शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

कोरपना परिसराला औद्योगिक विकासाची आस

By admin | Updated: December 29, 2014 23:40 IST

तेलगंणाच्या सिमेवरील कोरपना तालुका औद्योगिकदृष्ट्या विकसित समजला जातो. परंतु उद्योगांची निर्मिती गडचांदूर या एकाच परिसरात झाली असल्याने उर्वरित तालुक्याचा परिसर उद्योगांपासून वंचीत आहे.

कान्हळगाव (कोरपना) : तेलगंणाच्या सिमेवरील कोरपना तालुका औद्योगिकदृष्ट्या विकसित समजला जातो. परंतु उद्योगांची निर्मिती गडचांदूर या एकाच परिसरात झाली असल्याने उर्वरित तालुक्याचा परिसर उद्योगांपासून वंचीत आहे. हा तालुका आदिवासीबहुल अतिदुर्गम, नक्षलग्रस्त मागासलेला म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील गडचांदूर-नांदा परिसर व्यतिरिक्त इतरत्र कुठेही मोठा उद्योग नाही. त्यामुळे दिवसेंदिवस सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत आहे. बेरोजगारांचा भरणा वाढल्यामुळे हाती मिळेल ते काम नाईलाजास्तव त्यांना करावे लागत आहे. बेरोजगारीच्या समस्येमुळे तालुक्यातील अनेक गावांतील सुशिक्षित तरुण इतरत्र ठिकाणी काम शोधताना दिसत आहे. तालुक्यात असलेल्या उद्योगात स्थानिकांना ऐवजी परप्रांतीयांचाच जास्त भरणा केला जाते आहे. या कारणाने बेरोजगारीची समस्या अधिक जटील होत चालली आहे. कोरपना परिसर व तालुक्याचा औद्योगिकदृष्ट्या विकास होण्यासाठी या भागात उद्योगांची निर्मिती होणे आवश्यक असल्याचे जाणकारांचे मत आहे. जेवरा-चोपन भागातील खनिज भागांना प्राधान्य देऊन तेथे उद्योगाची उभारणी करण्यात यावी, अशी मागणी आहे. औद्योगिक विकास केंद्राची (एमआयडीसी) या क्षेत्रात अद्यापही स्थापना करण्यात आली नाही. त्यामुळेच या परिसराचा औद्योगिकदृष्ट्या विकास खुंटला आहे.सध्यस्थितीत तालुक्याचा अर्धा भाग औद्योगिक व उर्वरित शेतीप्रधान आहे. त्यामुळे शेती व्यवसायावर अवलंबून राहावे लागते आहे. गडचांदूर, नांदा, नारंडा भागात उद्योग स्तिरावले असल्याने येथील विकास जलदगतीने घडून येते आहे. मात्र तालुक्याचे मुख्यालय असलेल्या कोरपना व परिसरातील कान्हळगाव, पारडी, जेवरा, परसोडा, कोठोडा, गोविंदपूर, कोडशी (बु.), दुर्गाडी, रुपापेठ, पांडुगुडा, मांगलहिरा, थिप्पा, उमलहिरा, चोपन चनई, मांडवा, सावलहिरा, खैरगाव, गांधीनगर, हातलोनी, कमलापूर, येरगव्हान, बोरगाव, धोपटाळा, हेटी, कातलाबोडी, तुळशी, पिपरी, माथा, कुसळ, पिपर्डा, वनसडी, महेंदी, आदी गावांकडे उद्योगच नसल्याने बेरोजगारीची समस्या आहे. यातील काही गावे, अतिदुर्गम व मागासलेली असल्याने या भागात विकासाचा सूर्य उगवला नाही. या भागातील औद्योगिकदृष्ट्या विकास घडून आल्यास, हा तालुका नक्कीच सुजलाम्, सुफलाम् झाल्याशिवाय राहणार नाही, असा आशावाद येथील जनतेकडून व्यक्त होत आहे. (वार्ताहर)