शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संसर्गाने आजपर्यंत ४६० पुरुषांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:28 IST

चंद्रपूर : मागील वर्षभरापासून कोरोना संकटाने दहशत माजविली आहे. दरम्यान, एक ते दीड महिन्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ ...

चंद्रपूर : मागील वर्षभरापासून कोरोना संकटाने दहशत माजविली आहे. दरम्यान, एक ते दीड महिन्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली असून सध्या तर बिकट परिस्थिती आहे. मागील वर्षभरापासून कोरोनाने ४६० पुरुषांचा तर १६२ महिलांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, ३० ते ४० वयोगटातील ४२ जणांचा जीव गेला आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:सह इतरांची काळजी घेणे सध्या तरी अत्यावश्यक झाले आहे.

मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या वाढत असून मृत्युदरही वाढला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे, काही नागरिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल होण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे अगदी शेवटच्या क्षणी दाखल होत असल्यामुळे त्यांच्यावर योग्य उपचार होऊ शकत नसल्यामुळेच मृत्युदर वाढत असल्याचे बोलले जात आहे. नागरिकांनी वेळीच लक्ष देऊन औषधोपचार घेतल्यास कोरोनाच्या संकटातून मुक्त होता येते. मात्र नागरिक आजही ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत. त्यामुळे आता प्रशासनाने कठोर होऊन कारवाई करणे गरजेचे आहे. नाही तर आणखी कोरोनाचा उद्रेक वाढून या संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बाॅक्स

कोरोनाबाधित

पुरुष २६६८६

महिला १६७५८

बाॅक्स

६० च्या वरील मृतांची संख्या अधिक

जिल्ह्यात २० एप्रिलपर्यंत कोरोना मृत्यू झालेल्यांची संख्या सर्वाधिक असून ती ३२४ वर जाऊन पोहोचली आहे. तर ३० ते ४० वयोगटातील मृत्यू ४२ एवढे आहेत. विशेष म्हणजे, ५० ते ६० वयोगटातील मृत्यूचे प्रमाण २७.६५ टक्के एवढे आहे. यामध्ये पुरुष १२६ तर ४६ महिलांचा समावेश आहे. या वयोगटातील नागरिक जास्तीत जास्त बाहेर फिरण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळेच त्यांचा मृत्युदर अधिक असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

बाक्स

वयोगटानुसार मृत्यूचे प्रमाण

वर्ष पुरुष महिला

३० ते ४० ३३ ९

४० ते ५० ६७ १७

५० ते ६० १२६ ४६

६० ते त्यापुढे २३४ ९०

एकूण ४६० १६२