शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

कोरपना परिसराला औद्योगिक विकासाची आस

By admin | Updated: December 29, 2014 23:40 IST

तेलगंणाच्या सिमेवरील कोरपना तालुका औद्योगिकदृष्ट्या विकसित समजला जातो. परंतु उद्योगांची निर्मिती गडचांदूर या एकाच परिसरात झाली असल्याने उर्वरित तालुक्याचा परिसर उद्योगांपासून वंचीत आहे.

कान्हळगाव (कोरपना) : तेलगंणाच्या सिमेवरील कोरपना तालुका औद्योगिकदृष्ट्या विकसित समजला जातो. परंतु उद्योगांची निर्मिती गडचांदूर या एकाच परिसरात झाली असल्याने उर्वरित तालुक्याचा परिसर उद्योगांपासून वंचीत आहे. हा तालुका आदिवासीबहुल अतिदुर्गम, नक्षलग्रस्त मागासलेला म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील गडचांदूर-नांदा परिसर व्यतिरिक्त इतरत्र कुठेही मोठा उद्योग नाही. त्यामुळे दिवसेंदिवस सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत आहे. बेरोजगारांचा भरणा वाढल्यामुळे हाती मिळेल ते काम नाईलाजास्तव त्यांना करावे लागत आहे. बेरोजगारीच्या समस्येमुळे तालुक्यातील अनेक गावांतील सुशिक्षित तरुण इतरत्र ठिकाणी काम शोधताना दिसत आहे. तालुक्यात असलेल्या उद्योगात स्थानिकांना ऐवजी परप्रांतीयांचाच जास्त भरणा केला जाते आहे. या कारणाने बेरोजगारीची समस्या अधिक जटील होत चालली आहे. कोरपना परिसर व तालुक्याचा औद्योगिकदृष्ट्या विकास होण्यासाठी या भागात उद्योगांची निर्मिती होणे आवश्यक असल्याचे जाणकारांचे मत आहे. जेवरा-चोपन भागातील खनिज भागांना प्राधान्य देऊन तेथे उद्योगाची उभारणी करण्यात यावी, अशी मागणी आहे. औद्योगिक विकास केंद्राची (एमआयडीसी) या क्षेत्रात अद्यापही स्थापना करण्यात आली नाही. त्यामुळेच या परिसराचा औद्योगिकदृष्ट्या विकास खुंटला आहे.सध्यस्थितीत तालुक्याचा अर्धा भाग औद्योगिक व उर्वरित शेतीप्रधान आहे. त्यामुळे शेती व्यवसायावर अवलंबून राहावे लागते आहे. गडचांदूर, नांदा, नारंडा भागात उद्योग स्तिरावले असल्याने येथील विकास जलदगतीने घडून येते आहे. मात्र तालुक्याचे मुख्यालय असलेल्या कोरपना व परिसरातील कान्हळगाव, पारडी, जेवरा, परसोडा, कोठोडा, गोविंदपूर, कोडशी (बु.), दुर्गाडी, रुपापेठ, पांडुगुडा, मांगलहिरा, थिप्पा, उमलहिरा, चोपन चनई, मांडवा, सावलहिरा, खैरगाव, गांधीनगर, हातलोनी, कमलापूर, येरगव्हान, बोरगाव, धोपटाळा, हेटी, कातलाबोडी, तुळशी, पिपरी, माथा, कुसळ, पिपर्डा, वनसडी, महेंदी, आदी गावांकडे उद्योगच नसल्याने बेरोजगारीची समस्या आहे. यातील काही गावे, अतिदुर्गम व मागासलेली असल्याने या भागात विकासाचा सूर्य उगवला नाही. या भागातील औद्योगिकदृष्ट्या विकास घडून आल्यास, हा तालुका नक्कीच सुजलाम्, सुफलाम् झाल्याशिवाय राहणार नाही, असा आशावाद येथील जनतेकडून व्यक्त होत आहे. (वार्ताहर)