शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
3
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
4
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
5
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
6
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
7
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
8
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
9
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
10
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
11
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
12
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
13
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
14
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
15
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
16
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
17
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
18
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
19
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
20
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!

दुष्काळाचे ‘काऊंटडाऊन’ सुरू

By admin | Updated: July 8, 2015 01:08 IST

मृग नक्षत्रात धो-धो बरसून गेलेला पाऊस अद्याप परतलाच नाही. झालेल्या पावसाच्या बळावर पेरणी करून बसलेल्या शेतकऱ्यांची चिंता आता क्षणाक्षणाला वाढत आहे.

पिके आॅक्सिजनवर : कृषी विभाग म्हणतो, ४८ तासांत पाऊस हवासंतोष कुंडकर चंद्रपूरमृग नक्षत्रात धो-धो बरसून गेलेला पाऊस अद्याप परतलाच नाही. झालेल्या पावसाच्या बळावर पेरणी करून बसलेल्या शेतकऱ्यांची चिंता आता क्षणाक्षणाला वाढत आहे. एकूणच कोरड्या दुष्काळाचे ‘काऊंटडाऊन’ सुरू झाले असून येत्या ४८ तासांमध्ये पाऊस न पडल्यास बिजांकुर मातीच्या गर्भातच करपण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ होईल, अशी भीती कृषी विभागाने वर्तविली आहे. सध्या जिल्ह्यातील पिके आॅक्सीजनवर आहेत.मृग नक्षत्राच्या प्रारंभानंतर पहिल्याच आठवड्यात जिल्ह्यामध्ये सर्वदूर समाधानकारक पाऊस कोसळला. त्यावरून यंदा पाऊस ‘जमके’ बरसेल, असा अंदाज लावण्यात येत होता. हवामान खातेही त्याला पुष्टी देत होते. मात्र गेल्या १५ दिवसांत पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांपुढे दुष्काळाचे संकट घोंगावत आहे. पावसाअभावी हजारो रुपये खर्च करून केलेली पेरणी मातीमोल होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. ज्यांच्याकडे सिंचनाची सोय नाही, असे शेतकरी आपली पिके जगविण्यासाठी जीवाचे रान करीत आहेत.पिकांच्या वाढीवर परिणामसध्या पिकांना पाण्याची गरज आहे. मात्र पाऊसच नसल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून त्यामुळे उत्पादनातही घट होणार आहे. त्यामुळे बँका आणि सावकारांकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या काळजाची धडधड वाढली आहे. ७० टक्के पेरण्या आटोपल्याचंद्रपूर जिल्ह्यात धान हे मुख्य पीक असले तरी यंदा जिल्ह्यात कपाशीच्या पेऱ्यातही मोठी वाढ झाली आहे. सोयाबीनच्या क्षेत्रात मात्र घट झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात आठ हजार ७८४ हेक्टरवर धान, ३५ हजार हेक्टरवर सोयाबिन व एक लाख एक हजार हेक्टरवर कापसाची पेरणी आटोपली आहे. उर्वरित पेरण्या मात्र पावसाअभावी खोळंबल्या आहेत. पावसाने उघाड दिल्याने आंतरमशातीची कामेही अखेरच्या टप्प्यात आली आहेत. बळीराजा चातकासारखी पावसाची प्रतीक्षा करीत असला तरी पावसाची कोणतीच चिन्हे दिसत नाही. हवामान खात्याचा अंदाजही हवेतच विरलारविवारी हवामान खात्याने ४८ तासांत पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र तो अंदाजही हवेतच विरला आहे. ज्यांच्या शेताजवळून नाला वाहत आहे, ते शेतकरी मोटारपंपाद्वारे शेतात सिंचन करून पिकांना जगविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र कोरडवाहू शेतकरी पावसाअभावी काकुळतीला आला आहे. सध्या पिकांची अवस्था लक्षात घेता पावसाची नितांत गरज आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाची लक्षणे दिसत आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसांत पाऊस येण्याची अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही. -डॉ.ए.आर.हसनाबादेजिल्हा अधीक्षक,कृषी अधिकारी चंद्रपूरपाऊस न आल्याने धानाचे पऱ्हे कोमेजत असून सोयाबीनची रोपेही माना टाकत आहेत. दोन दिवसाच्या ढगाळ वातावरणाने कापसाची अवस्था सध्या तरी ठिक आहे. मात्र आता पावसाची नितांत गरज आहे. सुरूवातीला झालेल्या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या खऱ्या, परंतु नंतर पावसाने चांगलीच दडी मारली. पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.- मधुकर भलमे,शेतकरी, चारगाव (बु.)