शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
3
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
4
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
5
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
6
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
7
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
8
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
9
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
10
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
11
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
12
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
13
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
14
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
15
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
16
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
17
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
18
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
19
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
20
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...

शहिदांच्या मानवंदनेसाठी होणार चिमूर जिल्ह्याची निर्मिती

By admin | Updated: July 23, 2016 01:45 IST

देशाच्या स्वातंत्र लढ्यामध्ये इंग्रजाविरूद्ध ‘चले जाव’ आंदोलन करून १६ आॅगस्ट १९४२ रोजी इंग्रजांविरूद्ध मोठे आव्हान उभे करण्यात आले.

जिल्ह्याची मागणी ३६ वर्षे जुनी : सरकारच्या धोरणाने चिमूरकरांच्या आशा पल्लवित राजकुमार चुनारकर चिमूर देशाच्या स्वातंत्र लढ्यामध्ये इंग्रजाविरूद्ध ‘चले जाव’ आंदोलन करून १६ आॅगस्ट १९४२ रोजी इंग्रजांविरूद्ध मोठे आव्हान उभे करण्यात आले. या आंदोलनात अनेक क्रांतिकारक, महिला शहीद झाल्या. या आंदोलनांमुळे चिमूर शहर तीन दिवस स्वतंत्र होते. या स्वातंत्र्याच्या आंदोलनाची मुहूर्तमेढ चिमूर शहरातून रोवली गेली. त्यानंतर देशभरात आंदोलन होऊन भारत स्वतंत्र झाला. चिमूरकरांच्या क्रांतिकारी कामगिरीची दखल घेऊन चिमूरला क्रांती जिल्हा घोषित करावा, ही मागणी ३६ वर्षे जुनी आहे. शासनाच्या नविन जिल्हे निर्माण करण्याच्या हालचालींना वेग आला असून जिल्हा निर्मितीला मतदार संघाच्या निकषात चिमूर शहर बसत असल्याने व स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरी विचारात घेऊन चिमूरला जिल्हा घोषित करून शहिदांना मानवंदना देणार काय? तसेच शासनाच्या जिल्हा निर्मितीसाठी मतदारसंघाचा निकष ठेवल्याने चिमूरकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. देशात इंग्रज राजवट असताना इंग्रजाविरूद्धचे पहिले आंदोलन चिमूर शहरात १६ आॅगस्ट १९४२ रोजी झाले होते. त्याद्वारे देशात स्वातंत्र्य लढ्याची ‘मुहूर्तमेढ’ चिमुरातून रोवल्या गेली. त्यासाठी अनेकांनी आपली प्राणाची आहुती दिली. तसेच इंग्रज राजवटीत चिमूर जिल्हा असल्याचे स्वातंत्र्यसंग्राम सैनिक दाखले देत आहेत. मात्र स्वातंत्र्यानंतर चिमूर जिल्ह्याचा दर्जा काढण्यात आला. यापूर्वी चिमूरला जिल्ह्याचा दर्जा असल्याने शासनाचे लोकसभा क्षेत्रसुद्धा चिमूरच्या नावावर होते. याचाच अर्थ चिमूर हे जिल्ह्याचे ठिकाण होते, हे यावरून सिद्ध होते. कारण आजही प्रत्येक जिल्हा स्थळ हे लोकसभेचा मतदारसंघ आहे. स्वतंत्र भारतात चिमूरला जिल्हा न दिल्याने चिमूर जिल्हा घोषित करावा, यासाठी ३६ वर्षांपासून शासन दरबारी नागरिक निवेदन, आंदोलन करीत आहेत. आजही जिल्ह्यासाठी काहीही करण्याची तयारी चिमूरकर करीत आहेत. चिमूर जिल्हा निर्मितीसाठी १९८० पासून धरणे, आंदोलन, मोर्चे, उपोषण करत अनेकदा शिष्टमंडळाद्वारे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आली आहेत. मात्र राजकीय पुढाऱ्यांनी आज करू, उद्या करू, असे आश्वासनेच दिली आहेत. चिमूर क्रांती जिल्हा निर्मितीचा प्रश्न चिमूर व तालुक्यातील नागरिकांसाटी भावनिक प्रश्न असल्याने या मागणीकरिता सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन ५ जानेवारी २००० रोजी करण्यात आले होते. त्यामध्ये हजारो नागरिकांच्या जमावाने तहसील कार्यालयाची राख रांगोळी केली होती. या आंदोलनामध्ये अनेकांना तुरुंगामध्ये डांबण्यात आले होते. असा हा आंदोलनाचा क्रम आजही सुरूच आहे. शिवसेनेच्या वतीने जिल्हा निर्मितीसाठी मोर्चा काढण्यात आला. प्रशासकीय भवनावर ‘चिमूर क्रांती जिल्हा’ असा प्रतिकात्मक फलक लावला गेला. या दरम्यान तोडफोड झाली. त्यामध्ये गजानन बुटकेसह अनेकांना जेलमध्ये जावे लागले. चिमूर जिल्हा निर्मितीसाठी सर्वपक्षिय कृती समिती कार्यरत आहे. या समितीकडून प्रत्येक अधिवेशनात मुख्यमंत्री व महसूल मंत्री यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात येत आहे. या समितीमध्ये स्वातंत्र्य सैनिकांसह सर्वच राजकीय पुढाऱ्यांचा सहभाग असतो. या समितीचे कार्य नरेंद्र बडे (राजूरकर) यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे. चिमूरकरांनी जिल्ह्याच्या मागणीसाठी अनेक राजकीय पुढाऱ्याच्या सभा उधळल्या आहेत. भाजपाच्या विदर्भ वेगळा करण्यासाठी असलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे व राज्यात २२ जिल्हे निर्मितीबाबत शासन स्तरावर सुरू असलेल्या हालचालीमुळे नुकत्याच शासनाने जिल्हा निर्मितीसाठी मतदार संघाना निकष लावल्याने चिमूर हे लोकसभा मतदार संघासह विधानसभा क्षेत्रही आहे. तर भाजपाची देशात व राज्यात भाजपाची सत्ता असल्याने व चिमूरचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया हे भाजपाचे असल्याने चिमूरचा जिल्हा प्रश्न सभागृहात मांडून नक्कीच जिल्हा निर्मिती करून शहिदांना मानवंदना देण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची विश्वसनीय माहिती आहे. त्यामुळे येत्या काळात चिमूर क्रांती जिल्हा निर्मितीसाठी शासन शहिदांना मानवंदना देणार असल्याचे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांकडून बोलल्या जात आहे.