शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

कोरोना संसर्गाने आजपर्यंत ४६० पुरुषांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:28 IST

चंद्रपूर : मागील वर्षभरापासून कोरोना संकटाने दहशत माजविली आहे. दरम्यान, एक ते दीड महिन्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ ...

चंद्रपूर : मागील वर्षभरापासून कोरोना संकटाने दहशत माजविली आहे. दरम्यान, एक ते दीड महिन्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली असून सध्या तर बिकट परिस्थिती आहे. मागील वर्षभरापासून कोरोनाने ४६० पुरुषांचा तर १६२ महिलांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, ३० ते ४० वयोगटातील ४२ जणांचा जीव गेला आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:सह इतरांची काळजी घेणे सध्या तरी अत्यावश्यक झाले आहे.

मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या वाढत असून मृत्युदरही वाढला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे, काही नागरिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल होण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे अगदी शेवटच्या क्षणी दाखल होत असल्यामुळे त्यांच्यावर योग्य उपचार होऊ शकत नसल्यामुळेच मृत्युदर वाढत असल्याचे बोलले जात आहे. नागरिकांनी वेळीच लक्ष देऊन औषधोपचार घेतल्यास कोरोनाच्या संकटातून मुक्त होता येते. मात्र नागरिक आजही ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत. त्यामुळे आता प्रशासनाने कठोर होऊन कारवाई करणे गरजेचे आहे. नाही तर आणखी कोरोनाचा उद्रेक वाढून या संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बाॅक्स

कोरोनाबाधित

पुरुष २६६८६

महिला १६७५८

बाॅक्स

६० च्या वरील मृतांची संख्या अधिक

जिल्ह्यात २० एप्रिलपर्यंत कोरोना मृत्यू झालेल्यांची संख्या सर्वाधिक असून ती ३२४ वर जाऊन पोहोचली आहे. तर ३० ते ४० वयोगटातील मृत्यू ४२ एवढे आहेत. विशेष म्हणजे, ५० ते ६० वयोगटातील मृत्यूचे प्रमाण २७.६५ टक्के एवढे आहे. यामध्ये पुरुष १२६ तर ४६ महिलांचा समावेश आहे. या वयोगटातील नागरिक जास्तीत जास्त बाहेर फिरण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळेच त्यांचा मृत्युदर अधिक असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

बाक्स

वयोगटानुसार मृत्यूचे प्रमाण

वर्ष पुरुष महिला

३० ते ४० ३३ ९

४० ते ५० ६७ १७

५० ते ६० १२६ ४६

६० ते त्यापुढे २३४ ९०

एकूण ४६० १६२