शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

नागभीड तालुक्यात काँग्रेसचा वरचष्मा

By admin | Updated: August 10, 2015 00:44 IST

घोषित करण्यात आलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावरून या तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे वर्चस्व निर्माण झाले आहे.

नागभीड : घोषित करण्यात आलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावरून या तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे वर्चस्व निर्माण झाले आहे.नागभीड तालुक्यात ६८ ग्रा.पं. च्या निवडणुका झाल्या. यात २७ ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे बहुमत आले आहे. १८ ठिकाणी भाजप वरचढ असून २ ठिकाणी काँग्रेस गजब युती बहुमतात आले आहे. असे असले तरी नागभीड आणि तळोधी या तालुक्याच्या राजकारणाला दिशा देणाऱ्या दोन मोठ्या ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात गेल्या आहेत.वाढोणा या क्रमांक तीन च्या ग्रामपंचायतीवर काँग्रेस- भाजप युतीने आपला झेंडा रोवला आहे. या निकालाने काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनसुबे प्रफुल्लीत झाले आहेत. यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मौशी, बाळापूर, वलणी, डोंगरगाव, मोहाळी मोकासा या महत्वपुर्ण ग्रामपंचायतीवर काँग्रेस विजयी झाली असुन पाहार्णी, सुलेझरी, कन्हाळगाव, मिंडाळा या ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या आहेत.नागभीडमध्ये भाजपनागभीडमध्ये भाजपने बहुमत प्राप्त केले आहे. येथे भोजपचे ८, काँग्रेसचे ६ तर तीन जागा अपक्षांनी पडकावल्या आहेत. नागभीडमध्ये ज्यांची अपेक्षा होती, त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले तर काहींनी अनपेक्षित विजय प्राप्त केला आहे.आवारपूर ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा झेंडाआवारपूर : कोरपना तालुक्यातील आवारपूर ग्रामपंचायतला निवडणुकीत काँग्रेस पक्षाने १३ पैकी ११ जागा जिंकत शेतकरी संघटनेची सत्ता संपुष्टात आणली आहे.काँग्रेसच्या विजयी उमेदवारांमध्ये दर्शन बदरे, विठ्ठल डाहुले, शशिकांत दिवे, मंदा डंभारे, वर्षा सोनटक्के,अविनाश चौधरी, बंडू कवाडे, पद्मारत्न, सिंधू परचाके, राहूल बोढे, शिला धोटे यांचा समावेश आहे.शेतकरी संघटनेला केवळ २ जागा जिंकता आल्या. विजयी उमेदवारांमध्ये विद्या कुराराम, मंदा ताजने यांचा समावेश आहे.पोलीस अधिकाऱ्यांकडून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मारहाणकोरपना येथे काँग्रेस कार्यकर्ते विजयी जल्लोष करताना उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरटकर यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना धक्काबुकी, मारहाण करून आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांवर केला आहे. तसेच चार चाकी वाहनाची हवा सोडून नाहक त्रास दिल्याचासुद्धा आरोप आहे. कोकेवाडा येथे पती-पत्नी विजयीभद्रावती : नऊ सदस्यीय कोकेवाडा (तु) ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे ९ ही उमेदवार निवडून आलेत. मुख्य म्हणजे याठिकाणी अभय खिरटकर व सुरेखा खिरटकर हे पतीपत्नी निवडून आलेत. यासोबतच संदीप मडावी, गिता श्रीरामे, विमल कुळसंगे, सरिता चौधरी, बालू मंगाम, तारा अगरे, धनराज लोनबले हे उमेदवार निवडून आलेत.या सोबतच पारोधी येथील सात पैकी शिवसेनेचे ५ उमेदवार निवडून आलेत. शंकरपुरात वारजुरकर गटाचा झेंडाशंकरपूर : शंकरपूर येथे पाच वॉर्डात १५ सदस्यांसाठी पार पडलेल्या निवडणुकीत वारजुरकर गट्याच्या सुषमा राहूड, दीक्षा भगत, सविता चौधरी, संजय नन्नावरे, लिला गजभे, सुमन सहारे, पिंटू शेरकी, इंदिरा नन्नावरे, रजनी चाचरकर, अशोक चौधरी, सचिन रासेकर, वैशाली सहारे, मनोहर गायकवाड, गोकूल सावरकर, रंजना मेश्राम यांनी निवडणुकीत विजयाची मोहर उमटविली.