शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

कोरपना परिसराला औद्योगिक विकासाची आस

By admin | Updated: December 29, 2014 23:40 IST

तेलगंणाच्या सिमेवरील कोरपना तालुका औद्योगिकदृष्ट्या विकसित समजला जातो. परंतु उद्योगांची निर्मिती गडचांदूर या एकाच परिसरात झाली असल्याने उर्वरित तालुक्याचा परिसर उद्योगांपासून वंचीत आहे.

कान्हळगाव (कोरपना) : तेलगंणाच्या सिमेवरील कोरपना तालुका औद्योगिकदृष्ट्या विकसित समजला जातो. परंतु उद्योगांची निर्मिती गडचांदूर या एकाच परिसरात झाली असल्याने उर्वरित तालुक्याचा परिसर उद्योगांपासून वंचीत आहे. हा तालुका आदिवासीबहुल अतिदुर्गम, नक्षलग्रस्त मागासलेला म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील गडचांदूर-नांदा परिसर व्यतिरिक्त इतरत्र कुठेही मोठा उद्योग नाही. त्यामुळे दिवसेंदिवस सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत आहे. बेरोजगारांचा भरणा वाढल्यामुळे हाती मिळेल ते काम नाईलाजास्तव त्यांना करावे लागत आहे. बेरोजगारीच्या समस्येमुळे तालुक्यातील अनेक गावांतील सुशिक्षित तरुण इतरत्र ठिकाणी काम शोधताना दिसत आहे. तालुक्यात असलेल्या उद्योगात स्थानिकांना ऐवजी परप्रांतीयांचाच जास्त भरणा केला जाते आहे. या कारणाने बेरोजगारीची समस्या अधिक जटील होत चालली आहे. कोरपना परिसर व तालुक्याचा औद्योगिकदृष्ट्या विकास होण्यासाठी या भागात उद्योगांची निर्मिती होणे आवश्यक असल्याचे जाणकारांचे मत आहे. जेवरा-चोपन भागातील खनिज भागांना प्राधान्य देऊन तेथे उद्योगाची उभारणी करण्यात यावी, अशी मागणी आहे. औद्योगिक विकास केंद्राची (एमआयडीसी) या क्षेत्रात अद्यापही स्थापना करण्यात आली नाही. त्यामुळेच या परिसराचा औद्योगिकदृष्ट्या विकास खुंटला आहे.सध्यस्थितीत तालुक्याचा अर्धा भाग औद्योगिक व उर्वरित शेतीप्रधान आहे. त्यामुळे शेती व्यवसायावर अवलंबून राहावे लागते आहे. गडचांदूर, नांदा, नारंडा भागात उद्योग स्तिरावले असल्याने येथील विकास जलदगतीने घडून येते आहे. मात्र तालुक्याचे मुख्यालय असलेल्या कोरपना व परिसरातील कान्हळगाव, पारडी, जेवरा, परसोडा, कोठोडा, गोविंदपूर, कोडशी (बु.), दुर्गाडी, रुपापेठ, पांडुगुडा, मांगलहिरा, थिप्पा, उमलहिरा, चोपन चनई, मांडवा, सावलहिरा, खैरगाव, गांधीनगर, हातलोनी, कमलापूर, येरगव्हान, बोरगाव, धोपटाळा, हेटी, कातलाबोडी, तुळशी, पिपरी, माथा, कुसळ, पिपर्डा, वनसडी, महेंदी, आदी गावांकडे उद्योगच नसल्याने बेरोजगारीची समस्या आहे. यातील काही गावे, अतिदुर्गम व मागासलेली असल्याने या भागात विकासाचा सूर्य उगवला नाही. या भागातील औद्योगिकदृष्ट्या विकास घडून आल्यास, हा तालुका नक्कीच सुजलाम्, सुफलाम् झाल्याशिवाय राहणार नाही, असा आशावाद येथील जनतेकडून व्यक्त होत आहे. (वार्ताहर)