युनूस यांचा तो एक निर्णय, ज्यामुळे बांगलादेश आज हिंसाचाराच्या आगीत होरपळतोय...
14
कोणती सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी पाहा डिटेल्स
15
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
16
कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले
17
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
19
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
20
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

अक्षय तृतीयाच्या विवाह मुहूर्ताला कोरोनाचे विरजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:29 IST

चंद्रपूर : साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी लग्न सोहळा आयोजित करण्याचा बहुतांश कुटुंबीयांचा कल असतो. ...

चंद्रपूर : साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी लग्न सोहळा आयोजित करण्याचा बहुतांश कुटुंबीयांचा कल असतो. मात्र यावर्षी कोरोना संकटामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशीचा सोहळा अनेकांनी रद्द केला असून, लग्न तारीख पुढे ढकलली आहे. परिणामी शहरातील एकाही लाॅन, मंगलकार्यालयामध्ये या दिवशी लग्न नाही. त्यातच २५ जणांच्याच उपस्थित लग्न उरकायचेे असल्याने मुहूर्ताच्या भानगडीत न पडता काहीजण लग्न करीत आहे. त्यामुळे लाॅन संचालक, कॅटरर्स तसेच यावर अवलंबून असलेल्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

दरवर्षी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लग्न करण्यासाठी अनेकांची लगबग असायची. मंगल कार्यालय बुक करण्यासाठी मोठी धावपळ व्हायची. अनेकवेळा या दिवशीची तारीखही मिळत नव्हती. मात्र यावर्षी एकसुद्धा लग्न या मुहूर्तावर नसल्याचे चित्र पहिल्यांदाच बघायला मिळत असल्याचे लाॅन तसेच मंगल संचालकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, दोन ते तीन महिन्यांपूर्वी या मुहूर्तावर अनेकांनी लग्नाची तारीख बुक केली. मात्र कोरोना संकटामुळे ॲडव्हान्स सुद्धा वापस करण्याची वेळ आली आहे. एवढेच नाही तर पुढील जून तसेच जुलै महिन्यांपर्यंतही लग्न तारीख रद्द करण्यात आल्याचे संचालकांनी सांगितले.

यासंदर्भात प्रशासकीय यंत्रणेला विचारले असता, काटेकोर नियमांचे पालन करून काहींना परवानगी देण्यात आली आहे. मात्र यातीलही अनेकांनी समारंभ रद्द केल्याची माहिती मिळाली आहे.

कोट

दरवर्षी अक्षय तृतीयेच्या विवाह मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात धामधूम असायची. अनेकांना लग्न करण्यासाठी मंगल कार्यालय, लाॅनमध्ये तारीख सुद्धा मिळत नव्हती. यावर्षी मात्र एकही लग्न या मुहूर्तावर नाही. काहींनी दोन ते तीन महिन्यापूर्वीच या मुहूर्तावर बुकिंग केली. मात्र कोरोना संकटामुळे त्यांनी ॲडव्हान्स सुद्धा वापस घेतला आहे.

- विश्वास बल्की

संचालक, विश्वास कॅटरर्स तथा बिछायात केंद्र

बाॅक्स

आर्थिक उलाढालही थांबली

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर विवाह सोहळ्यासह विविध शुभकार्याची सुरुवात व्हायची. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्बंध घातले आहे. त्यामुळे अनेकांनी लग्नकार्य तसेच अन्य कामाचा मुहूर्त पुढे ढकलला आहे. त्यामुळे कार्यक्रमच रद्द झाल्यामुळे व्यापाऱ्यांसह अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांची मोठे नुकसान झाले असून, बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल थांबली आहे.

बाॅक्स

२५ पाहुण्यांमध्ये कसे करणार लग्न

कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने लाॅकडाऊन केले. दरम्यान, २५ पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न उरकविण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे बहुतांश कुटुंबीयांनी लग्नाची तारीख पुढे ढकलली आहे, तर काहींनी घरच्या घरीच लग्नकार्य उरकून टाकले आहे. परिणामी कॅटरर्स, लाॅन, मंगलकार्यालय, घोडे, बॅंड, आचारी डेकोरेशन, संगित, एवढेच नाही तर वाहनचालक-मालक, जनरेटर चालकांचेही मोठे नुकसान झाले आहे.

बाॅक्स

बाजारपेठतही शांतता

साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त हा अक्षय तृतीयेच्या दिवशी असतो. या दिवसापासून अनेकजण शुभकार्याला सुरुवात करतात. विशेषत: विवाह बंधनात अडकणाऱ्या जोडप्यांची संख्या या दिवशी मोठी असते. या दिवसामध्ये बाजारपेठेत धामधूम असते. मात्र यावर्षी विवाह नाही की कोणते शुभकार्य नाही. त्यामुळे बाजारपेठेमध्ये स्मशानशांतता पसरली आहे.

बाॅक्स

नियमाचे पालन करून घरीच उरकले लग्न

कोरोनामुळे प्रशासनाची परवानगी घेऊन केवळ २५ पाहुण्यांच्या उपस्थित लग्न करण्याची परवानगी शासनाने दिली आहे. मात्र काहींनी परवानगीच्या भानगडीत न पडता घरच्या घरीच लग्न उरकले आहे.