शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
3
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
4
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
5
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
6
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
7
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
8
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
11
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
12
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
13
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
14
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
15
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
16
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
17
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
18
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
19
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
20
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!

कोरोनाच्या भीतीने उष्माघातही पळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:30 IST

चंद्रपूर : मागील वर्षीपासून कोरोना संकटामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी उष्णाघाताच्या दुष्परिणामाकडे दुर्लक्ष केले आहे. दरवर्षी उन्हाळ्याचे दिवस सुरू ...

चंद्रपूर : मागील वर्षीपासून कोरोना संकटामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी उष्णाघाताच्या दुष्परिणामाकडे दुर्लक्ष केले आहे. दरवर्षी उन्हाळ्याचे दिवस सुरू झाल्यानंतर आरोग्य विभागाला प्रारंभी उष्माघात कक्षाची निर्मिती करावी लागत होती. यावर्षीही या कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, अद्याप उष्माघाताचा रुग्ण आढळला नाही. त्यामुळे उष्माघात पळाला की काय, अशी स्थिती सध्या असून मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यात एकही उष्माघाताचा रुग्ण आढळला नसल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

कोरोना प्रादुर्भाव थांबविण्यासाठी लाॅकडाऊन करण्यात आले. याच काळात ऊनही तापले. मागील वर्षापासून नागरिक घरीच असल्यामुळे उष्माघाताचे प्रमाण घटले. या दिवसामध्ये चंद्रपूरसह परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात तापमानाने उच्चांक गाठला. २०२१ मध्ये मार्च महिन्यापासूनच ऊन तापायला लागले. एप्रिलच्या सुरुवातीलाच ४० अंशापर्यंत तापमान होते. मध्यंतरी ४४ अंशापर्यंत तापमान गेले. मागील दोन ते दिन दिवसांपासून तापमान कमी झाले असले तरी आणखी उन्हाळा संपायला अवधी आहे. लाॅकडाऊन तसेच कोरोनाच्या दहशतीमुळे नागरिक घरातच बंद झाले. त्यामुळे उष्माघाताचे परिणाम जाणवले नाहीत. आरोग्य यंत्रणेवर कोरोनामुळे ताण वाढला आहे. मात्र, उष्माघाताचे रुग्ण नसल्याने काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे.

बाॅक्स

उन्हाळा घरातच

जिल्ह्यात मार्च महिन्याच्या शेवटीपासून उन्हाचा पारा वाढला. याच काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडणे बंंद केले. दरम्यान, संचारबंदी त्यानंतर लाॅकडाऊन करण्यात आले. सकाळी ११ वाजेपर्यंत जीवनावश्यक साहित्य खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली. त्यामुळे दुपारच्या उन्हात बहुतांश नागरिक घराबाहेर पडत नाहीत. त्यातच लग्नसमारंभ तसेच इतर कार्यक्रमांवरही बंदी असल्यामुळे नागरिकांचा उष्माघातापासून बचाव झाला आहे.

बाॅक्स

सर्वाधिक तापमान

चंद्रपूर जिल्ह्याचे विदर्भातच नाही तर राज्यात तापमान सर्वाधित राहते. यावर्षीही पारा ४४ अंशापर्यंत पोहचला आहे. मे महिन्यातही पारा वाढलेलाच आहे. दरम्यान, मागील दोन ते तीन दिवसांपासून ढगाळी वातावरण असल्यामुळे तापमान घटले आहे. मात्र, नागरिक कोरोनामुळे घरातच राहणे पसंत करीत असल्यामुळे कोरोनासह उष्माघातापासूनही संरक्षण होत आहे.

कोट

कोरोना संकटामुळे नागरिक घराबाहेर पडले नाही. आरोग्य विभागाने उष्माघातापासून बचाव करण्यासाठी रुग्णालयात कक्षाची स्थापना केली आहे. मात्र, यावर्षी उष्माघाताचे रुग्ण अद्याप आढळला नाही.

-निवृत्ती राठोड

जिल्हा शल्यचिकित्सक